शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

घर, पडझडीनंतर आता शेती पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 20:41 IST

Flood Kolhapur: घर, पडझडीचे पंचनामे प्राधान्याने करण्याचे शासन आदेश असल्याने लांबणीवर पडलेले शेती पंचनामे अखेर बुधवारपासून सुरू झाले. सर्वाधिक नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातून पंचनाम्याचा श्रीगणेशा करण्यात आला. कृषी, महसूल, जिल्हा परिषद या तीन यंत्रणांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून पाहणीचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देघर, पडझडीनंतर आता शेती पंचनामे सुरूशिरोळमधून सुरुवात : पंचनाम्याचा अंतिम अहवाल महिनाअखेरीस

कोल्हापूर: घर, पडझडीचे पंचनामे प्राधान्याने करण्याचे शासन आदेश असल्याने लांबणीवर पडलेले शेती पंचनामे अखेर बुधवारपासून सुरू झाले. सर्वाधिक नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातून पंचनाम्याचा श्रीगणेशा करण्यात आला. कृषी, महसूल, जिल्हा परिषद या तीन यंत्रणांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून पाहणीचे नियोजन केले आहे.जिल्ह्यात २२ ते २४ जुलै या कालावधीत झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे आलेल्या महापुरात नदीकाठासह पूरग्रस्त भागातील ५८ हजार ५०० हेक्टरवरील पिके जमिनदोस्त झाल्याचा नजरअंदाज अहवाल कृषी विभागाने तयार केला होता. त्यानुसार प्राथमिक टप्प्यावर ६६ कोटींचे नुकसान गृहीत धरण्यात आले होते, पण महापूर ओसरण्याचा वेग कमी झाल्याने नुकसानीची टक्केवारी वाढतच गेली आहे.

पिके कुजल्याचे दिसत असतानाही प्रत्यक्षात कृषी विभागाकडून पंचनामे सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती, पण घर आणि पडझडीच्या पंचनाम्यांना प्राधान्य द्यावे, असे शासन आदेश आल्याने कृषी विभाग गेले आठ दिवस बऱ्यापैकी शांत होता. महसूल व गावपातळीवरील यंत्रणाही त्याच पंचनाम्यात गुंतल्याने कृषी विभागाकडे यंत्रणाच उपलब्ध नव्हती. अखेर हे पंचनामे बऱ्यापैकी मार्गी लागल्यानंतर बुधवारपासून प्रत्यक्षात शेतीच्या पंचनाम्यांना हात घालण्यात आला आहे.महसूलकडून तलाठी, जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवक व कृषी विभागाकडून कृषी सहाय्यक असे पथक तयार करून त्यांच्याकडे किमान ३ ते कमाल १५ गावे देऊन पंचनामे करण्यास सांगण्यात आले. बुधवारी शिरोळ तालुक्यातील ५२ पूरग्रस्त गावांपैकी ४३ गावांमध्ये या पथकाकडून पाहणीचे काम सुरू झाले.१५ दिवसांपासून पिके पाण्याखालीगेल्या १५ दिवसांपासून पिके पाण्याखाली असल्याने अक्षरश: चिखल झाला आहे. अशा परिस्थीतीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे, पण अद्याप शेतीचे पंचनामेच सुरू झाले नसल्याने नुकसानीचा अंदाज येत नव्हता.पावसाचा व्यत्यय तरी पाहणीजिल्ह्यातील बहुतांशी पिकांचे नुकसान हे नदीकाठावरचे झाले आहे. पण अजूनही पाणी ओसरलेले नाही, शिवाय जेथे पाणी ओसरले आहे, तेथेही मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. तेथे जाणे अवघड आहे शिवाय आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शिवारापर्यंत पोहचणे हेच मोठे दिव्य आहे, तरीदेखील तपासणी पथक तेथेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करत आहे. 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरTahasildarतहसीलदार