शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

कमी कालावधीत प्रचंड पाऊस हे महापुराचे प्रमुख कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:36 IST

कोल्हापूर : महापुराच्या काळामध्ये कोल्हापूर , सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांत सरासरी ६५ टक्क्यांहून अधिक झालेला पाऊस हेच ...

ठळक मुद्देकमी कालावधीत प्रचंड पाऊस हे महापुराचे प्रमुख कारण‘जलसंपदा’कडून आकडेवारीचा काथ्याकूट, अन्य कारणांचाही शोध

कोल्हापूर : महापुराच्या काळामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांत सरासरी ६५ टक्क्यांहून अधिक झालेला पाऊस हेच मुख्य कारण असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. याबाबत कोणीही अधिकारी अधिकृत भूमिका मांडत नसले तरी गेले १५ दिवस या विभागाचे अधिकारी केवळ पावसाची आकडेवारी आणि धरणांचा विसर्ग यांमध्येच अडकले आहेत. सातत्याने मंत्रालयातून याबाबतच्या कारणांबाबत पाठपुरावा होत असल्याने रोज नवनवीन आकडेवारी पाठविण्यामध्ये हा विभाग गुंतला आहे.जुलैमध्ये पावसाने पाठ फिरविल्यानंतर आॅगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला. जुलैअखेर सुरू झालेल्या पावसाने ३ आॅगस्टनंतर रौद्र रूप धारण केले. एकाच वेळी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस सुरू झाल्याने धरणे भरण्याचा वेग वाढला. अखेर पुराची भीती दिसत असतानाही शासकीय नियमांप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.याआधी २००५ साली जो पूर आला होता, त्याच्या पाच दिवसांमध्ये जेवढा पाऊस झाला, त्या वेळेपेक्षा ६५ टक्के जादा पाऊस यावेळच्या महापुरावेळी झाला. जरी या तीनही जिल्ह्यांत हा पाऊस एकाच वेळी झाला नसता तर महापुराची तीव्रता कमी झाली असती. मात्र तीनही जिल्ह्यांत एकाच वेळी अकल्पित असा प्रचंड पाऊस झाल्याने जलसंपदा विभागाचे हात बांधले गेले.३२५ टीएमसी पाणी गेले वाहूनया महापुराच्या काळामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील सर्व धरणांमधून तब्बल ३२५ टीएमसी पाणी खाली सोडले गेले. धरणांच्या सुरक्षिततेसाठी हे पाणी सोडणे गरजेचे बनले आणि त्यामुळेच महापुराची तीव्रता वाढली. कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या लहान-मोठ्या ६६ जलप्रकल्पांमध्ये दरवर्षी ९० टीएमसी पाणीसाठा केला जातो. मात्र गेल्या आठवड्यात पुराच्या काळात या ६६ जलप्रकल्पांमधून एकूण २०० टीएमसी पाणी खाली सोडावे लागले आहे. त्याबरोबरच अलमट्टीची फुग, कोल्हापूर, सांगली शहरांत झालेली पूरस्थितीतील बांधकामे अशा अनेक कारणांमुळे ही तीव्रता वाढल्याची चर्चा जलसंपदा विभागात आहे.मंत्रालयातून सातत्याने माहितीची मागणीपूर सुरू झाल्यापासून रोज मंत्रालयातून पडणारा पाऊस, गेल्या काही वर्षांमधील सरासरी, गेल्या काही वर्षांमधील धरणांतील पाण्याचा विसर्ग, २००५ च्या पुराची स्थिती, तेव्हाचा पाऊस, तेव्हाचा धरणांतील विसर्ग ही माहिती सातत्याने मागविली जात आहे. त्यामुळे गेले १५ दिवस या विभागाचे अधिकारी याच कामात आहेत. आता पुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समितीची स्थापना झाल्याने लवकरच या समितीचा दौराही होण्याची शक्यता आहे. 

 

 

टॅग्स :Rainपाऊसzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर