शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी मला नेहमी फसवलं; आगामी विधानसभा लढवणारच : ए. वाय. पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 15:22 IST

के. पी. पाटील कार्यकर्त्यांना आमिषे दाखवत आहेत

अमर मगदूम राशिवडे : समाजकारण, राजकारण करत असताना मी नेहमी राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. सर्व सामान्य कार्यर्त्याला मोठा करण्यासाठी घरावर तुळशी पत्र ठेवले, पायाला पाने बांधून नेहमी पक्षनिष्ठा ठेवली. राष्ट्रवादी मोठी करण्यासाठी दिवस रात्र राबलो, शेवटी पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांनी मला विधानसभा व बिद्री कारखान्याचे अध्यक्षपदाचा शब्द देत नेहमी फसवले. माझं राजकारण संपविण्याचे काम केले. त्यामुळेच राधानगरी भूदरगड तालूक्याच्या विकासासाठी आगामी विधानसभा लढवणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केले. ते सोळांकूर (ता. राधानगरी) येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.काल ए. वाय. पाटील समर्थकांनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ व बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. पाटील पुढे म्हणाले, बिद्रीत झालेल्या पराभवात पाठीशी न राहता ज्यांना आम्ही पद देत त्यांना मोठे केले, तेच लोक माझ्या पडत्या काळात सोडून गेले हे मोठे दुःख आहे. या लोकांना जनता माफ करणार नाही. आतापर्यंत वैयक्तिक विचार न करता सर्व सामान्यांच्या हितासाठी राजकारण केले. स्वाभिमानी जनतेच्या विश्वासावर व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आगामी २०२४ विधानसभेची निवडणूक लढणारच असे जाहीर केले.भोगावतीचे उपाध्यक्ष राजेंद्र कवडे, भोगावतीचे विद्यमान संचालक अविनाश उर्फ नंदू भाऊ पाटील, मानसिंग पाटील, महादेव कोथळकर, नेताजी पाटील, विलास हळदे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी डी. बी. पाटील, मोहन पाटील, के. डी. चौगले, दिपक पाटील, अमर पाटील, विजय तौदकर, बाळासो धोंड, भुदरगड तालुक्यातील कार्यकार्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांना आमिषेसत्तेचा गैरवापर करीत बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील कार्यकर्त्यांना आमिषे दाखवत आहेत. अनेकांना वेगवेगळी खोटी आश्वासने देवून झुलवत आहेत. 

नव्वद दिवसांत नोकर भरतीचे काय झालेबिद्री साखर कारखान्याच्या निवडणूकीत के. पी. पाटील केवळ मते मिळविण्यासाठी नव्वद दिवसाच्या आत नोकरी भरती करणार असे आश्वासन दिले होते. त्यामध्ये साठ दिवस पूर्ण झाले, तरी देखील नोकर भरतीच्या कोणत्याच हालचाली चालू नाहीत. बिद्रीच्या नोकरी भरतीचे अश्वासन देवून सत्ता मिळवली पण सभासदांचा विश्वासघात केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफK P. Patilके. पी. पाटीलA. Y Patilए. वाय. पाटीलradhanagari-acराधानगरी