शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

घर, पडझडीनंतर आता शेती पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 20:41 IST

Flood Kolhapur: घर, पडझडीचे पंचनामे प्राधान्याने करण्याचे शासन आदेश असल्याने लांबणीवर पडलेले शेती पंचनामे अखेर बुधवारपासून सुरू झाले. सर्वाधिक नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातून पंचनाम्याचा श्रीगणेशा करण्यात आला. कृषी, महसूल, जिल्हा परिषद या तीन यंत्रणांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून पाहणीचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देघर, पडझडीनंतर आता शेती पंचनामे सुरूशिरोळमधून सुरुवात : पंचनाम्याचा अंतिम अहवाल महिनाअखेरीस

कोल्हापूर: घर, पडझडीचे पंचनामे प्राधान्याने करण्याचे शासन आदेश असल्याने लांबणीवर पडलेले शेती पंचनामे अखेर बुधवारपासून सुरू झाले. सर्वाधिक नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातून पंचनाम्याचा श्रीगणेशा करण्यात आला. कृषी, महसूल, जिल्हा परिषद या तीन यंत्रणांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून पाहणीचे नियोजन केले आहे.जिल्ह्यात २२ ते २४ जुलै या कालावधीत झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे आलेल्या महापुरात नदीकाठासह पूरग्रस्त भागातील ५८ हजार ५०० हेक्टरवरील पिके जमिनदोस्त झाल्याचा नजरअंदाज अहवाल कृषी विभागाने तयार केला होता. त्यानुसार प्राथमिक टप्प्यावर ६६ कोटींचे नुकसान गृहीत धरण्यात आले होते, पण महापूर ओसरण्याचा वेग कमी झाल्याने नुकसानीची टक्केवारी वाढतच गेली आहे.

पिके कुजल्याचे दिसत असतानाही प्रत्यक्षात कृषी विभागाकडून पंचनामे सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती, पण घर आणि पडझडीच्या पंचनाम्यांना प्राधान्य द्यावे, असे शासन आदेश आल्याने कृषी विभाग गेले आठ दिवस बऱ्यापैकी शांत होता. महसूल व गावपातळीवरील यंत्रणाही त्याच पंचनाम्यात गुंतल्याने कृषी विभागाकडे यंत्रणाच उपलब्ध नव्हती. अखेर हे पंचनामे बऱ्यापैकी मार्गी लागल्यानंतर बुधवारपासून प्रत्यक्षात शेतीच्या पंचनाम्यांना हात घालण्यात आला आहे.महसूलकडून तलाठी, जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवक व कृषी विभागाकडून कृषी सहाय्यक असे पथक तयार करून त्यांच्याकडे किमान ३ ते कमाल १५ गावे देऊन पंचनामे करण्यास सांगण्यात आले. बुधवारी शिरोळ तालुक्यातील ५२ पूरग्रस्त गावांपैकी ४३ गावांमध्ये या पथकाकडून पाहणीचे काम सुरू झाले.१५ दिवसांपासून पिके पाण्याखालीगेल्या १५ दिवसांपासून पिके पाण्याखाली असल्याने अक्षरश: चिखल झाला आहे. अशा परिस्थीतीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे, पण अद्याप शेतीचे पंचनामेच सुरू झाले नसल्याने नुकसानीचा अंदाज येत नव्हता.पावसाचा व्यत्यय तरी पाहणीजिल्ह्यातील बहुतांशी पिकांचे नुकसान हे नदीकाठावरचे झाले आहे. पण अजूनही पाणी ओसरलेले नाही, शिवाय जेथे पाणी ओसरले आहे, तेथेही मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. तेथे जाणे अवघड आहे शिवाय आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शिवारापर्यंत पोहचणे हेच मोठे दिव्य आहे, तरीदेखील तपासणी पथक तेथेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करत आहे. 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरTahasildarतहसीलदार