शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कमी कालावधीत प्रचंड पाऊस हे महापुराचे प्रमुख कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:36 IST

कोल्हापूर : महापुराच्या काळामध्ये कोल्हापूर , सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांत सरासरी ६५ टक्क्यांहून अधिक झालेला पाऊस हेच ...

ठळक मुद्देकमी कालावधीत प्रचंड पाऊस हे महापुराचे प्रमुख कारण‘जलसंपदा’कडून आकडेवारीचा काथ्याकूट, अन्य कारणांचाही शोध

कोल्हापूर : महापुराच्या काळामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांत सरासरी ६५ टक्क्यांहून अधिक झालेला पाऊस हेच मुख्य कारण असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. याबाबत कोणीही अधिकारी अधिकृत भूमिका मांडत नसले तरी गेले १५ दिवस या विभागाचे अधिकारी केवळ पावसाची आकडेवारी आणि धरणांचा विसर्ग यांमध्येच अडकले आहेत. सातत्याने मंत्रालयातून याबाबतच्या कारणांबाबत पाठपुरावा होत असल्याने रोज नवनवीन आकडेवारी पाठविण्यामध्ये हा विभाग गुंतला आहे.जुलैमध्ये पावसाने पाठ फिरविल्यानंतर आॅगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला. जुलैअखेर सुरू झालेल्या पावसाने ३ आॅगस्टनंतर रौद्र रूप धारण केले. एकाच वेळी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस सुरू झाल्याने धरणे भरण्याचा वेग वाढला. अखेर पुराची भीती दिसत असतानाही शासकीय नियमांप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.याआधी २००५ साली जो पूर आला होता, त्याच्या पाच दिवसांमध्ये जेवढा पाऊस झाला, त्या वेळेपेक्षा ६५ टक्के जादा पाऊस यावेळच्या महापुरावेळी झाला. जरी या तीनही जिल्ह्यांत हा पाऊस एकाच वेळी झाला नसता तर महापुराची तीव्रता कमी झाली असती. मात्र तीनही जिल्ह्यांत एकाच वेळी अकल्पित असा प्रचंड पाऊस झाल्याने जलसंपदा विभागाचे हात बांधले गेले.३२५ टीएमसी पाणी गेले वाहूनया महापुराच्या काळामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील सर्व धरणांमधून तब्बल ३२५ टीएमसी पाणी खाली सोडले गेले. धरणांच्या सुरक्षिततेसाठी हे पाणी सोडणे गरजेचे बनले आणि त्यामुळेच महापुराची तीव्रता वाढली. कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या लहान-मोठ्या ६६ जलप्रकल्पांमध्ये दरवर्षी ९० टीएमसी पाणीसाठा केला जातो. मात्र गेल्या आठवड्यात पुराच्या काळात या ६६ जलप्रकल्पांमधून एकूण २०० टीएमसी पाणी खाली सोडावे लागले आहे. त्याबरोबरच अलमट्टीची फुग, कोल्हापूर, सांगली शहरांत झालेली पूरस्थितीतील बांधकामे अशा अनेक कारणांमुळे ही तीव्रता वाढल्याची चर्चा जलसंपदा विभागात आहे.मंत्रालयातून सातत्याने माहितीची मागणीपूर सुरू झाल्यापासून रोज मंत्रालयातून पडणारा पाऊस, गेल्या काही वर्षांमधील सरासरी, गेल्या काही वर्षांमधील धरणांतील पाण्याचा विसर्ग, २००५ च्या पुराची स्थिती, तेव्हाचा पाऊस, तेव्हाचा धरणांतील विसर्ग ही माहिती सातत्याने मागविली जात आहे. त्यामुळे गेले १५ दिवस या विभागाचे अधिकारी याच कामात आहेत. आता पुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समितीची स्थापना झाल्याने लवकरच या समितीचा दौराही होण्याची शक्यता आहे. 

 

 

टॅग्स :Rainपाऊसzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर