शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत खून झाला स्वस्त?, किरकोळ कारणावरून पडताहेत मुडदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 16:55 IST

Murder Ichlkarnaji Kolhapur-इचलकरंजी शहर परिसरात किरकोळ कारणावरून लागोपाठ खून होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खून करणे इतके स्वस्त व सोपे झाले आहे का, असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे. गेल्या चार महिन्यांत आठ खून झाले. ही वस्त्रनगरीच्यादृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. त्यातच या खून प्रकरणात ऐन उमेदीतले तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे किरकोळ कारणावरून पडताहेत मुडदेतरुणांचा समावेश चिंताजनक

अतुल आंबीइचलकरंजी : शहर परिसरात किरकोळ कारणावरून लागोपाठ खून होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खून करणे इतके स्वस्त व सोपे झाले आहे का, असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे. गेल्या चार महिन्यांत आठ खून झाले. ही वस्त्रनगरीच्यादृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. त्यातच या खून प्रकरणात ऐन उमेदीतले तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.शहर परिसरात विविध गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सेफ सिटीअंतर्गत शहरात सर्वत्र सीसीटीव्ही असतानाही गंभीर गुन्हे घडत आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे सलग चार महिन्यांत आठ खुनांच्या घटना घडल्या. कबनूर (ता.हातकणंगले) येथे राजकीय वादातून संदीप मागाडे, शहापूर येथे शुभम कुडाळकर, एका ३५ वर्षीय तरुणाचा खून करून शहापूर खणीत टाकण्यात आले. त्याचा अद्याप मागमूस नाही. त्यापाठोपाठ कोरोची माळावर व शांतीनगर परिसरात झालेले दोन्ही खून तरुणांचेच. विशेष म्हणजे या सर्व खून प्रकरणात गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी हे सर्वजण ऐन उमेदीतीतले तरुणच आहेत.या घटनांकडे गांभीर्याने पाहिल्यास खुनशी स्टेट्स ठेवणे, चैनी, नशा अशा प्रमुख कारणांतून खून झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तरुणाई भरकटत आहे का, असा प्रश्नही निर्माण होत आहे. शहरातील अनेक मातब्बर गुन्हेगार मोक्कांतर्गत कारागृहात आहेत. त्यामुळे खुनाचा बदला घेण्यासाठी खून, खंडणीसाठी खून असे प्रकार थांबले असले तरी किरकोळ तात्विक कारणातून सहजपणे खून केले जातात.शांतीनगर येथील अजित कांबळे याचा खून दारू पिण्यासाठी व चैनीसाठीच्या किरकोळ पैशांसाठी केल्याचे उघडकीस आले आहे. तर खोतवाडी येथील खूनही सायकल चोरीच्या संशयावरून झाला. गतवर्षी कोरोची (ता.हातकणंगले) येथे दारू पिताना वाद होवून खून झाला. त्यात आईने दारूड्या मुलाच्या डोक्यात खलबत्ता घालून खून केला. क्षुल्लक कारणावरून खून करण्यापर्यंत मानसिकता पोहचत आहे. ही खेदजनक व चिंताजनक बाब आहे.

ठोस पावले उचलावीतनूतन अधिकाऱ्यांनी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. परंतु खुनासारख्या गंभीर घटना थांबता थांबेनात. त्यातच घरात घुसून वृद्धेला लुबाडणे, पोलिसांच्या अंगावर धावून जाणे, नशेचे पदार्थ विक्री, गुटखा विक्री असे प्रकार वारंवार घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलिस दलाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजी