शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: ..तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; शाहू छत्रपती यांनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:20 IST

मराठा समाजाचा अंत पाहू नका

कोल्हापूर : आरक्षणासाठी मराठा समाजाने आरपारची लढाई सुरू केली असून, राज्य सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. महायुतीच्या नेत्यांनी बगल न देता आरक्षण द्यावे, अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खासदार शाहू छत्रपती यांनी सोमवारी पत्रकातून दिला.खासदार शाहू छत्रपती म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत मराठा समाज दिसत नाही. मराठा समाजाची मानसिकता आणि मनोज जरांगे-पाटील यांचा निर्धार पाहता या आंदोलनाची नोंद गांभीर्याने घेण्याची जबाबदारी आता सरकारवर आहे.घटनेत दुरुस्ती करून ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी, ही मागणी आम्ही मराठा मोर्च्याच्या वेळी केली होती. केंद्र सरकारने हा प्रश्न सोडवावा, अशी आमची भूमिका आहे. आम्ही या पर्यायावर आजही ठाम आहोत. सरकारने निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा. या आंदोलनाला वेगळे वळण देऊन प्रश्न प्रलंबित ठेवण्याचा नेहमीचा प्रयत्न सरकारने करू नये. कारण मराठा समाजाची सहनशीलता संपली आहे.जर सरकार पुन्हा जबाबदारी टाळू लागले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, याची जाणीव सरकारने ठेवावी. आरक्षणाचा निर्णय घेताना महाविकास आघाडीसह सर्वच पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घ्यावे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही मार्गदर्शन घ्यावे. आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करावी लागली तरी तशी विनंती त्यांना करावी, असेही शाहू छत्रपती यांनी पत्रकात म्हटले आहे.

महायुतीच्या नेत्यांनी बगल देऊ नये..निवडणुकीत मराठा समाज बाजूला जाईल, या भीतीपोटी कायद्याच्या निकषावर टिकणारे आरक्षण देऊ, अशी वक्तव्ये केली. गेली अनेक वर्षे हीच आश्वासने सातत्याने दिली जात आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता दिली. आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी या सरकारची आहे. ही जबाबदारी आता टाळता येणार नाही. सरकारला आरक्षण द्यावेच लागेल. महायुतीचे नेते या विषयाला बगल देण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोपही खासदार शाहू छत्रपती यांनी केला.