शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मला लेट अँड सी नको, 'ॲक्टिव्ह' प्रशासन पाहिजे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केल्या स्पष्ट सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 11:59 IST

पीएम किसानचे काम पेंडिंग का?

कोल्हापूर : शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवताना शासनाने पुढाकार घेऊन त्यातील अडथळे दूर करणे गरजेचे आहे. मला लेट अँड सी प्रशासन नको आहे तर ॲक्टिव्ह प्रशासन हवे आहे, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात दीड तास चाललेल्या बैठकीत त्यांनी याेजनांचे सादरीकरण पाहताना दोषही त्याचक्षणी दाखवून दिले. काम किती पूर्ण झाले, कमी झाले असेल तर तसे का? अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले, कर्ज पुरवठा केलेल्या स्वयंसहाय्यता गटांमध्ये सकारात्मक बदल झालेली दोन उदाहरणे दाखवा, जलाशयाची पूर्वीची अवस्था व अमृत सरोवर योजनेमुळे झालेला बदल दाखवा, अशा पद्धतीने काम कराल तर गळती लागणार अशा त्रृटी दाखवत, पडताळणी, तपासणी करताना कामांचा अहवाल दर महिन्याला सादर करण्याची सूचना केली.यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार अमल महाडिक, समरजित घाटगे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.मंत्री सिंधिया म्हणाले, अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व ड्रेनेज या दोन्हीसाठी एकाच वेळी रस्ते खुदाई करायला हवी होती. रस्ते खुदाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणी निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्या. प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण अंतर्गत एकही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याची काळजी घ्या.

पीएम किसान, पीएम स्वनिधी, मातृ वंदना योजना, जलजीवन मिशन, आयुष्यमान भारत, स्वयंसहायता समूह या योजनांच्या लाभार्थ्यांचा स्वतंत्र कार्यक्रम घ्या. कोल्हापुरी चप्पल, गूळ, फौंड्री उद्योग, इचलकरंजीचा वस्त्रोद्योग, चांदीचे दागिने तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला प्राधान्य देऊन कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

पीएम किसानचे काम पेंडिंग का?पीएम किसान योजनेंतर्गत ई-केवायसीचे ७२ हजार प्रस्ताव प्रलंबित आहेत. याबाबत सिंधिया यांनी विचारणा केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम कृषीचे आहे की महसूलचे याचे निर्देश न आल्यामुळे थांबले असून, राज्यात ही स्थिती असल्याचे सांगितले. यावर अमल महाडिक यांनी हा विषय आपण मंत्रालयात मांडू, असे सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे