शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Hatkanangle Lok Sabha Election : 'स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करतात'; धैर्यशील मानेंचा राजू शेट्टींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:41 IST

Hatkanangle Lok Sabha Election : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून मोठा दबाव आहे.

Hatkanangle Lok Sabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याविरोधात शिंदे गटाचे धैर्यशील माने अशी लढत होणार असल्याचे दिसत आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता वेगळा पावित्रा घेतल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीने या मतदारसंघात अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. दरम्यान, आज महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून मोठा दबाव आहे. मात्र, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. काही दिवसातच या निर्णय होऊ शकतो असं बोललं जात आहे. दरम्यान, आता यावरुन खासदार धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे. 

उद्धव ठाकरे भाजपला तगडा झटका देणार; नाराज खासदार राऊतांच्या भेटीला

"यांना जर स्वाभिमान असेल तर त्यांना लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचे कारण नाही. त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे, पहिल्या दिवसापासून ते डायलॉग मारत आहेत. पण, दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हे वैचारिक गणित नाही. ते साखर कारखानदारांसोबत युती करतात तेव्हा ती कोणती आयडॉलॉजी युती करतात.त्यामुळे ते आयडॉलॉजीकल युतीमध्ये पडत नाहीत, इलेक्ट्रोरियल युतीकडे लक्ष देतात, मी कसा निवडून येईल. एवढाच त्यांचा निव्वळ प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला. 

"पार्टीचं नाव स्वाभिमानी ठेऊन स्वाभिमानी होता येत नाही"

"महाराष्ट्रात ते स्वाभिमानी नावाची जी संघटना चालत आहेत, त्यामध्ये किती खासदार, आमदार किती जिल्हा परिषदमध्ये सदस्यांना बळ देत आहेत. ते निव्वळ आपल्या पुरत सेल्फ सेंट्रीक राजकारण करत आहेत.ते फक्त स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करण्याचे काम करत आहेत. आता कामाची सुरुवात झाली आहे, त्यांच्या पार्टीचं काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. एखाद्या पार्टीचं नाव फक्त स्वाभिमानी ठेऊन काही स्वाभिमानी होता येत नाही त्याला स्वाभिमानानं वागावं लागतं, त्यांनी दरवेळी नवीन गोष्टी केल्या आहेत. त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे प्रत्येकवळी इथल्या जनतेने पाहिलं आहे, असंही माने म्हणाले. 

टॅग्स :dhairyasheel maneधैर्यशील मानेRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर