शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

तुळशीवर जलविद्युत प्रकल्प साकारणार, वाया जाणाऱ्या पाण्याचा सुदुपयोग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 17:26 IST

water scarcity, dam, tulshidam, kolhapurnews मुख्य अभियंता विद्युत मुंबई कार्यालयाकडुन दोन दिवसापूर्वी ' तुळशी जलविद्युत प्रकल्पाची ' निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने १३ वर्षापासून अडथळ्यांची शर्यत झेलत असलेला हा प्रकल्प साकारणार हे निश्चित झाले आहे.

ठळक मुद्देतुळशीवर जलविद्युत प्रकल्प साकारणार, वाया जाणाऱ्या पाण्याचा सुदुपयोग होणारमुख्य अभियंता विद्युत कार्यालय मुंबईकडून निविदा प्रसिद्ध

श्रीकांत ऱ्हायकरधामोड- गेल्या सात वर्षापासून तुळशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून रब्बी व उन्हाळी पिकांबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून जवळपास २ टी.एम.सी. पाणी धरणातुन सोडण्यात येते. त्याचबरोबर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरही बरेचसे पाणी असेच वाहून जाते.

या पाण्याचा दुहेरी फायदा घेता येईल व याच दोन टी .एम.सी. पाण्यातून १ .५ मेगावॅट विज निर्मीती करता येईल म्हणून  मुख्य अभियंता विद्युत मुंबई कार्यालयाकडुन दोन दिवसापूर्वी ' तुळशी जलविद्युत प्रकल्पाची ' निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने १३ वर्षापासून अडथळ्यांची शर्यत झेलत असलेला हा प्रकल्प साकारणार हे निश्चित झाले आहे.

बांधा, वापरा व हस्तातंरीत करा या धोरणानुसार राज्य शासनाने मुख्य अभियंता विद्युत कार्यालयाच्या अधिकाराखाली या प्रकल्पाची निविदा दोनच दिवसापूर्वी ऑनलाईन पध्दतीने प्रसिद्ध केली आहे. ३० वर्षानंतर हा प्रकल्प पुन्हा शासनाच्या ताब्यात दिला जाणार आहे. या नियोजीत प्रकल्पातुन सुमारे ४६ लाख युनिट म्हणजे १.५ मेगावॅट इतकी वीज निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प दोन वर्षातच पूर्ण होणार असून स्थानिकांना रोजगार ही उपलब्ध होणार आहे .या विजनिर्मिती प्रकल्पामुळे भारनियमनाचा भार थोडा का होईना हलका होण्यास मदत होणार आहे.शासनाने २००७ साली ही अशाच पद्धतीने निविदा मागवल्या होत्या. त्यावेळी तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था लि.वारणानगर या संस्थेने निविदा भरलेली होती. पण दरम्यानच्या काळात तुळशी धरण क्षेत्रात पाणी संचय कमी होत असल्याचे कारण पुढे करत या प्रकल्पाला 'खो ' घातला होता. मात्र गेल्या पाच वर्षापासून केळोशी बुद्रुक येथील 'लोंढानाला ' प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरीक्त पाणी थेट 'तुळशी ' धरणात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तुळशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत आहे. त्यामुळे आता हा खडलेला प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे .

या प्रकल्पासाठी तुळशी धरणाशेजारीच मुबलक जागा, पाणी उपलब्ध असल्याचा अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास आता अडथळे येणार नाहीत प्रकल्प लवकरच मार्गी लागेल अशी आशा आहे.- पी.जे. माने,  उपविभागीय अभियंता, भोगावती पाटबंधारे उपविभाग, राधानगरी 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईkolhapurकोल्हापूर