शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

‘दादा, मी नदीवर कपडे धुवायला आलेय’; काल ग्रामपंचायत निवडणूक जिंकलेल्या पल्लवीची मनाला भिडणारी गोष्ट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 18:29 IST

कोणीतरी समस्या सोडवेल या आशेवर राहण्याऐवजी स्वत:च परिवर्तनाच्या शिलेदार म्हणून पल्लवी महिंदकर निवडणूक लढल्या अन् जिंकल्या

- सतिश नांगरे

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा अजून खाली बसलेला नाही. आम्हीच कशी बाजी मारली, आपली ताकद कशी वाढली, याची गणितं राजकीय पक्षांचे नेते मांडत आहेत. काही गावांमध्ये अजूनही विजयाचं सेलिब्रेशन आणि पराभवाचं चिंतन सुरू आहे. त्याचवेळी, लोकशाहीची एक वेगळी बाजू, एक आगळं रूप कोल्हापूर जिल्ह्यातील शित्तूर वारुण गावात दिसलं.

पल्लवी मोहन महिंदकर या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या. २२ व्या वर्षी निवडणुकीच्या मैदानात उतरून विजयाची पताका फडकवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर अगदीच अनपेक्षित आणि आश्चर्याचा धक्का देणारं होतं. ‘दादा, मी वारणा नदीवर कपडे धुवायला आली आहे’, असं म्हणत त्यांनी हातचं काम थोडं बाजूला ठेवून आपल्या राजकारणातील प्रवेशाची गोष्ट सांगितली.

शित्तूर वारुण हे वारणा खोऱ्यातील डोंगरकपारीत असलेलं गाव. लोकसंख्या साधारण पाच हजार. चांदोली धरणाच्या पायथ्याशी वसलेलं. कुठलाही राजकीय वारसा नसताना या गावातूनच पल्लवी महिंदकर यांनी निवडणूक लढवली. किंबहुना, त्यांना ती लढवावी लागली.

‘दोन वर्षांपूर्वी माझं लग्न झालं. पती पदवीधर आहेत. पण, गावात नोकरी नसल्याने मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. कोरोना काळात त्यांची नोकरी गेली आणि ते गावी परत आले. तेव्हा, गावातील अनेक प्रश्नांबद्दल, अडचणींबद्दल त्यांच्यासोबत चर्चा व्हायची. गावातले प्रश्न सुटले पाहिजेत. विकास झाला पाहिजे, असं आपण नुसतं म्हणत राहतो. पण कोणीतरी येईल, बदल घडवेल, आपले प्रश्न सोडवेल, यावर माझा विश्वास नव्हता. त्यामुळे आपणच परिवर्तनाचे शिलेदार होवू या, या भावनेनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला,' असं पल्लवी यांनी सांगितलं. शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पल्लवी ४६१ मतं घेऊन विजयी झाल्या.पल्लवी यांच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. जेमतेम शेती आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. फारसं राजकीय, आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नाही. तरुण मुली मोठ्या प्रमाणात राजकारणात आल्या, तर राजकारणाचा आजचा पोत बदलेल, असं पल्लवी यांना वाटतं. परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करावी, या विचारानं पल्लवी यांनी राजकारणात उतरुन निवडणूक लढवली. त्या सांगतात, एका ग्रामपंचायत सदस्याकडून तशा ग्रामस्थांच्या अपेक्षा तरी किती असतात. नियमित पाणी, दैनंदिन स्वच्छता, गटारं, अंतर्गत प्रश्न मार्गी लागावेत हीच ग्रामस्थांची माफक अपेक्षा असते. त्यामुळे या प्रश्नांवर मी भर देईनच. त्याशिवाय गावाच्या हिताच्या आड येणारं कोणतंही काम मी करणार नाही, असं पल्लवी यांनी ठामपणे सांगितलं.ग्रामपंचायत सदस्य म्हणून सर्वात आधी कोणतं काम कराल असं विचारलं असता, गावातील केंद्रीय प्राथमिक शाळेत काही गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवले जावेत यासाठी प्रयत्न करेन, असं उत्तर पल्लवी यांनी दिलं. याशिवाय रोजगारासाठी गावातल्या तरुणांचं होणारं स्थलांतर थांबवण्यासाठी, तरुणांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेती उत्पादनाला थेट बाजारपेठ, छोट्या मोठ्या व्यवसायांना बँका, फायनान्स कंपन्या, सहकारी संस्था व पतपेढ्या यांच्या मार्फत कर्ज मिळवून देऊन व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करेन. गावात नोकरी मिळत नसल्यानं आजच्या घडीला प्रत्येक कुटुंबातील एक तरुण मुंबईला स्थलांतरित होत आहेत. त्यांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पल्लवी यांनी सांगितलं. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना