शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठीची फरफट थांबणार तरी कधी ?

By admin | Updated: August 16, 2016 23:40 IST

ग्रामस्थांचा संतप्त सवाल : स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६९ वर्षांत रस्ताच नाही

शिवराज लोंढे -- सावरवाडी --स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या ६९ वर्षांत करवीर तालुक्यातील चाफोडी ते बेरकळवाडी हा डोंगरी भागातील रस्ता झालेला नाही. लोकप्रतिनिधी, प्रशासन व्यवस्थेने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे गेली पाच दशके दुर्लक्ष केल्याने सामान्य जनतेला अनंत यातना भोगाव्या लागत आहेत.करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील सातेरी महादेवाच्या कुशीत वसलेल्या चाफोडी ते बेरकळवाडी या दोन गावांना जोडणारा रस्ता अद्याप झालेला नाही. पाऊलवाटेनेच ग्रामस्थांना ये-जा करावी लागते. संबंधित खात्यात लेखी निवेदन देऊनही डोंगरी भागातील रस्त्याच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. माध्यमिक शाळेतील शाळकरी मुला-मुलींना काटेरी पाऊलवाटेनेच, तर माध्यमिक शिक्षणासाठी चाफोडी गावाकडे ये-जा करावी लागते. १९७२ ला पडलेल्या दुष्काळावेळी रोजगार हमीतून पाऊलवाट तयार करण्यात आली. ती आजतागायत तशीच आहे. चाफोडी, बरकळवाडी, दोनवडी या तीन गावांची एकच ग्रुप ग्रामपंचायत आहे. मात्र, शासकीय निधीअभावी या वाटेचे रुंदीकरण अथवा दुरुस्ती झालेली नाही. नागमोडी वळणे घेत दऱ्या-खोऱ्यातून जाणाऱ्या या पायवाटेने शाळकरी मुली, स्त्रिया यांच्या संरक्षणाचा प्रश्न कित्येकदा ऐरणीवर आहे. डोंगराळ प्रदेश असल्यामुळे खाचखळग्यांतून, जंगली झाडाझुडपांतून या दोन्ही गावांच्या ग्रामस्थांची ये-जा सुरू असते.चाफोडी व बेरकळवाडी गावच्या ग्रामस्थांना रस्त्याची मोठी आवश्यकता असून, वाहतुकीची मोठी गैरसोय असल्यामुळे सातेरी, धोंडेवाडी, बीडशेड मार्गे २0 किलोमीटर अंतरावरून चाफोडी गावाकडे वाहने घेऊन ये-जा करावी लागते.बेरकळवाडी, दोनवडी गावांतील ग्रामस्थांना शिधापत्रिकेवरील अन्नधान्य, सहकारी बँक व्यवहार, विविध दाखले काढण्यासाठी अथवा खतांचा पुरवठा करणे, शेती, आॅफिसला जाणे यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. चाफोडी ते बेरकळवाडी हा चार किलोमीटरचा रस्ता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६९ वर्षांत झाला नसल्याने सामान्य जनतेतून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याच्या अभावामुळे डोंगरी भागातील मुलींना माध्यमिक शिक्षणाला मुकावे लागते, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात कधी येणार? चाफोडी ते बेरकळवाडी या रस्त्यासाठी ग्रामस्थांना लढा उभारावा लागणार आहे.चाफोडी ते बरकळवाडी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. डोंगरी भागातून पाऊलवाटेने ग्रामस्थ, शाळकरी मुलांना ये-जा करावी लागते. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासकीय फंड त्वरित मंजूर करून दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचा लढा उभारल्याशिवाय पर्याय नाही.- राणी पाटील, सरपंच, ग्रामपंचायत चाफोडी.डोंगरी भागातील रस्ता दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. चार पिढ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे स्वप्न पाहिले; पण अजून रस्ता झालेला नाही. रस्त्याचे काम त्वरित करावे, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येणार आहे.- अर्जुन कोपार्डे, उपसरपंच बेरकळवाडी