शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

तुळशीवर जलविद्युत प्रकल्प साकारणार, वाया जाणाऱ्या पाण्याचा सुदुपयोग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 17:26 IST

water scarcity, dam, tulshidam, kolhapurnews मुख्य अभियंता विद्युत मुंबई कार्यालयाकडुन दोन दिवसापूर्वी ' तुळशी जलविद्युत प्रकल्पाची ' निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने १३ वर्षापासून अडथळ्यांची शर्यत झेलत असलेला हा प्रकल्प साकारणार हे निश्चित झाले आहे.

ठळक मुद्देतुळशीवर जलविद्युत प्रकल्प साकारणार, वाया जाणाऱ्या पाण्याचा सुदुपयोग होणारमुख्य अभियंता विद्युत कार्यालय मुंबईकडून निविदा प्रसिद्ध

श्रीकांत ऱ्हायकरधामोड- गेल्या सात वर्षापासून तुळशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून रब्बी व उन्हाळी पिकांबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून जवळपास २ टी.एम.सी. पाणी धरणातुन सोडण्यात येते. त्याचबरोबर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरही बरेचसे पाणी असेच वाहून जाते.

या पाण्याचा दुहेरी फायदा घेता येईल व याच दोन टी .एम.सी. पाण्यातून १ .५ मेगावॅट विज निर्मीती करता येईल म्हणून  मुख्य अभियंता विद्युत मुंबई कार्यालयाकडुन दोन दिवसापूर्वी ' तुळशी जलविद्युत प्रकल्पाची ' निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने १३ वर्षापासून अडथळ्यांची शर्यत झेलत असलेला हा प्रकल्प साकारणार हे निश्चित झाले आहे.

बांधा, वापरा व हस्तातंरीत करा या धोरणानुसार राज्य शासनाने मुख्य अभियंता विद्युत कार्यालयाच्या अधिकाराखाली या प्रकल्पाची निविदा दोनच दिवसापूर्वी ऑनलाईन पध्दतीने प्रसिद्ध केली आहे. ३० वर्षानंतर हा प्रकल्प पुन्हा शासनाच्या ताब्यात दिला जाणार आहे. या नियोजीत प्रकल्पातुन सुमारे ४६ लाख युनिट म्हणजे १.५ मेगावॅट इतकी वीज निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प दोन वर्षातच पूर्ण होणार असून स्थानिकांना रोजगार ही उपलब्ध होणार आहे .या विजनिर्मिती प्रकल्पामुळे भारनियमनाचा भार थोडा का होईना हलका होण्यास मदत होणार आहे.शासनाने २००७ साली ही अशाच पद्धतीने निविदा मागवल्या होत्या. त्यावेळी तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था लि.वारणानगर या संस्थेने निविदा भरलेली होती. पण दरम्यानच्या काळात तुळशी धरण क्षेत्रात पाणी संचय कमी होत असल्याचे कारण पुढे करत या प्रकल्पाला 'खो ' घातला होता. मात्र गेल्या पाच वर्षापासून केळोशी बुद्रुक येथील 'लोंढानाला ' प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरीक्त पाणी थेट 'तुळशी ' धरणात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तुळशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत आहे. त्यामुळे आता हा खडलेला प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे .

या प्रकल्पासाठी तुळशी धरणाशेजारीच मुबलक जागा, पाणी उपलब्ध असल्याचा अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास आता अडथळे येणार नाहीत प्रकल्प लवकरच मार्गी लागेल अशी आशा आहे.- पी.जे. माने,  उपविभागीय अभियंता, भोगावती पाटबंधारे उपविभाग, राधानगरी 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईkolhapurकोल्हापूर