शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

ग्रामपंचायत- कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 13:47 IST

Grampanchyat Election Voting- राज्यातील महाविकास आघाडी सरकारची गावपातळीवरची पहिली लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जात असलेल्या ग्रामपंचायतीसाठी आज, शुक्रवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरु झाले. सर्वत्र मतदानासाठी मोठा उत्साह असल्याचे जाणवत होते. दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देग्रामपंचायत- कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान ३८६ ग्रामपंचायतींसाठी मतदारांच्या रांगा : ग्रामीण भागात महिलांचाही उत्साह

कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारची गावपातळीवरची पहिली लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जात असलेल्या ग्रामपंचायतीसाठी आज, शुक्रवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरु झाले. सर्वत्र मतदानासाठी मोठा उत्साह असल्याचे जाणवत होते. दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही मोठी खबरदारी घेतली आहे. शारिरिक अंतर ठेवून मतदार मतदान करत होते. बहुतांश केंद्रांवर थर्मल स्कॅनरने मतदारांची तपासणी केली जात होती. याशिवाय सॅनिटायझरचा वापर केला जात होता. अनेक कर्मचाऱ्यांनी फेसशिल्ड, मास्कचा वापर केला.जिल्ह्यातील निवडणूक जाहीर झालेल्या ४३३ पैकी ३८६ ग्रामपंचायतींमध्ये १५५३ केंद्रावर मतदान सुरु झाले. ४७ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या आहेत, त्यामुळे उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींसाठी गेल्या महिनाभरापासून गावागावांत राजकीय धुळवड उडाली. ८ लाख ५६ हजार मतदार असून नवे ३ हजार ३०७ सदस्यांची निवडणुकीतून कारभारी निवडले जातील.आज सकाळी सकाळी ७.३० वाजताच मतदार प्रचंड संख्येने रांगा लाउन मतदान करताना दिसले. निवडून येण्यासाठी एकेक मत महत्त्वाचे असल्याने मतदारांना बाहेर काढण्यासाठी खास यंत्रणा लावण्यात आली आहे. मतदानादिवशीच किंक्रांत आल्यामुळे राजकीय धुळवड उडाली आहे.कागल तालुक्यातील बिद्री येथील मतदान केंद्रांवर महिलांनीही मोठ्या हिरीरीने सकाळीच रांगा लाउन मतदान केले. हीच स्थिती मळगे, शिंदेवाडी येथील मतदान केंद्रावर होती. हातकणंगले तालुक्यातील मिणचे, वाठार, पन्हाळा तालुक्यातील पोंबरे, पोर्ले, कोडोली येथील यशवंत हायस्कूल, शिये ता.करवीर येथील केंद्रावर, भुदरगड तालुक्यातील आदमापूर, लक्षवेधी खानापूर आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथे रांगा लागल्या होत्या. करवीर तालुक्यातील वडकशिवाले येथील युवतींनी मतदानाचा प्रथमच हक्क बजावला. या केंद्रावर डीवायएसपी प्रशांत अमृतकर यांनी भेट दिली.संवेदनशील केंद्रांवर शांततेत मतदानसंवेदनशील असलेल्या हातकणंगले तालुक्यातील दरवेश पाडळी येथील केंद्रावर शांततेत मतदान झाले.ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही ठिकाणी गोंधळआमदार पी. एन. पाटील यांचे गाव असलेल्या करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान केंद्रावर मतदान सुरु होण्याच्या वेळेतच ईव्हीएम मशीन बंद पडले होते. सकाळी या मशीनची चाचणीच घेण्यात न आल्याने हा प्रकार घडला. ९ वाजेपर्र्यत मशीन सुरु झाले नव्हते. यामुळे अनेक मतदारांनी घरी परतणे पसंत केले. बाचणी, ता. करवीर येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन काही काळ बंद पडल्याने गोंधळ उडाला.या केंद्रावर गोंधळयमगे येथे मतदान केंद्रावरचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने अपंग आणि आजारी मतदारांनी परत जाणे पसंत केले.यावेळी पोलिसांशी वादावादी झाली तर कोपार्डे येथेही बोगस मतदानावरुन वादावादी झाली.यांनी केले मतदानपन्हाळा तालुक्यातील निवडे येथे सुंदाबाई नाना चव्हाण या १0९ वर्षांच्या वृध्देने मतदान केले तर यड्राव येथील ताराबाई बाबू निर्मळ या ९५ वर्षांच्या वृध्देने आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांना महेश निर्मळ व धीरज ठाणेकर यांनी सहकार्य केले.मतदानासाठी जनजागृतीअंधश्रध्दा निर्मुलन समितीचे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष दिनकर चौगुले यांनी मोटारसायकलवरुन निवडणुकीसाठी अंधश्रध्दा बाळगू नयेत यासाठी जनजागृती सुरु केली होती. आदमापूर येथे मतदान केंद्राबाहेर जनजागृतीसाठी रांगोळी काढण्यात आली होती.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकVotingमतदानkolhapurकोल्हापूर