शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

रासायनिक खतांची दरवाढ मागे न घेतल्यास मंत्र्यांना गाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:23 IST

गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत बसतोय. त्यामुळे सरकारने तत्काळ ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी केली जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान कॉँगे्रसतर्फे शुक्रवारी देण्यात आला.

ठळक मुद्देरासायनिक खतांची दरवाढ मागे न घेतल्यास मंत्र्यांना गाव बंदकिसान कॉँग्रेसचा इशारा

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत बसतोय. त्यामुळे सरकारने तत्काळ ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी केली जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान कॉँगे्रसतर्फे शुक्रवारी देण्यात आला. याबाबतचे निवेदन पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, ‘किसान सन्मान योजना’ ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच आहे. शेताच्या बांधावर वस्तुस्थिती पाहता प्रतिमहिना ५०० रुपयांनी काय दिलासा मिळणार आहे? त्यातच रासायनिक खतांच्या दरात ५० रुपये किलोंच्या बॅगमागे १०० ते २०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

मागील काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. ‘जीएसटी’च्या घोळात ऐन खरिपात किमती वाढविल्या. फेब्रुवारी २०१८ मध्ये संयुक्त खतांच्या किमतीत १३४ रुपयांपर्यंत वाढ झाली.

आॅक्टोबर २०१८ मध्ये इंधन दरवाढीमुळे १०५ ते २५० रुपये प्रतिबॅग अशी घसघशीत वाढ झाली. आताही संयुक्त खतांच्या किमतीत १०० ते २१७ रुपयांची दरवाढ करून शेतकऱ्यांना शॉक दिला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीचा पर्याय निवडला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक बाजू कमकुवत असताना दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.शिष्टमंडळात संपत पाटील, गजानन पाटील, तानाजी मोरे, योगेश हातलगे, सुशांत मगदूम, निवास भारमल, राजेश घाटगे, सत्यजित पाटील, निवास शेट्टे, आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीcongressकाँग्रेस