शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

इचलकरंजीत खून झाला स्वस्त?, किरकोळ कारणावरून पडताहेत मुडदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 16:55 IST

Murder Ichlkarnaji Kolhapur-इचलकरंजी शहर परिसरात किरकोळ कारणावरून लागोपाठ खून होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खून करणे इतके स्वस्त व सोपे झाले आहे का, असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे. गेल्या चार महिन्यांत आठ खून झाले. ही वस्त्रनगरीच्यादृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. त्यातच या खून प्रकरणात ऐन उमेदीतले तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे किरकोळ कारणावरून पडताहेत मुडदेतरुणांचा समावेश चिंताजनक

अतुल आंबीइचलकरंजी : शहर परिसरात किरकोळ कारणावरून लागोपाठ खून होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खून करणे इतके स्वस्त व सोपे झाले आहे का, असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे. गेल्या चार महिन्यांत आठ खून झाले. ही वस्त्रनगरीच्यादृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. त्यातच या खून प्रकरणात ऐन उमेदीतले तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.शहर परिसरात विविध गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सेफ सिटीअंतर्गत शहरात सर्वत्र सीसीटीव्ही असतानाही गंभीर गुन्हे घडत आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे सलग चार महिन्यांत आठ खुनांच्या घटना घडल्या. कबनूर (ता.हातकणंगले) येथे राजकीय वादातून संदीप मागाडे, शहापूर येथे शुभम कुडाळकर, एका ३५ वर्षीय तरुणाचा खून करून शहापूर खणीत टाकण्यात आले. त्याचा अद्याप मागमूस नाही. त्यापाठोपाठ कोरोची माळावर व शांतीनगर परिसरात झालेले दोन्ही खून तरुणांचेच. विशेष म्हणजे या सर्व खून प्रकरणात गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी हे सर्वजण ऐन उमेदीतीतले तरुणच आहेत.या घटनांकडे गांभीर्याने पाहिल्यास खुनशी स्टेट्स ठेवणे, चैनी, नशा अशा प्रमुख कारणांतून खून झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तरुणाई भरकटत आहे का, असा प्रश्नही निर्माण होत आहे. शहरातील अनेक मातब्बर गुन्हेगार मोक्कांतर्गत कारागृहात आहेत. त्यामुळे खुनाचा बदला घेण्यासाठी खून, खंडणीसाठी खून असे प्रकार थांबले असले तरी किरकोळ तात्विक कारणातून सहजपणे खून केले जातात.शांतीनगर येथील अजित कांबळे याचा खून दारू पिण्यासाठी व चैनीसाठीच्या किरकोळ पैशांसाठी केल्याचे उघडकीस आले आहे. तर खोतवाडी येथील खूनही सायकल चोरीच्या संशयावरून झाला. गतवर्षी कोरोची (ता.हातकणंगले) येथे दारू पिताना वाद होवून खून झाला. त्यात आईने दारूड्या मुलाच्या डोक्यात खलबत्ता घालून खून केला. क्षुल्लक कारणावरून खून करण्यापर्यंत मानसिकता पोहचत आहे. ही खेदजनक व चिंताजनक बाब आहे.

ठोस पावले उचलावीतनूतन अधिकाऱ्यांनी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. परंतु खुनासारख्या गंभीर घटना थांबता थांबेनात. त्यातच घरात घुसून वृद्धेला लुबाडणे, पोलिसांच्या अंगावर धावून जाणे, नशेचे पदार्थ विक्री, गुटखा विक्री असे प्रकार वारंवार घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलिस दलाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजी