शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

घर, पडझडीनंतर आता शेती पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 20:41 IST

Flood Kolhapur: घर, पडझडीचे पंचनामे प्राधान्याने करण्याचे शासन आदेश असल्याने लांबणीवर पडलेले शेती पंचनामे अखेर बुधवारपासून सुरू झाले. सर्वाधिक नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातून पंचनाम्याचा श्रीगणेशा करण्यात आला. कृषी, महसूल, जिल्हा परिषद या तीन यंत्रणांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून पाहणीचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देघर, पडझडीनंतर आता शेती पंचनामे सुरूशिरोळमधून सुरुवात : पंचनाम्याचा अंतिम अहवाल महिनाअखेरीस

कोल्हापूर: घर, पडझडीचे पंचनामे प्राधान्याने करण्याचे शासन आदेश असल्याने लांबणीवर पडलेले शेती पंचनामे अखेर बुधवारपासून सुरू झाले. सर्वाधिक नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातून पंचनाम्याचा श्रीगणेशा करण्यात आला. कृषी, महसूल, जिल्हा परिषद या तीन यंत्रणांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून पाहणीचे नियोजन केले आहे.जिल्ह्यात २२ ते २४ जुलै या कालावधीत झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे आलेल्या महापुरात नदीकाठासह पूरग्रस्त भागातील ५८ हजार ५०० हेक्टरवरील पिके जमिनदोस्त झाल्याचा नजरअंदाज अहवाल कृषी विभागाने तयार केला होता. त्यानुसार प्राथमिक टप्प्यावर ६६ कोटींचे नुकसान गृहीत धरण्यात आले होते, पण महापूर ओसरण्याचा वेग कमी झाल्याने नुकसानीची टक्केवारी वाढतच गेली आहे.

पिके कुजल्याचे दिसत असतानाही प्रत्यक्षात कृषी विभागाकडून पंचनामे सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती, पण घर आणि पडझडीच्या पंचनाम्यांना प्राधान्य द्यावे, असे शासन आदेश आल्याने कृषी विभाग गेले आठ दिवस बऱ्यापैकी शांत होता. महसूल व गावपातळीवरील यंत्रणाही त्याच पंचनाम्यात गुंतल्याने कृषी विभागाकडे यंत्रणाच उपलब्ध नव्हती. अखेर हे पंचनामे बऱ्यापैकी मार्गी लागल्यानंतर बुधवारपासून प्रत्यक्षात शेतीच्या पंचनाम्यांना हात घालण्यात आला आहे.महसूलकडून तलाठी, जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवक व कृषी विभागाकडून कृषी सहाय्यक असे पथक तयार करून त्यांच्याकडे किमान ३ ते कमाल १५ गावे देऊन पंचनामे करण्यास सांगण्यात आले. बुधवारी शिरोळ तालुक्यातील ५२ पूरग्रस्त गावांपैकी ४३ गावांमध्ये या पथकाकडून पाहणीचे काम सुरू झाले.१५ दिवसांपासून पिके पाण्याखालीगेल्या १५ दिवसांपासून पिके पाण्याखाली असल्याने अक्षरश: चिखल झाला आहे. अशा परिस्थीतीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे, पण अद्याप शेतीचे पंचनामेच सुरू झाले नसल्याने नुकसानीचा अंदाज येत नव्हता.पावसाचा व्यत्यय तरी पाहणीजिल्ह्यातील बहुतांशी पिकांचे नुकसान हे नदीकाठावरचे झाले आहे. पण अजूनही पाणी ओसरलेले नाही, शिवाय जेथे पाणी ओसरले आहे, तेथेही मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. तेथे जाणे अवघड आहे शिवाय आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शिवारापर्यंत पोहचणे हेच मोठे दिव्य आहे, तरीदेखील तपासणी पथक तेथेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करत आहे. 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरTahasildarतहसीलदार