शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

बारावीची परीक्षा बुधवारपासून, तयारी पूर्ण; कोल्हापूर विभागातून सुमारे १ लाख २९ हजार परीक्षार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 18:46 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवार (दि. २१) पासून सुरू होणार आहे. यात सकाळी अकरा ते दोन या वेळेत पहिला पेपर इंग्रजीचा होणार आहे. कोल्हापूर विभागातून यावर्षी सुमारे एक लाख २९ हजार ९३९ परीक्षार्थी आहेत.

ठळक मुद्देबारावीची परीक्षा उद्यापासून, तयारी पूर्णकोल्हापूर विभागातून सुमारे १ लाख २९ हजार परीक्षार्थी

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवार (दि. २१) पासून सुरू होणार आहे. यात सकाळी अकरा ते दोन या वेळेत पहिला पेपर इंग्रजीचा होणार आहे. कोल्हापूर विभागातून यावर्षी सुमारे एक लाख २९ हजार ९३९ परीक्षार्थी आहेत.या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर विभागातील १५४ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यासाठी कोल्हापूरमध्ये ६१, सातारा जिल्ह्यात ४५ आणि सांगली जिल्ह्यात ४८ परीक्षा केंद्रे आहेत. ही परीक्षा दि.२० मार्चपर्यंत होणार आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी परीक्षा मंडळाने कोल्हापूर विभागाने एकूण १९ भरारी पथके नेमली आहेत.कोल्हापूर जिल्ह्यासाठी सात आणि सांगली व सातारा जिल्ह्यांसाठी प्रत्येकी सहा भरारी पथके कार्यान्वित असणार आहेत. त्यासह प्रत्येक जिल्हा प्रशासनाची भरारी पथके असणार आहेत. त्यासह दक्षता पथकेदेखील गोपनीय पद्धतीने कार्यरत असतील. परीक्षा केंद्रांवर शांततेत प्रवेश करण्याच्या सूचना भरारी पथकांना दिल्या आहेत, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाच्या सचिव पुष्पलता पवार यांनी दिली.

मोबाईल बंदीविद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर मोबाईल बंदी आहे; पण केंद्रांवरील सर्व पर्यवेक्षकांनाही मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी आपले मोबाईल केंद्र संचालक यांच्याकडे जमा करायचे आहेत. पर्यवेक्षकांना परीक्षा कालावधीत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रत्येक केंद्र संचालकांचे नंबर पर्यवेक्षकांना यापूर्वीच दिले आहेत. त्यांनी तो घरामध्ये देण्याचा आहे. गरज पडल्यास केंद्र संचालकांना संपर्क साधावयाचा आहे.

परीक्षार्थींनी अर्धा तास आधी यावेपरीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पेपरपूर्वी अर्धा तास हजर होणे आवश्यक आहे. अकरा वाजता पेपर असलेल्या परीक्षार्थींना साडेदहा वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाच्या सचिव पुष्पलता पवार यांनी दिली. १०.४० वाजता उत्तरपत्रिका आणि १०.५० वाजता प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. दहा मिनिटांत त्यांनी प्रश्नपत्रिका वाचून घ्यावी.

अकरा वाजता लिहिण्याची परवानगी दिली जाईल. दुपारी तीनच्या पेपरसाठी परीक्षार्थींना २.३० वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. २.४० वाजता उत्तरपत्रिका देण्यात येईल. त्यानंतर २.५० वाजता प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. दहा मिनिटांत त्यांनी प्रश्नपत्रिका वाचून घ्यावी. तीन वाजता लिहिण्याची परवानगी दिली जाईल. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तणावविरहित परीक्षा द्यावी. परीक्षेबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकांशी चर्चा करावी, असे आवाहन सचिव पवार यांनी केले आहे.

जिल्हानिहाय परीक्षार्थी

  1. *कोल्हापूर : ३५९४
  2. *सांगली : ३६८३५
  3. *सातारा : ३९५१०

 

हेल्पलाईनची सुविधादहावी, बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करण्यासह त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने जिल्हानिहाय समुपदेशकांच्या माध्यमातून हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यासह विभागीय मंडळाच्या कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून, त्यासाठी दूरध्वनी क्रमांक (०२३१-२६९६१०१, २६९६१०२, २६९६१०३) यावर सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.जिल्हानिहाय समुपदेशक असे

  1. * कोल्हापूर : भीमगोंडा पाटील (९९२३१४९०३९)
  2. * सांगली : सुरेखा माने (९९२२३५३७५२)
  3. * सातारा : शांतीनाथ मल्लाडे (९९२२२११५६४)

 

 

टॅग्स :examपरीक्षाkolhapurकोल्हापूरSangliसांगलीSatara areaसातारा परिसर