शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वारणेच्या पुनर्वसनाचे ४0 वर्षांपासून भिजत घोंगडे : ७०० जणांचे अंशत: पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:54 IST

तब्बल ४0 वर्षे होऊनही वारणा धरणग्रस्तांचे प्रश्न अजूनही भिजतच पडले आहेत. जवळपास ९५० प्रकल्पग्रस्त कुटुंबांपैकी ७०० जणांचे अंशत: पुनर्वसन झाले आहे. उर्वरित २५0 जणांना अजिबात जमीन मिळालेली नाही. वारणा धरणग्रस्तांच्या पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगलेमध्ये ११ वसाहती असून, येथे

ठळक मुद्दे२५0 जण अजूनही प्रतीक्षेत; जिल्हा पुनर्वसन विभागाची अनास्था कारणीभूत

प्रविण देसाई ।कोल्हापूर : तब्बल ४0 वर्षे होऊनही वारणा धरणग्रस्तांचे प्रश्न अजूनही भिजतच पडले आहेत. जवळपास ९५० प्रकल्पग्रस्त कुटुंबांपैकी ७०० जणांचे अंशत: पुनर्वसन झाले आहे. उर्वरित २५0 जणांना अजिबात जमीन मिळालेली नाही. वारणा धरणग्रस्तांच्या पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगलेमध्ये ११ वसाहती असून, येथे नागरी सुविधांचीही वानवा दिसत आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा पुनर्वसन विभागाच्या अनास्थेमुळेच हे प्रश्न प्रलंबित असल्याचे दिसत आहे.

शाहूवाडी व शिराळा सीमेवरील वारणा धरणाच्या कामाला १९६५ पासून सुरुवात झाली; परंतु खऱ्या अर्थाने १९७६ ला आलेल्या पुनर्वसन कायद्याने या कामाला गती आली. यामध्ये परिसरातील सात गावे उठविण्यात आली. यामध्ये जवळपास ९५० प्रकल्पग्रस्तांचा समावेश होता. १९८५ ला या धरणाचे काम पूर्ण झाले. हे काम पूर्ण झाले तरी ज्यांनी आपल्या जमिनी व घरे या प्रकल्पासाठी पणाला लावली त्यांचे मात्र पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले नाही. संकलनाचा घोळ, तसेच त्याची दुरुस्तीही नसल्याने ७०० प्रकल्पग्रस्तांचेच अंशत: पुनर्वसन झाले, असे म्हणावे लागेल. त्यांना काही प्रमाणातच भूखंड व जमिनी मिळालेल्या आहेत. तर २५0 जणांना अजिबातच जमीन मिळालेली नाही. अनेक प्रकल्पग्रस्तांना देवस्थानच्या जमिनी दिल्या आहेत. देवस्थानच्या जमिनी जिल्हाधिकाºयांच्या नावावरील नसल्याने त्या केव्हाही काढून घेण्याची भीती आहे. काहींना गायरानातच भूखंड दिले असून, तेथे कोणतेच नियोजन नसल्याने त्यांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. एकंदरीत संपूर्ण वसाहतींमध्येच नागरी सुविधांची वानवा दिसत आहे.इतर बांधवांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ज्यांनी आपल्या हिरव्यागार जमिनी दिल्या. त्यांना आज स्वत:च्याच पुनर्वसनासाठी रस्त्यावर यावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रश्न प्रलंबित आहेत. वेळोवेळी आंदोलने करूनही शासन व प्रशासनाकडून त्याची पूर्णपणे सोडवणूक झालेली नाही; त्यामुळे पुन्हा एकदा वारणा व चांदोलीसह इतर प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला आहे. त्यांचे प्रश्न आणि वेदना मांडणारी ‘तुमचे धरण...आमचे मरण’ ही मालिका आजपासून सुरूकरण्यात येत आहे.वारणा वसाहती अशादुर्गेवाडी-कुंभोज, आंबोळी-लाटवडे, सोनार्ली-पेठवडगाव, तांबवे-पेठवडगाव, करडे-किणी व घुणकी, करडे-चावरे-पारगाव, वाडीउडूम-कोडोली, करडे व दुर्गेवाडी-काखे, करडे-सातवे व आरळे, आंबोळी-पळसावडे, आंबोळी-सागाव.1965पासून वारणा धरणाच्या कामाला सुरुवात1976ला आलेल्या पुनर्वसन कायद्याने कामाला गती1985ला या धरणाचे काम पूर्ण झाले 

गेल्या ४0 वर्षांपासून पुनर्वसनासाठी आम्ही झगडत आहोत; परंतु अद्यापहीआमचे प्रश्न सुटलेले नाहीत. गेल्या अडीच वर्षांच्याकाळात अप्पर जिल्हाधिकाºयांकडून एकाही भूखंडाचा आदेश दिलेला नाही. उलट कागदी घोडे नाचवून चालढकलच केली आहे. उलट यापूर्वीच्या काळात अधिकाºयांनी सकारात्मक प्रयत्न केला आहे.- वसंत पाटील, धरणग्रस्त

टॅग्स :StrikeसंपDamधरण