शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

कोल्हापूर-कटिहार एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, पहिल्याच रेल्वेला प्रवाशांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:55 IST

पुढच्या तिन्ही गाड्यांचे आरक्षण फुल्ल

कोल्हापूर : उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाण्यासाठी बिहारीबाबूंच्या सोयीसाठी सुरू केलेल्या मध्य रेल्वेच्याकोल्हापूर-कटिहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेसला रविवारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून उद्योजक हरीश जैन यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून गाडी सोडण्यात आली. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना कोल्हापूर ते कटिहार क्रमांक (गाडी क्रमांक ०१४०५/०१४०६) ही साप्ताहिक विशेष रेल्वे सोयीची आहे. या आठवड्यासाठी ही गाडी हाउसफुल्ल झाली आहे.कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन, अरिहंत जैन फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल, मध्य रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सुहास गुरव, स्थानकप्रमुख आर. के. मेहता, रेल्वे प्रवासी संघटनेचे समन्वयक अनिल तराळ, प्रशांत चौगुले, जितेश कारेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.तत्पूर्वी रेल्वेच्या इंजिनला हार घालून मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले. यावेळी या रेल्वे गाडीचे सारथ्य करणारे कोल्हापूरचे सुपुत्र मिलिंद उलपे यांचा या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बिहारच्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे गाडीची मागणी गेल्या पन्नास वर्षांपासून होत आहे. रेल्वे प्रवासी संघटनेमार्फत हा मुद्दा उपस्थित करून खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वेकडे याबाबत पाठपुरावा केला होता.

चार फेऱ्या होणार, सर्वांचे आरक्षण फुल्ल..कोल्हापुरी–कटिहार व कटिहार–कोल्हापूर या मार्गावर प्रत्येक चार फेऱ्या होणार आहेत. ही गाडी सांगली, पुणे, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारस, जबलपूर, प्रयागराज छावकी, अयोध्या जंक्शन, पाटलीपुत्र, हाजीपूर, बेगुसराय या प्रमुख स्टेशनवर थांबणार आहे. यामुळे कोल्हापुरातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. या गाडीच्या सर्व फेऱ्यांचे आरक्षण फुल झाले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद बघता या मार्गावर कायमस्वरूपी रेल्वे सोडण्याची मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBiharबिहारrailwayरेल्वेpassengerप्रवासी