शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

कावळाच बनला त्याचा जिवाभावाचा सखा,तो’ अंगाखांद्यावर बागडतो अन् त्यानेच चारलेला खाऊ खातो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:00 IST

पोर्ले तर्फ ठाणे : झाडाची फांदी तोडल्यामुळे मायेच्या उबेला पोरका झालेल्या कावळ्याच्या पिलांना, त्यानं सजिवातील माणुसकी दाखवत घरी आणलं.

ठळक मुद्देपोर्ले तर्फ ठाणेतील पक्षिमित्राची अनोखी कथा‘

सरदार चौगुले ।पोर्ले तर्फ ठाणे : झाडाची फांदी तोडल्यामुळे मायेच्या उबेला पोरका झालेल्या कावळ्याच्या पिलांना, त्यानं सजिवातील माणुसकी दाखवत घरी आणलं. त्या पिलांचे पोटच्या पोरासारखं संगोपन केलं; पण तिघा भावंडांपैकी दोघेजण पंख फुटल्यावर आकाशात भरारी घेऊन आपल्या दुनियेत निघून गेले, तर एकजण त्याच्या अंगाखांद्यावर बागडतो आणि त्यानेच अन्नाचे घास चारले तर खातो, नाहीतर उपाशी राहतो. ही कहाणी आहे माणसाळलेल्या कावळ्याची. पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावातील युवराज शेवाळे या पशुपक्ष्यांशी ऋणानुबंध जोडणाऱ्या अवलियाची.

माणसाला आवड किंवा छंद कधीच स्वस्त बसू देत नाही. लहानपणापासून पशुपक्ष्यांबाबत ओढ असणाºया युवराजने खासगी नोकरी सोडून प्रपंचासाठी पशुपालनासोबत पक्षीसंगोपन केले. युवराजच्या मनावर संसाराचा कितीही ताण असला तरी कावळ्याच्या सान्निध्यात गेल्यानंतर युवराजला समाधान मिळते. दोघांना एकमेकांची भाषा समजत नसली तरी हावभावातून जिव्हाळ्याचे संबंध आणखी घट्ट होताना दिसत आहे.

दोन महिन्यांपूर्वी युवराज कोल्हापूरहून गावाकडे येत होता. कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील चिखली फाट्याजवळ वडाच्या तुटलेल्या फांदीत कावळ्याच्या घरट्यात तीन पिलांचा मायेच्या उबेसाठीचा किलबिलाट ऐकून त्यांना घरी आणलं. चोची वर करून भुकेसाठी व्याकूळ झालेल्या पिलांना बोटाने कावळ्याची चोच बनवून त्यांच्या पोटात अन्नाचा घास ढकलावा लागत होता. कावळ्याच्या पिलांचे कुटुंबातील सदस्याप्रमाणे संगोपन करण्यात शेवाळे कुटुंब वेळ देत होते. बघता बघता दोन महिन्यांत कावळ्याची पिल्ली मोठी झाली अन् पंख फुटल्याने आकाशात गगनभरारी घेऊ लागली.

एक दिवशी तीन कावळ्यांपैकी दोन कावळे भावंडाला सोडून आपल्या जगात भूर्रकन उडून गेले; पण आपल्याला दिलेल्या मायेची जाणीव ठेवून त्यातील एक कावळा सध्या शेवाळे कुटुंबाचा अविभाज्य घटक बनून राहिला आहे. तो कावळा युवराजच्या हाताने अन्न खातो आणि दिवसरात्र परसातील झाडावर वास्तव्यास असतो. त्याला बोलवलं की तो त्याच्या अंगाखांद्यावर बसतो, बागडतो. त्याच्याकडे कानाडोळा केला तर टोचून आपली भावना व्यक्त करतो. त्यांच्या परड्यात झाडाझुडपात या कावळ्यामुळे अनेक पक्ष्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेवाळे कुटुंबात माणसाळलेल्या या कावळ्याचा विषय परिसरात कुतूहलाचा बनला आहे.कावळ्याबाबत गैरसमजुतीमाणसाच्या दशक्रियाविधी दिवशी कावळ्याने पिंडाला शिवले की माणसाचा आत्मा मुक्त होतोे; असे अनुभवी वास्तव आहे. तरीसुद्धा कावळ्यांचे घरावरती दंगा करणे, डोक्यावर कावळा बसणे अथवा चोचीने टोचणे, आकाशाकडे तोंड करून कावकाव करणे अशा अनेक प्रकारच्या कावळ्याच्या कृतीला अपशकुनतेची जोड दिली आहे; पण युवराजच्या अंगाखांद्यावर खेळणाºया कावळ्याच्या वास्तवतेने कावळ्याबाबतच्या अंधश्रद्धेला पूर्णविराम दिला आहे.