शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

रस्त्यासाठीची फरफट थांबणार तरी कधी ?

By admin | Updated: August 16, 2016 23:40 IST

ग्रामस्थांचा संतप्त सवाल : स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६९ वर्षांत रस्ताच नाही

शिवराज लोंढे -- सावरवाडी --स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या ६९ वर्षांत करवीर तालुक्यातील चाफोडी ते बेरकळवाडी हा डोंगरी भागातील रस्ता झालेला नाही. लोकप्रतिनिधी, प्रशासन व्यवस्थेने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे गेली पाच दशके दुर्लक्ष केल्याने सामान्य जनतेला अनंत यातना भोगाव्या लागत आहेत.करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील सातेरी महादेवाच्या कुशीत वसलेल्या चाफोडी ते बेरकळवाडी या दोन गावांना जोडणारा रस्ता अद्याप झालेला नाही. पाऊलवाटेनेच ग्रामस्थांना ये-जा करावी लागते. संबंधित खात्यात लेखी निवेदन देऊनही डोंगरी भागातील रस्त्याच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. माध्यमिक शाळेतील शाळकरी मुला-मुलींना काटेरी पाऊलवाटेनेच, तर माध्यमिक शिक्षणासाठी चाफोडी गावाकडे ये-जा करावी लागते. १९७२ ला पडलेल्या दुष्काळावेळी रोजगार हमीतून पाऊलवाट तयार करण्यात आली. ती आजतागायत तशीच आहे. चाफोडी, बरकळवाडी, दोनवडी या तीन गावांची एकच ग्रुप ग्रामपंचायत आहे. मात्र, शासकीय निधीअभावी या वाटेचे रुंदीकरण अथवा दुरुस्ती झालेली नाही. नागमोडी वळणे घेत दऱ्या-खोऱ्यातून जाणाऱ्या या पायवाटेने शाळकरी मुली, स्त्रिया यांच्या संरक्षणाचा प्रश्न कित्येकदा ऐरणीवर आहे. डोंगराळ प्रदेश असल्यामुळे खाचखळग्यांतून, जंगली झाडाझुडपांतून या दोन्ही गावांच्या ग्रामस्थांची ये-जा सुरू असते.चाफोडी व बेरकळवाडी गावच्या ग्रामस्थांना रस्त्याची मोठी आवश्यकता असून, वाहतुकीची मोठी गैरसोय असल्यामुळे सातेरी, धोंडेवाडी, बीडशेड मार्गे २0 किलोमीटर अंतरावरून चाफोडी गावाकडे वाहने घेऊन ये-जा करावी लागते.बेरकळवाडी, दोनवडी गावांतील ग्रामस्थांना शिधापत्रिकेवरील अन्नधान्य, सहकारी बँक व्यवहार, विविध दाखले काढण्यासाठी अथवा खतांचा पुरवठा करणे, शेती, आॅफिसला जाणे यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. चाफोडी ते बेरकळवाडी हा चार किलोमीटरचा रस्ता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६९ वर्षांत झाला नसल्याने सामान्य जनतेतून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याच्या अभावामुळे डोंगरी भागातील मुलींना माध्यमिक शिक्षणाला मुकावे लागते, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात कधी येणार? चाफोडी ते बेरकळवाडी या रस्त्यासाठी ग्रामस्थांना लढा उभारावा लागणार आहे.चाफोडी ते बरकळवाडी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. डोंगरी भागातून पाऊलवाटेने ग्रामस्थ, शाळकरी मुलांना ये-जा करावी लागते. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासकीय फंड त्वरित मंजूर करून दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचा लढा उभारल्याशिवाय पर्याय नाही.- राणी पाटील, सरपंच, ग्रामपंचायत चाफोडी.डोंगरी भागातील रस्ता दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. चार पिढ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे स्वप्न पाहिले; पण अजून रस्ता झालेला नाही. रस्त्याचे काम त्वरित करावे, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येणार आहे.- अर्जुन कोपार्डे, उपसरपंच बेरकळवाडी