शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सरकार आमच्या मरणाची वाट बघतंय का?, ज्येष्ठ मल्लांचा सवाल; सात महिने मानधन रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 11:44 IST

फडणवीस यांची घोषणा अजूनही हवेतच

कोल्हापूर : लाल माती गाजविणाऱ्या हिंदकेसरी व ज्येष्ठ मल्ल व त्यांच्या पश्चात विधवा पत्नींना राज्य शासनाकडून मिळणारे मानधन गेले सात महिन्यांपासून रखडले आहे. मानधनासाठी वारंवार क्रीडा कार्यालयाकडे विनंत्या करण्यापेक्षा मेलेले बरे. आमच्या मरणाची सरकार वाट पाहतंय का, असा सवाल आता ही ज्येष्ठ मल्ल मंडळी विचारू लागली आहेत.हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्ल म्हटले की, राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्यातील मंत्रिमहोदय त्यांचा सन्मान केला जात होता. वेळच्या वेळी ज्येष्ठ झालेल्या मल्लांचे मानधन त्यांच्या खात्यावर जमा होत असे. कालांतराने सरकार बदलत गेले आणि मल्लांचे दिवसही पालटत गेले. महिन्याकाठी थेट बँक खात्यावर जमा होणारे मानधन कधी वर्षभर, तर कधी चार महिने, सहा महिने जमा होईनासे झाले आहे. या ज्येष्ठ मल्ल मंडळी व त्यांच्या विधवा पत्नींना सरकारकडून सहा हजार रुपये मानधन म्हणून दिले जाते. तेही आता सात महिन्यांपासून रखडले आहे. या ज्येष्ठ मंडळींनी त्यांच्या तरुण काळात जबरदस्त व्यायाम केल्याने त्यांना आता व्याधींनी ग्रासले आहे. उतारवयात या मानधनातून औषधोपचाराचा खर्च भागतो. पण तोही आता हाती मिळताना क्रीडा खात्याला विनंत्या कराव्या लागत आहेत. बिकट परिस्थितीत औषधोपचाराचा तरी खर्च भागावा म्हणून क्रीडा खाते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी या मल्लांकडून होत आहे.

फडणवीस यांची घोषणा अजूनही हवेतचपुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील बक्षीस समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ मल्लांचे मानधन आताच्या मानधनाच्या तिप्पट करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही यात एक पैसाही वाढ झालेली नाही आणि आहे तेही लवकर हातात मिळेनासे झाले आहे.

आमच्या हयातीतच मानधन महिन्याच्या महिन्याला थेट बँकेत जमा होऊ दे. सरकार काय आमच्या मरणाची वाट बघतंय का? आमची लाल माती प्रतिसेवा सरकार विसरून गेलंय का? - हिंदकेसरी दिनानाथसिंह 

सध्या जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा प्रभाराबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून दिलेला नाही. याबाबतची माहिती घेऊन हे मानधन त्वरित काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करू. - माणिक वाघमारे, क्रीडा उपसंचालक, कोल्हापूर विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्ती