शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

रासायनिक खतांची दरवाढ मागे न घेतल्यास मंत्र्यांना गाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:23 IST

गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत बसतोय. त्यामुळे सरकारने तत्काळ ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी केली जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान कॉँगे्रसतर्फे शुक्रवारी देण्यात आला.

ठळक मुद्देरासायनिक खतांची दरवाढ मागे न घेतल्यास मंत्र्यांना गाव बंदकिसान कॉँग्रेसचा इशारा

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत बसतोय. त्यामुळे सरकारने तत्काळ ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी केली जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान कॉँगे्रसतर्फे शुक्रवारी देण्यात आला. याबाबतचे निवेदन पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, ‘किसान सन्मान योजना’ ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच आहे. शेताच्या बांधावर वस्तुस्थिती पाहता प्रतिमहिना ५०० रुपयांनी काय दिलासा मिळणार आहे? त्यातच रासायनिक खतांच्या दरात ५० रुपये किलोंच्या बॅगमागे १०० ते २०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

मागील काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. ‘जीएसटी’च्या घोळात ऐन खरिपात किमती वाढविल्या. फेब्रुवारी २०१८ मध्ये संयुक्त खतांच्या किमतीत १३४ रुपयांपर्यंत वाढ झाली.

आॅक्टोबर २०१८ मध्ये इंधन दरवाढीमुळे १०५ ते २५० रुपये प्रतिबॅग अशी घसघशीत वाढ झाली. आताही संयुक्त खतांच्या किमतीत १०० ते २१७ रुपयांची दरवाढ करून शेतकऱ्यांना शॉक दिला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीचा पर्याय निवडला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक बाजू कमकुवत असताना दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.शिष्टमंडळात संपत पाटील, गजानन पाटील, तानाजी मोरे, योगेश हातलगे, सुशांत मगदूम, निवास भारमल, राजेश घाटगे, सत्यजित पाटील, निवास शेट्टे, आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीcongressकाँग्रेस