शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

इचलकरंजीत पाणी टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:35 IST

इचलकरंजी : वारणा नदीकाठच्या ग्रामस्थांचा इचलकरंजीच्या नळ पाणीपुरवठा योजनेला होणारा तीव्र विरोध पाहता ही नळ योजना नजीकच्या दोन वर्षांत होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

ठळक मुद्देकृष्णा योजनेची दाबनलिका बदलण्याची गरज : वारणा नळ योजना होण्याची शक्यता धूसरअन्यथा उन्हाळ्यात शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार योजनेला होणारा तीव्र विरोध पाहता ही नळ योजना नजीकच्या दोन वर्षांत होण्याची शक्यता धूसर

इचलकरंजी : वारणा नदीकाठच्या ग्रामस्थांचा इचलकरंजीच्या नळ पाणीपुरवठा योजनेला होणारा तीव्र विरोध पाहता ही नळ योजना नजीकच्या दोन वर्षांत होण्याची शक्यता धूसर झाली आहे. सध्या शहरास पाणी पुरवठा करणाºया कृष्णा योजनेची दाबनलिका व पाणी उपसा पंप बदलले तर नागरिकांना आवश्यक तितके पाणी मिळेल, अन्यथा उन्हाळ्यात शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी कृष्णा व पंचगंगा अशा दोन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यापैकी पंचगंगा नळ योजनेकडील पाणी उपशाचे पंप ४० वर्षांपूर्वीचे असल्यामुळे त्यांची क्षमता कमी झाली आहे. तसेच कृष्णा नळ पाणी योजनेकडील दाबनलिका सडल्यामुळे तिला वारंवार गळती लागते. याचा परिणाम म्हणून शहराचा पाणीपुरवठा खंडीत होतो. त्यामुळे कृष्णा नळ योजनेकडील किमान सहा किलोमीटर लांबीची दाबनलिका ताबडतोब बदलणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कृष्णा नळ योजनेचे पंप सुद्धा सुमारे पंधरा वर्षांपूर्वीचे असल्याने त्यांचीही क्षमता कमी झाली आहे.

इचलकरंजीची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक आहे. शहरास दररोज पाणीपुरवठा करायचा असल्यास दररोज ५४ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे. मात्र, पंचगंगा व कृष्णा या दोन्ही नळ योजनांकडील पंपांची क्षमता कमी झाल्यामुळे जेमतेम ३५ दशलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा होतो. सद्य:स्थितीस शहराला तीन दिवसांतून एकवेळ पाणी पुरविले जाते. जानेवारी महिन्यापासून पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषणाची पातळी वाढते. त्यामुळे पंचगंगा नळ पाणीपुरवठा योजना बंद ठेवावी लागते. जानेवारी ते जून असे सहा महिने शहरास चार ते पाच दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यामध्ये कृष्णा नळ योजनेच्या दाबनलिकेस गळती लागली, तर आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. याला पर्याय म्हणून पंचगंगा व कृष्णा योजनांकडील पंप बदलून तेथे नवीन पंप बसविले पाहिजेत. तर किमान सहा किलोमीटर लांबीची दाबनलिका बदलणे, अशा कामांसाठी सरकारकडून खास बाब म्हणून वीस कोटींहून अधिक रकमेचा निधी मिळविणे आवश्यक आहे.

अन्यथा वारणा नळ योजना पूर्ण होईपर्यंत शहरवासीयांना वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, सध्या वारणा नदीकाठच्या ग्रामस्थांचा इचलकरंजीच्या नवीन नळ योजनेला होणाºया विरोधाची तीव्रता पाहता नजीकच्या दोन-तीन वर्षांत नळ योजना पूर्ण होईल, असे वाटत नसल्याने विरोधी नगरसेवकांबरोबरच सत्तारूढ पक्षाचे नगरसेवकसुद्धा पंचगंगा व कृष्णा योजनेचे पंप बदलावेत. त्याचबरोबर कृष्णा योजनेची दाबनलिका बदलावी, अशी मागणी करू लागले आहेत.आमदार व खासदारांची प्रतिष्ठा पणालाकृष्णा व पंचगंगा नळ योजनेचे पंप व कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासनाने २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून त्याचा पहिला हप्ता नगरपालिकेकडे पाठविला होता. वास्तविक पाहता पंप व दाबनलिका बदलणे याची निविदा प्रसिद्ध करून त्याप्रमाणे काम चालू होणे आवश्यक होते; पण त्याला विलंब लागला. आता इचलकरंजीस वारणा नळ योजनेस मंजुरी दिली असून, तिच्या निविदांना सुद्धा मान्यता दिली आहे. म्हणून कृष्णा योजनेची दाबनलिका आणि पंप बदलणे आवश्यक नाही. परिणामी, नगरपालिकेकडील शासनाने दिलेला निधी पुन्हा शासनाकडे पाठविण्यात आला. तर नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांनी पाठविलेला दाबनलिका व पंप बदलण्याबाबतचा सोळा कोटी रुपयांचा प्रस्तावसुद्धा शासनाने फेटाळला आहे. आता वारणा नदीकाठच्या आंदोलनामुळे वारणा नळ योजना नजीकच्या दोन-तीन वर्षांत होण्याची शक्यता नाही. त्यामुळे इचलकरंजीवासीय मात्र दुहेरी कात्रीत सापडले आहेत. तरी सध्याचे आमदार सुरेश हाळवणकर व खासदार राजू शेट्टी यांनी शासन दरबारी जोरदार प्रयत्न करून पंप व दाबनलिका बदलण्यासाठी निधी आणावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूक