शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

'हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर’ विमानसेवा सुरू, पहिल्या दिवशी १४१ जणांनी केला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 19:15 IST

गेल्या तीन महिन्यांपासून बंद असणारी कोल्हापूरची विमानसेवा रविवारी ‘हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर’ या मार्गाच्या माध्यमातून पुन्हा सुरू झाली.

कोल्हापूर : गेल्या तीन महिन्यांपासून बंद असणारी कोल्हापूरची विमानसेवा रविवारी ‘हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर’ या मार्गाच्या माध्यमातून पुन्हा सुरू झाली. पहिल्या दिवशी एकूण १४१ जणांनी प्रवास केला. लोकप्रतिनिधी आणि कोल्हापूरकरांच्या उपस्थितीमध्ये प्रवाशांचे उत्साही वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले.

केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुस-या टप्प्याअंतर्गत अलायन्स एअर या कंपनीने रविवारपासून ‘हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर’ विमानसेवा सुरू केली. हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर आणि पुन्हा बंगलोर-कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर एकूण १४१ जणांनी या सेवेच्या पहिल्या दिवशी प्रवास केला. दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर ७० आसनी विमान दाखल झाले. याठिकाणी विमानतळ व्यवस्थापनाने या विमानाचे ‘वॉटर सॅल्युट’ने स्वागत केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे, खासदार धनंजय महाडिक यांनी हैदराबादहून कोल्हापूरला आलेल्या प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन आणि कोल्हापूरहून बंगलोर जाणा-या प्रवाशांना बोर्डिंगपास देऊन स्वागत केले. वैमानिकांना कोल्हापुरी फेटा बांधून, हवाई सुंदरी यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.  पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापुरातून बंगलोर उड्डाण करणा-या विमानाचे फ्लॅग आॅफ केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी, विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकारी पूजा मूल, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष ललित गांधी, अलायन्स एअरचे चीफ कमर्शिअल मॅनेजर मनू आनंद, कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ, आदी उपस्थित होते. दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी विमानाने बंगलोरच्या दिशेने उड्डाण केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ