शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

हॅट्ट्रिकवर विश्वास...अविश्वास! : हातकणंगलेच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:46 PM

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, प्रत्येक कार्यकर्ता

ठळक मुद्देशेट्टी, माने समर्थकांत पैजा

गणपती कोळी ।कुरुंदवाड : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, प्रत्येक कार्यकर्ता आपलाच उमेदवार कसा निवडून येतो, याची आकडेमोड पटवून देत आहेत.

खासदार शेट्टीसमर्थक खासदार हॅट्ट्रिक करणार यावर ठाम आहेत तर विरोधक या मतदारसंघात स्व. बाळासाहेब माने यांच्यानंतर कोणत्याही खासदाराची हॅट्ट्रिक झालेली नाही. त्यामुळे शेट्टी पराभूत होऊ शकतात, यावर विश्वास आहे. त्यातूनच कार्यकर्त्यांतून पैजा लागल्या असून, शेट्टी हॅट्ट्रिक करतात की, विरोधकांचा विश्वास खरा ठरतो, याचा फैसला निकालानंतरच लागणार आहे. मात्र, इर्ष्येच्या राजकारणाच्या चर्चेने रंगत आली आहे.

शेट्टी हे चळवळीतील व शेतकऱ्यांच्या मनातील विश्वासू नेतृत्व असल्याने प्रारंभी ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माने यांच्या विजयाची घेतलेली जबाबदारी व केलेली खेळी, मतदारसंघात शिवसेना-भाजप आमदारांचे असलेले संख्याबळ, ‘एक मराठा-लाख मराठा’ची हाक, वंचित आघाडीच्या मत विभागणीचा फटका यामुळे शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे कार्यकर्तेच नव्हे, तर उमेदवारही स्वत:च्या विजयाबाबत साशंक आहेत.

कट्टर कार्यकर्ते मात्र आपलाच उमेदवार निवडून देण्यावर ठाम असून, जेवणापासून ते रोख रकमेपर्यंत पैजा खेळल्या जात आहेत. माने समर्थक या मतदारसंघात बाळासाहेब माने यांचा अपवादवगळता अन्य कोणत्याही खासदारांनी हॅट्ट्रिक केलेली नाही. त्यामुळे शेट्टींचा पराभव निश्चित आहे, असा दावा करत आहेत शिवाय मतदारसंघात शिवसेना-भाजप आमदारांची संख्या मोठी असल्याने त्यांचे वर्चस्व आहे. तरुण मतदारांवर मोदी लाटेचा प्रभाव, एकवटलेला मराठा समाज, वंचित आघाडीची विभागलेली मते यामुळे धैर्यशील मानेच निवडून येणार यावर कार्यकर्ते ठाम आहेत.

तर खासदारसमर्थक वंचित आघाडीकडे जाणारी मते खा. शेट्टी यांना फारशी कधीच मिळालेली नाहीत, उलट काँग्रेस समर्थनामुळे मुस्लिम गठ्ठा मतांचा फायदा, शेतकरी चळवळ म्हणून शेतकºयांची मते, सूज्ञ मतदारांतून मोदीविषयी असलेली संतापाची लाट, मतदारसंघात शिवसेना-भाजपचे आमदार असले, तरी लोकसभेत मतदार न ऐकण्याची भूमिका यामुळे निवडून येण्यास अडचण नाही. गतवेळचे फार तर लीड कमी होईल, मात्र, खा. शेट्टीच निवडून येणार, यावरच त्यांचा विश्वास आहे. एकूणच दावे-प्रतिदावे अन् आकडेमोडीवरून कार्यकर्त्यांतून रंगलेली चर्चा मतदार व कार्यकर्त्यांत निकालाच्या उत्सुकतेत भर पडत आहे.शेट्टींनी बनविले नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्यहातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शेतकºयांचा ऊस व दूध दरावरून रणांगण गाजविलेले

खा. राजू शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर ‘स्वाभिमानी’कडून निवडणुकीत उतरले आहेत. शेट्टी यांनी भाजपला विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टीकेचे लक्ष्य केल्याने भाजप-शिवसेना युतीने शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी देऊन राजकीय खेळी खेळली आहे.

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९