शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘दादा, मी नदीवर कपडे धुवायला आलेय’; काल ग्रामपंचायत निवडणूक जिंकलेल्या पल्लवीची मनाला भिडणारी गोष्ट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 18:29 IST

कोणीतरी समस्या सोडवेल या आशेवर राहण्याऐवजी स्वत:च परिवर्तनाच्या शिलेदार म्हणून पल्लवी महिंदकर निवडणूक लढल्या अन् जिंकल्या

- सतिश नांगरे

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा अजून खाली बसलेला नाही. आम्हीच कशी बाजी मारली, आपली ताकद कशी वाढली, याची गणितं राजकीय पक्षांचे नेते मांडत आहेत. काही गावांमध्ये अजूनही विजयाचं सेलिब्रेशन आणि पराभवाचं चिंतन सुरू आहे. त्याचवेळी, लोकशाहीची एक वेगळी बाजू, एक आगळं रूप कोल्हापूर जिल्ह्यातील शित्तूर वारुण गावात दिसलं.

पल्लवी मोहन महिंदकर या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या. २२ व्या वर्षी निवडणुकीच्या मैदानात उतरून विजयाची पताका फडकवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर अगदीच अनपेक्षित आणि आश्चर्याचा धक्का देणारं होतं. ‘दादा, मी वारणा नदीवर कपडे धुवायला आली आहे’, असं म्हणत त्यांनी हातचं काम थोडं बाजूला ठेवून आपल्या राजकारणातील प्रवेशाची गोष्ट सांगितली.

शित्तूर वारुण हे वारणा खोऱ्यातील डोंगरकपारीत असलेलं गाव. लोकसंख्या साधारण पाच हजार. चांदोली धरणाच्या पायथ्याशी वसलेलं. कुठलाही राजकीय वारसा नसताना या गावातूनच पल्लवी महिंदकर यांनी निवडणूक लढवली. किंबहुना, त्यांना ती लढवावी लागली.

‘दोन वर्षांपूर्वी माझं लग्न झालं. पती पदवीधर आहेत. पण, गावात नोकरी नसल्याने मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. कोरोना काळात त्यांची नोकरी गेली आणि ते गावी परत आले. तेव्हा, गावातील अनेक प्रश्नांबद्दल, अडचणींबद्दल त्यांच्यासोबत चर्चा व्हायची. गावातले प्रश्न सुटले पाहिजेत. विकास झाला पाहिजे, असं आपण नुसतं म्हणत राहतो. पण कोणीतरी येईल, बदल घडवेल, आपले प्रश्न सोडवेल, यावर माझा विश्वास नव्हता. त्यामुळे आपणच परिवर्तनाचे शिलेदार होवू या, या भावनेनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला,' असं पल्लवी यांनी सांगितलं. शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पल्लवी ४६१ मतं घेऊन विजयी झाल्या.पल्लवी यांच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. जेमतेम शेती आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. फारसं राजकीय, आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नाही. तरुण मुली मोठ्या प्रमाणात राजकारणात आल्या, तर राजकारणाचा आजचा पोत बदलेल, असं पल्लवी यांना वाटतं. परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करावी, या विचारानं पल्लवी यांनी राजकारणात उतरुन निवडणूक लढवली. त्या सांगतात, एका ग्रामपंचायत सदस्याकडून तशा ग्रामस्थांच्या अपेक्षा तरी किती असतात. नियमित पाणी, दैनंदिन स्वच्छता, गटारं, अंतर्गत प्रश्न मार्गी लागावेत हीच ग्रामस्थांची माफक अपेक्षा असते. त्यामुळे या प्रश्नांवर मी भर देईनच. त्याशिवाय गावाच्या हिताच्या आड येणारं कोणतंही काम मी करणार नाही, असं पल्लवी यांनी ठामपणे सांगितलं.ग्रामपंचायत सदस्य म्हणून सर्वात आधी कोणतं काम कराल असं विचारलं असता, गावातील केंद्रीय प्राथमिक शाळेत काही गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवले जावेत यासाठी प्रयत्न करेन, असं उत्तर पल्लवी यांनी दिलं. याशिवाय रोजगारासाठी गावातल्या तरुणांचं होणारं स्थलांतर थांबवण्यासाठी, तरुणांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेती उत्पादनाला थेट बाजारपेठ, छोट्या मोठ्या व्यवसायांना बँका, फायनान्स कंपन्या, सहकारी संस्था व पतपेढ्या यांच्या मार्फत कर्ज मिळवून देऊन व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करेन. गावात नोकरी मिळत नसल्यानं आजच्या घडीला प्रत्येक कुटुंबातील एक तरुण मुंबईला स्थलांतरित होत आहेत. त्यांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पल्लवी यांनी सांगितलं. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना