शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

घरफोड्या, चोरट्यांचा कोल्हापूर शहरात धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:29 IST

वर्षअखेरीला शहरासह उपनगरांत घरफोडी, लूटमारीच्या घटनांनी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे. चोरट्यांच्या धुमाकुळामुळे नागरिकांसह घरांची सुरक्षितता धोक्याची बनली आहे.

ठळक मुद्देघरफोड्या, चोरट्यांचा कोल्हापूर शहरात धुमाकूळपोलिसांना चोरट्यांचे चॅलेंज : नागरिकांची उडाली झोप

कोल्हापूर : वर्षअखेरीला शहरासह उपनगरांत घरफोडी, लूटमारीच्या घटनांनी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे. चोरट्यांच्या धुमाकुळामुळे नागरिकांसह घरांची सुरक्षितता धोक्याची बनली आहे.

‘दिसले बंद घर की फोडले,’ अशी भयावह अवस्था याठिकाणी पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्याभरापासून चोरट्यांनी धुमाकूळ घालून पोलिसांना थेट चॅलेंज दिले आहे. या वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांची झोपच उडाली आहे.दिवसें-दिवस घरफोड्या, चोरी, लूटमार आदी गुन्ह्यांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्यांतील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे फारच चिंताजनक ठरत आहे. नाताळच्या सुटीला लोक परगावी गेले आहेत तर काहीजण कुटुंबासह फिरायला बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत बंद घर हेरून ते रात्रीच सोडा दिवसाही फोडण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र गस्तीचे प्रमाण वाढविण्याचे आदेश दिले आहेत; परंतु चोरटे पोलिसांच्या गस्तीची वेळ पाहूनच चोरीचा प्लॅन करत आहेत. पोलीस दप्तरी असलेल्या शेकडो चोºयांचा अद्यापही उलगडा पोलिसांना करता आलेला नाही.कारंडे मळा येथे चोरट्यांनी महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून लाखो रुपयांचा ऐवज भरदिवसा लंपास केला होता. त्यांचा थांगपत्ता शाहूपुरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना अद्यापही लागलेला नाही. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी होणाऱ्यां लक्ष्मीपूजनाचे पैसे आणि दागिन्यांवरही चोरट्यांनी हात साफ करून घेतले आहेत. गेल्या महिन्याभरातील सर्व घरफोड्या दरवाजा व खिडकीचे लोखंडी गज वाकवून झाल्या आहेत.

दिवसेंदिवस घरफोड्या वाढत असतानाही पोलीस मात्र सुस्त बसले आहेत. रात्र गस्त नाही की घरफोड्यांची उकल करण्यासाठी कोणतेही प्रयत्न नाहीत. घरफोडी झाल्याचे समजताच परिसरात जाऊन पाहणी करायची, चोरीस गेलेला मुद्देमाल कागदावर ओढायचा, एवढे झाले की पुढे तपास ठप्प.

गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात येऊनही त्याकडे ते दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे; त्यामुळे घरफोड्या करूनही चोरटे मोकाट फिरत आहेत. गेल्या महिन्याभरात झालेल्या एकाही घरफोडीचा मागमूस पोलिसांना लागलेला नाही. चौकशी केली असता ‘तपास सुरू आहे,’ इतकेच सांगितले जाते. पोलिसांच्या निष्क्रीय कामगिरीमुळे नागरिकांची झोपच उडाली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर