आठनंतर हॉटेल्स बंद... पार्सल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:15 IST2021-03-30T04:15:05+5:302021-03-30T04:15:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाने रात्री आठनंतर जमावबंदीचे नियम लावल्याने हॉटेल व्यावसायिक पुन्हा अडचणीत आले आहेत. जेवणाची ...

Hotels closed after eight ... parcels open | आठनंतर हॉटेल्स बंद... पार्सल सुरू

आठनंतर हॉटेल्स बंद... पार्सल सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य शासनाने रात्री आठनंतर जमावबंदीचे नियम लावल्याने हॉटेल व्यावसायिक पुन्हा अडचणीत आले आहेत. जेवणाची खरी वेळ आठनंतर सुरू होते. पण त्याचवेळी हॉटेल्स-रेस्टॉरंट बंद करावी लागणार असल्याने त्याचा थेट परिणाम व्यवसायावर होणार आहे. कोल्हापुरात अद्याप कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नाही किंवा कंटेनमेंट झोन वगळता अन्यत्र ही वेळ वाढवून दहा करण्यात यावी, अशी हॉटेल व्यावसायिकांची मागणी आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षापासून सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत असताना, गेल्या दहा-बारा दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध घालायला सुरुवात केली असून रात्री आठनंतर जमावबंदी लागू केली आहे. शिवाय हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या ठिकाणी केवळ पार्सल सेवा किंवा घरपोच सेवा सुरू असेल. दिवसभराच्या कामकाजानंतर लोक रात्रीच जेवणाचा बेत आखतात. ही वेळ कुटुंबियांसोबत, मित्रमंडळींसोबत घालविण्याची असते. पार्सल सेवा असली तरी, प्रत्यक्ष हॉटेलमध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेण्याचा अनुभव वेगळा असतो. त्यात खवय्या कोल्हापुरात तर रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स, खानावळी भरलेल्या असतात.

गतवर्षी सगळे व्यवसाय सुरू झाल्यानंतर सर्वात शेवटी जिल्हा प्रशासनाने हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिली. आता पुन्हा आठनंतर बंदमुळे ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून जेवता येणार नाही. त्याचा परिणाम व्यवसायावर होणार आहे.

---

हॉटेल व्यवसायाची मुख्य उलाढाल रात्री आठनंतरच होते. त्यामुळे प्रशासनाने सरसकट बंदीचा निर्णय घेऊ नये. हॉटेल्स व्यावसायिक पुरेशी दक्षता घेत आहेत. त्या त्या जिल्ह्याची कोरोना स्थिती पाहूनच याबाबतचा निर्णय व्हायला हवा.

- उज्ज्वल नागेशकर

अध्यक्ष,

कोल्हापूर हॉटेल मालक संघ कोल्हापूर

गतवर्षी सर्व उद्योग व्यवसाय सुरू झाल्यानंतर हॉटेल्सना परवानगी देण्यात आली. आता सरसकट आठनंतर हॉटेलमध्ये बसून जेवण्यावर बंदी आहे. पण हीच वेळ जेवण्याची असते. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा विचार करून तसेच कंटेनमेंट झोन वगळून रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी.

- आनंद माने (हॉटेल व्यावसायिक)

--

दृष्टिक्षेपात हॉटेल व्यवसाय...

जिल्ह्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स व बार मिळून एकत्रित संख्या : ३ हजार

प्रतिदिन उलाढाल : ५ कोटी

कोल्हापूर शहरातील छोट्या-मोठ्या हॉटेल्सची संख्या : सुमारे १२००

Web Title: Hotels closed after eight ... parcels open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.