राज्यासमोर आदर्श : लोकसहभागातून स्वच्छता अन् समृद्धीकडे वाटचाल
By Admin | Updated: December 16, 2014 00:57 IST2014-12-16T00:55:05+5:302014-12-16T00:57:27+5:30
अशी चालते स्वच्छता मोहीम

राज्यासमोर आदर्श : लोकसहभागातून स्वच्छता अन् समृद्धीकडे वाटचाल
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -कोणतीही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसते, मात्र फासेपारधी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का जन्मजातच पडलेला. हा शिक्का पुसून टाकण्याचे आणि राज्यभरातील आपल्या समाजबांधवांसमोर आदर्श ठेवण्याचे काम उचगाव, ता. करवीर येथील फासेपारधी वसाहतीने केले आहे. दारू, जुगार, गुटखाबंदीसह ही वसाहत तंटामुक्तही बनली आहे. या वसाहतीला अंधारातून प्रकाशाकडे आणि स्वच्छतेतून समृद्धीकडे नेणाऱ्या त्यांच्या पंचमंडळींना म्हणूनच सलाम !
कोल्हापूर शहरापासून अवघ्या चार-पाच किलोमीटर अंतरावर परिवर्तनाच्या वाटेवरील ही वसाहत बारा एकरात वसली आहे. ‘उचगाव पूर्व शांतीनगर समस्त फासेपारधी समाज’ असे तिचे नाव. २०० कुटुंबे तिथे राहतात. (पान १० वर)
वसाहत आदर्श बनविण्यासाठी तरुणांचाही सक्रिय सहभाग असतो. आदिवासीचं जिणं पदरी आलेला समाज आता प्रगतीच्या दिशेने गतीने वाटचाल करत आहे. परदेशात पर्यटनासाठी जाण्यापर्यंत काहीजणांनी मजल मारली आहे. - राजू काळे, रहिवासी
अशी चालते स्वच्छता मोहीम
उचगावातील फासेपारधी समाजाने स्वच्छतेला स्वत:पासून सुरुवात केली. वसाहतीमधील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक कुटुंंबातील एक व्यक्ती याप्रमाणे ३२ जणांचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. सहा ग्रुप आहेत.
प्रत्येक ग्रुप महिन्यातील ५, १०, १५, २०, २५, ३० या तारखेला सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत एक दिवस स्वच्छता करतो. ग्रुपमध्ये नोकरदार, शेतमजूर, महिला, युवकांचा सहभाग आहे. पाच वर्षांपासून अशाप्रकारे स्वच्छतेचा कार्यक्रम न चुकता राबविला जात आहे. परिणामी प्रत्येक कुटुंबालाच आता स्वच्छतेची सवय जडली आहे.
प्रत्येक ग्रुपला आपणाला कधी स्वच्छता करायची आहे, ते कळावे यासाठी वेळापत्रक दिले आहे. या वेळापत्रकाप्रमाणे स्वत:हूनच संबंधित ग्रुप स्वच्छता करतो. स्वच्छतेबरोबरच झाडांना पाणी घालणे, एखाद्या घराच्या परिसरात अस्वच्छता असली तरी ती स्वच्छ केली जाते.
परिवर्तनाच्या वाटेवर
पारधी समाज