शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलासा! कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, रब्बी पेरण्यांना वेग येणार

By राजाराम लोंढे | Updated: November 8, 2023 11:58 IST

ऊस पिकांना जीवदान मिळाले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत पावसाचा जोर अधिक असून पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकांना जीवदान मिळाले आहे. ओलीअभावी खोळंबलेल्या रब्बी पेरण्यांना वेग येणार आहे. रविवार (दि.१२) पर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.यंदा अखंड मान्सूनमध्ये जेमतेम एक महिनाच पाऊस झाला. परतीचा पाऊसही न झाल्याने जमिनीत पाणी नाही. त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी झाले. जमिनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात १५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता.ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. सकाळी आठ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढत गेला. सगळीकडे पाणी पाणी झाले असून शिवारात पाणी उभे राहिले आहे. पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकाला दिलासा मिळाला असून रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार आहे. माळरान, डोंगरमाथ्यावरील खोळंबलेल्या रब्बीच्या पेरण्या सुरू होणार आहेत.

सप्टेंबरपासूनच विद्युत पंप सुरू करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. गेली दोन महिने उभ्या उसाला पाणी द्यावे लागत आहे. त्यात आठ तासच वीज मिळते, मात्र पाण्याअभावी जमिनी भेगाळल्यामुळे पाणीच पुढे सरकत नाही. त्यामुळे पाण्याचा फेरच बसत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. बुधवारी करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा आदी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. सकाळी दहा वाजेपर्यंत पावसाने अक्षरश: झोडपून काढले. हातकणंगले तालुक्याच्या काही भागातही चांगला पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे ओली अभावी खोळंबलेल्या रब्बी पेरण्यांना आता गती येणार आहे.पूर्वेकडील तालुक्यात कमी पाऊसजिल्ह्याच्या पूर्वेकडील काही तालुक्यांत तुलनेत पाऊस कमी झाला आहे. आणखी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा तळ असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

वीट व्यावसायिकांची तारांबळअखंड ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला नाही आणि कडक उन्हामुळे वीट व्यवसाय जोमात होता. मात्र, अवकाळी पावसाने त्यांची तारांबळ उडाली होती.

गुऱ्हाळ घरांच्या चिमण्या धुमू लागल्याजिल्ह्यात गुऱ्हाळ घरांनी वेग पकडला आहे. साखर कारखाने सुरू नसल्याने त्यांचा हंगाम जोरात आहे. अवकाळी पावसाने त्यांचीही तारांबळ उडाली असून जळण भिजल्याने गुऱ्हाळ घरांच्या चिमण्या धुमू लागल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस