शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

ग्रामपंचायतीत महिलाच कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:23 IST

इंदुमती गणेश, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात महिला उमेदवारांची सरशी झाली आहे. जिल्ह्यातील ...

इंदुमती गणेश,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात महिला उमेदवारांची सरशी झाली आहे. जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींमधून २ हजार ९३ महिला उमेदवार निवडून आल्या असून, ही संख्या विजयी पुरुष उमेदवारांच्या तुलनेत १५९ने जास्त आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये महिला कारभारीच ग्रामपंचायतीचा डोलारा सांभाळणार आहेत.

जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १८ जानेवारीला मतमोजणी झाली. राज्यात महाविकास आघाडीचे राज्य असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व राहिले. या निवडणुकीत ४ हजार २७ गावकारभारी निवडले गेले. यापैकी २ हजार ९३ महिला आहेत तर १ हजार ९३४ पुरुष आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या १५९ने जास्त आहे.

----

गावात स्वच्छतेचा अभाव आहे, गाव स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापन, त्याची योग्य विल्हेवाट हा विषय प्राधान्याने घेणार आहे. शासकीय योजनेतून दलित वस्तीसह गरिबांना घरे बांधून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावात पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असल्याने या पाण्यावर प्रक्रिया करुन ते शुद्ध करण्याचा प्रकल्प हाती घेणार आहे.

चित्रा सुतार (नृसिंहवाडी) (फोटो-२२०१२०२१-कोल-चित्रा सुतार ग्रामपंचायत)

---

गावात सातवीपर्यंत शाळा आहे. तिथून पुढचे शिक्षण घ्यायचे असेल तर दुसऱ्या गावात पायपीट करत जावे लागते. अशातच अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण सुटते. त्यामुळे गावातील शाळा दहावीपर्यंत करण्याची इच्छा आहे. ग्रामपंचायतीची इमारत खूप जुनी असून, तिला गळती लागली आहे. ही इमारत नव्याने बांधायची आहे. अंतर्गत रस्ते, पाणी, गावची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन यावर काम करायचे आहे. शासनाच्या योजना गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

उज्ज्वला कांबळे (उंड्री, ता. पन्हाळा)

फोटो नं २२०१२०२१-कोल-उज्ज्वला कांबळे (ग्रामपंचायत)

--

ग्रामप्रशासनातील गोंधळामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे आधी ग्रामप्रशासन व कर्मचाऱ्यांमध्ये सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न असेल. रोजगारासाठीचे तरुणांचे स्थलांतर थांबवून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेती उत्पादनांना थेट बाजारपेठ, छोट्या-मोठ्या व्यवसायांना बँका-फायनान्स कंपन्या, सहकारी संस्था व पतपेढ्या यांच्यामार्फत कर्ज मिळवून देण्यासाठी काम करायचे आहे.

पल्लवी पाटील (शित्तूर तर्फ वारुण, ता. शाहुवाडी )

फोटो नं २२०१२०२१-कोल-पल्लवी पाटील (ग्रामपंचायत)

--

करवीर तालुक्यात महिलांचे वर्चस्व

जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी करवीर तालुक्यात महिला उमेदवारांची सर्वाधिक संख्या आहे. येथे २७९ महिला विजयी झाल्या असून, त्यानंतर कागल (२६९), शिरोळ (२२८) या तालुक्यांचा नंबर लागतो.

---------

तालुकानिहाय विजयी महिला उमेदवार

तालुका : विजयी महिला उमेदवार

राधानगरी : ६१

आजरा : ८९

गगनबावडा : ३५

कागल : २६९

हातकणंगले : १४०

करवीर : २७९

गडहिंग्लज : २१७

शिरोळ : २२८

पन्हाळा : २०६

शाहुवाडी १८२

भुदरगड : १९५

चंदगड : १९२

--