शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा खंडित झाला तर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:40 IST

नागरिकांनी संयम बाळगून वीज गेल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन करून दोषारोप ठेवण्यापेक्षा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवीजपुरवठा खंडित झाला तर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा‘महावितरण’तर्फे आवाहन; विजेपासून अशी काळजी घ्या

कोल्हापूर : पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडतात. यात कर्मचाऱ्यांना रात्री-अपरात्री खांबावर चढून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नागरिक जबरदस्ती करतात. अशा वेळी एक वेळ वीज गेली तर काही वेळाने येते; मात्र एखाद्याचा जीव गेल्यानंतर तो पुन्हा येऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून वीज गेल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन करून दोषारोप ठेवण्यापेक्षा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.विजेची यंत्रणा ही मोबाईलप्रमाणे सुरू किंवा बंद करता येत नाही. अजूनही ही यंत्रणा मनुष्यावर आधारित आहे. त्यामुळे वीज गेल्यानंतर नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. यासाठी विजेच्या खांबावर चढून दोष नेमका कोठे आहे, तो पाहावा लागतो. अशा वेळी एखादी चूक कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतू शकते. लाखो किलोमीटरचे विजेचे जाळे उघड्यावर आहे.ग्राहकाच्या दारापर्यंत वीज आणण्याचे काम सोपे नसते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली, तर एक वाडी, गाव, तालुका, किंबहुना जिल्हा अंधारात जातो. वीज गेल्यानंतर या १९१२, १८००२३३३४३५ व १८००१०२३४३५ टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सेवा २४ तास सुरू आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारेही तक्रार नोंदवू शकता. यासंबंधी वीज बिलाच्या पाठीमागे सूचना केल्या आहेत.ही काळजी घ्या

  •  घरात आरसीसीबी किंवा एलसीबी ब्रेकर बसवून घ्या. तत्काळ वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास वीज पुरवठा तत्काळ बंद होऊन जीवितहानी टाळता येते.
  •  अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री व तपासणी आवश्यक करा.
  •  वीज उपकरणे, वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित ठेवावीत.
  •  वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घाला. पुरवठा बंद झाल्याची खात्री करा.
  • विद्युत खांबाला किंवा ताणाला जनावरे बांधू नयेत. त्या खाली गोठा किंवा गंजी उभारू नये.
  • वीजपुरवठा खंडित झाल्यास २० मिनिटे थांबूनच कंपनीशी संपर्क साधावा.
  • बिघाड किंवा विजेची तार तुटल्यास त्याची माहिती वीज वितरण कंपनीला त्वरित द्यावी.
  • नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेती पंप, स्टार्टर, वीज मीटरबाबत दक्षता घ्यावी.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर