शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठीची फरफट थांबणार तरी कधी ?

By admin | Updated: August 16, 2016 23:40 IST

ग्रामस्थांचा संतप्त सवाल : स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६९ वर्षांत रस्ताच नाही

शिवराज लोंढे -- सावरवाडी --स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या ६९ वर्षांत करवीर तालुक्यातील चाफोडी ते बेरकळवाडी हा डोंगरी भागातील रस्ता झालेला नाही. लोकप्रतिनिधी, प्रशासन व्यवस्थेने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे गेली पाच दशके दुर्लक्ष केल्याने सामान्य जनतेला अनंत यातना भोगाव्या लागत आहेत.करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील सातेरी महादेवाच्या कुशीत वसलेल्या चाफोडी ते बेरकळवाडी या दोन गावांना जोडणारा रस्ता अद्याप झालेला नाही. पाऊलवाटेनेच ग्रामस्थांना ये-जा करावी लागते. संबंधित खात्यात लेखी निवेदन देऊनही डोंगरी भागातील रस्त्याच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. माध्यमिक शाळेतील शाळकरी मुला-मुलींना काटेरी पाऊलवाटेनेच, तर माध्यमिक शिक्षणासाठी चाफोडी गावाकडे ये-जा करावी लागते. १९७२ ला पडलेल्या दुष्काळावेळी रोजगार हमीतून पाऊलवाट तयार करण्यात आली. ती आजतागायत तशीच आहे. चाफोडी, बरकळवाडी, दोनवडी या तीन गावांची एकच ग्रुप ग्रामपंचायत आहे. मात्र, शासकीय निधीअभावी या वाटेचे रुंदीकरण अथवा दुरुस्ती झालेली नाही. नागमोडी वळणे घेत दऱ्या-खोऱ्यातून जाणाऱ्या या पायवाटेने शाळकरी मुली, स्त्रिया यांच्या संरक्षणाचा प्रश्न कित्येकदा ऐरणीवर आहे. डोंगराळ प्रदेश असल्यामुळे खाचखळग्यांतून, जंगली झाडाझुडपांतून या दोन्ही गावांच्या ग्रामस्थांची ये-जा सुरू असते.चाफोडी व बेरकळवाडी गावच्या ग्रामस्थांना रस्त्याची मोठी आवश्यकता असून, वाहतुकीची मोठी गैरसोय असल्यामुळे सातेरी, धोंडेवाडी, बीडशेड मार्गे २0 किलोमीटर अंतरावरून चाफोडी गावाकडे वाहने घेऊन ये-जा करावी लागते.बेरकळवाडी, दोनवडी गावांतील ग्रामस्थांना शिधापत्रिकेवरील अन्नधान्य, सहकारी बँक व्यवहार, विविध दाखले काढण्यासाठी अथवा खतांचा पुरवठा करणे, शेती, आॅफिसला जाणे यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. चाफोडी ते बेरकळवाडी हा चार किलोमीटरचा रस्ता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६९ वर्षांत झाला नसल्याने सामान्य जनतेतून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याच्या अभावामुळे डोंगरी भागातील मुलींना माध्यमिक शिक्षणाला मुकावे लागते, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात कधी येणार? चाफोडी ते बेरकळवाडी या रस्त्यासाठी ग्रामस्थांना लढा उभारावा लागणार आहे.चाफोडी ते बरकळवाडी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. डोंगरी भागातून पाऊलवाटेने ग्रामस्थ, शाळकरी मुलांना ये-जा करावी लागते. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासकीय फंड त्वरित मंजूर करून दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचा लढा उभारल्याशिवाय पर्याय नाही.- राणी पाटील, सरपंच, ग्रामपंचायत चाफोडी.डोंगरी भागातील रस्ता दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. चार पिढ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे स्वप्न पाहिले; पण अजून रस्ता झालेला नाही. रस्त्याचे काम त्वरित करावे, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येणार आहे.- अर्जुन कोपार्डे, उपसरपंच बेरकळवाडी