शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

तुळशीवर जलविद्युत प्रकल्प साकारणार, वाया जाणाऱ्या पाण्याचा सुदुपयोग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 17:26 IST

water scarcity, dam, tulshidam, kolhapurnews मुख्य अभियंता विद्युत मुंबई कार्यालयाकडुन दोन दिवसापूर्वी ' तुळशी जलविद्युत प्रकल्पाची ' निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने १३ वर्षापासून अडथळ्यांची शर्यत झेलत असलेला हा प्रकल्प साकारणार हे निश्चित झाले आहे.

ठळक मुद्देतुळशीवर जलविद्युत प्रकल्प साकारणार, वाया जाणाऱ्या पाण्याचा सुदुपयोग होणारमुख्य अभियंता विद्युत कार्यालय मुंबईकडून निविदा प्रसिद्ध

श्रीकांत ऱ्हायकरधामोड- गेल्या सात वर्षापासून तुळशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून रब्बी व उन्हाळी पिकांबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून जवळपास २ टी.एम.सी. पाणी धरणातुन सोडण्यात येते. त्याचबरोबर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरही बरेचसे पाणी असेच वाहून जाते.

या पाण्याचा दुहेरी फायदा घेता येईल व याच दोन टी .एम.सी. पाण्यातून १ .५ मेगावॅट विज निर्मीती करता येईल म्हणून  मुख्य अभियंता विद्युत मुंबई कार्यालयाकडुन दोन दिवसापूर्वी ' तुळशी जलविद्युत प्रकल्पाची ' निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने १३ वर्षापासून अडथळ्यांची शर्यत झेलत असलेला हा प्रकल्प साकारणार हे निश्चित झाले आहे.

बांधा, वापरा व हस्तातंरीत करा या धोरणानुसार राज्य शासनाने मुख्य अभियंता विद्युत कार्यालयाच्या अधिकाराखाली या प्रकल्पाची निविदा दोनच दिवसापूर्वी ऑनलाईन पध्दतीने प्रसिद्ध केली आहे. ३० वर्षानंतर हा प्रकल्प पुन्हा शासनाच्या ताब्यात दिला जाणार आहे. या नियोजीत प्रकल्पातुन सुमारे ४६ लाख युनिट म्हणजे १.५ मेगावॅट इतकी वीज निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प दोन वर्षातच पूर्ण होणार असून स्थानिकांना रोजगार ही उपलब्ध होणार आहे .या विजनिर्मिती प्रकल्पामुळे भारनियमनाचा भार थोडा का होईना हलका होण्यास मदत होणार आहे.शासनाने २००७ साली ही अशाच पद्धतीने निविदा मागवल्या होत्या. त्यावेळी तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था लि.वारणानगर या संस्थेने निविदा भरलेली होती. पण दरम्यानच्या काळात तुळशी धरण क्षेत्रात पाणी संचय कमी होत असल्याचे कारण पुढे करत या प्रकल्पाला 'खो ' घातला होता. मात्र गेल्या पाच वर्षापासून केळोशी बुद्रुक येथील 'लोंढानाला ' प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरीक्त पाणी थेट 'तुळशी ' धरणात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तुळशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत आहे. त्यामुळे आता हा खडलेला प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे .

या प्रकल्पासाठी तुळशी धरणाशेजारीच मुबलक जागा, पाणी उपलब्ध असल्याचा अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास आता अडथळे येणार नाहीत प्रकल्प लवकरच मार्गी लागेल अशी आशा आहे.- पी.जे. माने,  उपविभागीय अभियंता, भोगावती पाटबंधारे उपविभाग, राधानगरी 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईkolhapurकोल्हापूर