शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

माणगाव परिषदेमुळे इतिहास बदलला, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 14:21 IST

व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणे आवश्यक

रुकडी माणगाव : माणगाव परिषदेमुळे भारताचा इतिहास बदलला आहे. परिषदेमुळे सर्व समाजांचा चेहरामोहरा बदलल्याचे आपण सर्व जण साक्षीदार आहोत. व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. माणगाव येथे माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सव सांगता समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज होते.डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्या समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याची गरज असून त्यांना सेवा संस्था, पतसंस्था या माध्यमातून मदत केली पाहिजे. आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांची लढाई लढायचे आहे. आपली बांधीलकी विचारांशी असली पाहिजे.छत्रपती शाहू महाराज म्हणाले, सर्व समाज एक समान बनवायचे असेल व समतावाद प्रस्थापित करायचे असेल तर आंबेडकर यांचा विचार सर्वांनी जोपासला पाहिजे. प्रकाश आंबेडकर हे योग्य दिशा व मार्ग दाखवतील. समाजामध्ये वंचित असणाऱ्या घटकांना एकत्रित येणे आवश्यक आहे.

याप्रसंगी माजी प्राचार्य बापूसाहेब माने, अंजली आंबेडकर यांनी विचार व्यक्त केले. शाहू महाराजांचे वंशज श्रीमंत छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज ॲड. प्रकाश आंबेडकर, तत्कालीन परिषदेची संपूर्ण जबाबदारी पार पाडणारे अप्पासाहेब पाटील यांचे वंशज विक्रमसिंह ऊर्फ राजू पाटील या तिन्ही घराण्यांतील वंशजांचा यावेळी सन्मान करण्यात आला. इचलकरंजी बार असोसिएशनच्या सचिवपदी ॲड. राजू शिंगे यांची निवड झाल्याबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. समारंभाचे निमंत्रक प्राचार्य बापूसाहेब माने यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा दिली. छत्रपती शाहू महाराज  व ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिज्ञा घेतली.

माणगाव परिषदेचे शतकोत्तर चिंतन, अप्पासाहेब पाटील व्यर्थ ना हो बलिदान, क्रांतीचे साक्षीदार या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवर यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक अंबपकर यांनी केले, तर आभार व्ही. पी. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन  समीर माने यांनी व्यक्त केले.

समारंभास मुरलीधर कांबळे, अनिल कांबळे, मधुकर माणगावकर, डॉ. संभाजी बी राजे, भीमराव माणगावकर, एस. आर. गवळी, आदी उपस्थित होते. या समारंभास कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.

पावसाचा असाही योगायोग.....माणगाव येथे १९२० साली झालेल्या परिषदेत राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अप्पासाहेब पाटील उपस्थित होते. त्यावेळी देखील जोरदार पाऊस झाला होता. शतकोत्तर सांगता समारंभास राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज ॲड. प्रकाश आंबेडकर व अप्पासाहेब पाटील यांचे वंशज विक्रमसिंह पाटील यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमास देखील पावसाने हजेरी लावली. कार्यक्रमस्थळी या योगायोगाची चर्चा होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर