शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

इचलकरंजीत खून झाला स्वस्त?, किरकोळ कारणावरून पडताहेत मुडदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 16:55 IST

Murder Ichlkarnaji Kolhapur-इचलकरंजी शहर परिसरात किरकोळ कारणावरून लागोपाठ खून होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खून करणे इतके स्वस्त व सोपे झाले आहे का, असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे. गेल्या चार महिन्यांत आठ खून झाले. ही वस्त्रनगरीच्यादृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. त्यातच या खून प्रकरणात ऐन उमेदीतले तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे किरकोळ कारणावरून पडताहेत मुडदेतरुणांचा समावेश चिंताजनक

अतुल आंबीइचलकरंजी : शहर परिसरात किरकोळ कारणावरून लागोपाठ खून होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खून करणे इतके स्वस्त व सोपे झाले आहे का, असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे. गेल्या चार महिन्यांत आठ खून झाले. ही वस्त्रनगरीच्यादृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. त्यातच या खून प्रकरणात ऐन उमेदीतले तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.शहर परिसरात विविध गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सेफ सिटीअंतर्गत शहरात सर्वत्र सीसीटीव्ही असतानाही गंभीर गुन्हे घडत आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे सलग चार महिन्यांत आठ खुनांच्या घटना घडल्या. कबनूर (ता.हातकणंगले) येथे राजकीय वादातून संदीप मागाडे, शहापूर येथे शुभम कुडाळकर, एका ३५ वर्षीय तरुणाचा खून करून शहापूर खणीत टाकण्यात आले. त्याचा अद्याप मागमूस नाही. त्यापाठोपाठ कोरोची माळावर व शांतीनगर परिसरात झालेले दोन्ही खून तरुणांचेच. विशेष म्हणजे या सर्व खून प्रकरणात गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी हे सर्वजण ऐन उमेदीतीतले तरुणच आहेत.या घटनांकडे गांभीर्याने पाहिल्यास खुनशी स्टेट्स ठेवणे, चैनी, नशा अशा प्रमुख कारणांतून खून झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तरुणाई भरकटत आहे का, असा प्रश्नही निर्माण होत आहे. शहरातील अनेक मातब्बर गुन्हेगार मोक्कांतर्गत कारागृहात आहेत. त्यामुळे खुनाचा बदला घेण्यासाठी खून, खंडणीसाठी खून असे प्रकार थांबले असले तरी किरकोळ तात्विक कारणातून सहजपणे खून केले जातात.शांतीनगर येथील अजित कांबळे याचा खून दारू पिण्यासाठी व चैनीसाठीच्या किरकोळ पैशांसाठी केल्याचे उघडकीस आले आहे. तर खोतवाडी येथील खूनही सायकल चोरीच्या संशयावरून झाला. गतवर्षी कोरोची (ता.हातकणंगले) येथे दारू पिताना वाद होवून खून झाला. त्यात आईने दारूड्या मुलाच्या डोक्यात खलबत्ता घालून खून केला. क्षुल्लक कारणावरून खून करण्यापर्यंत मानसिकता पोहचत आहे. ही खेदजनक व चिंताजनक बाब आहे.

ठोस पावले उचलावीतनूतन अधिकाऱ्यांनी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. परंतु खुनासारख्या गंभीर घटना थांबता थांबेनात. त्यातच घरात घुसून वृद्धेला लुबाडणे, पोलिसांच्या अंगावर धावून जाणे, नशेचे पदार्थ विक्री, गुटखा विक्री असे प्रकार वारंवार घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलिस दलाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजी