शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

Kolhapur- विशाळगडावरील अतिक्रमण: संभाजीराजेंच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांचा सवाल

By उद्धव गोडसे | Updated: July 10, 2024 15:50 IST

राज्यातील सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचे आवाहन, अन्यथा..

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणांचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही माजी खासदार संभाजीराजेंनी घेतलेली आंदोलनाची भूमिका अनाकलनीय आहे. संभाजीराजेंनी याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे काढावित अन्यथा हिंदुत्ववादी संघटना वक्फ बोर्डाच्या जागांवर मंदिरे बांधतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी बुधवारी (दि. १०) पत्रकार परिषदेतून दिला.यावेळी ते म्हणाले, 'विशाळगडावरील काही स्थानिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेला ब्रेक लागल्याचे सर्वांना माहिती आहे. जिल्हा प्रशासनानेही अतिक्रमणे हटवण्याची भूमिका घेतली आहे. सरकारही त्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय नक्कीच सकारात्मक येईल. असे असताना माजी खासदार संभाजीराजे यांनी घेतलेली आंदोलनाची भूमिका अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. त्यांनी केवळ विशाळगडापुरता विचार न करता राज्यातील सर्वच गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी आंदोलन सुरू करावे. राज्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना त्यांच्यासोबत राहतील.'

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विशाळगडावरील अतिक्रमण वाढले. त्यामुळे सरकारने ते काढण्याचा खर्च प्रशासकीय अधिका-यांकडून वसूल करावा, अन्यथा वक्फ बोर्डाच्या जागांवर मंदिरे बांधण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला. पत्रकार परिषदेसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कुंदन पाटील यांच्यासह दीपक देसाई, उदय भोसले, मनोहर सोरप, गजानन तोडकर, निरंजन शिंदे, अभिजित पाटील, योगेश केळकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, आशिष लोखंडे, सुनील सामंत, आदी उपस्थित होते.

वाद केवळ अतिक्रमणांचाविशाळगडावरील वाद दोन धर्मातील नसून तो केवळ अतिक्रमणांचा आहे. दोन्ही धर्मियांची अतिक्रमणे आहेत. सर्वच अतिक्रमणे काढून गड स्वच्छ आणि सुरक्षित करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे. त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह व्हिडिओ, मेसेज तयार करून ते सोशल मीडियात व्हायरल करू नयेत, असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती