शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलासा! कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, रब्बी पेरण्यांना वेग येणार

By राजाराम लोंढे | Updated: November 8, 2023 11:58 IST

ऊस पिकांना जीवदान मिळाले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत पावसाचा जोर अधिक असून पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकांना जीवदान मिळाले आहे. ओलीअभावी खोळंबलेल्या रब्बी पेरण्यांना वेग येणार आहे. रविवार (दि.१२) पर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.यंदा अखंड मान्सूनमध्ये जेमतेम एक महिनाच पाऊस झाला. परतीचा पाऊसही न झाल्याने जमिनीत पाणी नाही. त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी झाले. जमिनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात १५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता.ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. सकाळी आठ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढत गेला. सगळीकडे पाणी पाणी झाले असून शिवारात पाणी उभे राहिले आहे. पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकाला दिलासा मिळाला असून रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार आहे. माळरान, डोंगरमाथ्यावरील खोळंबलेल्या रब्बीच्या पेरण्या सुरू होणार आहेत.

सप्टेंबरपासूनच विद्युत पंप सुरू करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. गेली दोन महिने उभ्या उसाला पाणी द्यावे लागत आहे. त्यात आठ तासच वीज मिळते, मात्र पाण्याअभावी जमिनी भेगाळल्यामुळे पाणीच पुढे सरकत नाही. त्यामुळे पाण्याचा फेरच बसत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. बुधवारी करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा आदी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. सकाळी दहा वाजेपर्यंत पावसाने अक्षरश: झोडपून काढले. हातकणंगले तालुक्याच्या काही भागातही चांगला पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे ओली अभावी खोळंबलेल्या रब्बी पेरण्यांना आता गती येणार आहे.पूर्वेकडील तालुक्यात कमी पाऊसजिल्ह्याच्या पूर्वेकडील काही तालुक्यांत तुलनेत पाऊस कमी झाला आहे. आणखी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा तळ असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

वीट व्यावसायिकांची तारांबळअखंड ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला नाही आणि कडक उन्हामुळे वीट व्यवसाय जोमात होता. मात्र, अवकाळी पावसाने त्यांची तारांबळ उडाली होती.

गुऱ्हाळ घरांच्या चिमण्या धुमू लागल्याजिल्ह्यात गुऱ्हाळ घरांनी वेग पकडला आहे. साखर कारखाने सुरू नसल्याने त्यांचा हंगाम जोरात आहे. अवकाळी पावसाने त्यांचीही तारांबळ उडाली असून जळण भिजल्याने गुऱ्हाळ घरांच्या चिमण्या धुमू लागल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस