शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपुरीत सर्वाधिक वर्दळ, वाहनांच्या गर्दीत पायी चालायचं कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST

कोल्हापूर : भाजी मंडई, धान्य मार्केट, फळ बाजार यासह सुईपासून सायकलपर्यंत आणि मिरचीपासून मसाल्यापर्यंतची विक्री करणारी हजारो दुकाने एकाच ...

कोल्हापूर : भाजी मंडई, धान्य मार्केट, फळ बाजार यासह सुईपासून सायकलपर्यंत आणि मिरचीपासून मसाल्यापर्यंतची विक्री करणारी हजारो दुकाने एकाच ठिकाणी असल्यामुळे लक्ष्मीपुरीसारख्या मध्यवर्ती भागात सर्वाधिक वर्दळ होत आहे. तेथे येणारी हजारो वाहने, रस्त्यावरील अतिक्रमण यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या गर्दीत चालायचे कसे? हाच एक गंभीर प्रश्न नव्याने तयार झाला आहे.

शहरातील गर्दीचे विकेंद्रीकरण करण्याऐवजी केंद्रीकरणच मोठ्याप्रमाणात होत असल्याने दिवसेंदिवस वर्दळीची समस्या गंभीर होत चालली आहे. सुदैवाने आतापर्यंत अपघात झाला नाही, कोणाला प्राणास मुकावे लागले नाही म्हणून त्याकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहिलेले दिसत नसले, तरी ही बेफिकीर कधी, तरी अडचणीची ठरणार आहे.

लक्ष्मीपुरीतील धान्य बाजारात रोज शेकडो अवजड वाहने येतात, मालाची चढ-उतार करतात. कधी कधी हीच अवजड वाहने लावायला जागा मिळत नाही. त्यामुळे येथील वाहतूक नेहमी ठप्प झालेली असते. याच ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत मोठी वर्दळ असते. तेथे येणाऱ्या नागरिकांची दुचाकी वाहने लावायला जागा मिळत नाही. फळांच्या गाड्यांनी तर चारही प्रमुख रस्ते व्यापून टाकले आहेत. त्याच ठिकाणी रिक्षा थांबे आहेत, त्यांची गर्दी असते. खरेदीसाठी शहराच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांची दुचाकी, चारचाकी वाहने याच गर्दीत मिळतात.

सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत लक्ष्मीपुरी परिसर म्हणजे गर्दीचा महापूर असतो. त्यातून खरेदी केलेले साहित्य हातात घेऊन चालत जाणे, रस्ता पार करणे म्हणजे एकप्रकारचे दिव्यच! रोजचीच ही समस्या आहे. या गर्दीवर ना महापालिका प्रशासनाला उत्तर सापडले आहे, ना पोलिसांना! कोरोना संसर्गाच्या काळात पोलीस व महापालिका कर्मचाऱ्यांनी या गर्दीवर सक्तीने निर्बंध लादले खरे; पण आता कसलेच नियंत्रण राहिलेले नाही.

- रोज ५० हजार नागरिकांची ये-जा-

लक्ष्मीपुरी हा शहराच्या मध्यवर्ती भाग असल्यामुळे शहराच्या चारी बाजूंनी नागरिक येथे दैनंदिन तसेच मासिक, वार्षिक खरेदी करण्यास येत असतात. दिवसभरात रोज चाळीस ते पन्नास हजारांच्या आसपास नागरिकांची ये-जा सुरू असते. रविवारी तर आठवडा बाजार भरत असतो, त्यावेळी ही गर्दी दुप्पट होते.

- फूटपाथचे अस्तित्वच नाही-

लक्ष्मीपुरीतील रस्ते मोठे प्रशस्त असले, तरी एकाही रस्त्यावर फूटपाथ करण्यात आलेला नाही. गतवर्षी प्रथमच अनेक वर्षांनी या परिसरात भूमिगत गटारी, रस्त्यांची कामे केली; पण फटपाथ काही केले नाहीत. त्यामुळे नागरिकांना चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.

- अतिक्रमण हटाव दाखवायलाच -

महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक रोज लक्ष्मीपुरी बाजारात फेरी मारते. गाडी आली की फळविक्रेते गाड्या जाग्यावरून हटवितात, आतील रस्त्यावर जातात. गाडी गेली की पुन्हा रस्ता व्यापला जातो.

अधिकारी म्हणतात.....

कोरोना काळात भाजी मंडईतील गर्दी पन्नास टक्के कमी करण्यात आली आहे.आठवडा बाजार बंद करण्यात आला आहे. फळविक्रेत्यांना अंतर ठेवून जागा देण्यात आली आहे. त्यामुळे येथील गर्दी बऱ्यापैकी नियंत्रणात आणली आहे.

सचिन जाधव, इस्टेट अधिकारी

कोल्हापूर महानगरपालिका

लक्ष्मीपुरी बाजारपेठ शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. त्याठिकाणी होणाऱ्या गर्दीवर कोरोना संसर्गाच्या काळात चांगले नियंत्रण राखले गेले, परंतु हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

अशोक येरुडकर, पादचारी

लक्ष्मीपुरीत होणारी गर्दी मोठी आहे. या गर्दीतून चालत जाणे म्हणजे एक दिव्यच आहे. विक्रेत्यांची बैठक व्यवस्था, पार्किंगची सोय झाली तरच ही गर्दी सुसह्य होईल.

कृष्णात नलवडे, पादचारी

(फोटो देणार आहे.)