शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत- कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 13:47 IST

Grampanchyat Election Voting- राज्यातील महाविकास आघाडी सरकारची गावपातळीवरची पहिली लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जात असलेल्या ग्रामपंचायतीसाठी आज, शुक्रवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरु झाले. सर्वत्र मतदानासाठी मोठा उत्साह असल्याचे जाणवत होते. दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देग्रामपंचायत- कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान ३८६ ग्रामपंचायतींसाठी मतदारांच्या रांगा : ग्रामीण भागात महिलांचाही उत्साह

कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारची गावपातळीवरची पहिली लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जात असलेल्या ग्रामपंचायतीसाठी आज, शुक्रवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरु झाले. सर्वत्र मतदानासाठी मोठा उत्साह असल्याचे जाणवत होते. दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही मोठी खबरदारी घेतली आहे. शारिरिक अंतर ठेवून मतदार मतदान करत होते. बहुतांश केंद्रांवर थर्मल स्कॅनरने मतदारांची तपासणी केली जात होती. याशिवाय सॅनिटायझरचा वापर केला जात होता. अनेक कर्मचाऱ्यांनी फेसशिल्ड, मास्कचा वापर केला.जिल्ह्यातील निवडणूक जाहीर झालेल्या ४३३ पैकी ३८६ ग्रामपंचायतींमध्ये १५५३ केंद्रावर मतदान सुरु झाले. ४७ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या आहेत, त्यामुळे उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींसाठी गेल्या महिनाभरापासून गावागावांत राजकीय धुळवड उडाली. ८ लाख ५६ हजार मतदार असून नवे ३ हजार ३०७ सदस्यांची निवडणुकीतून कारभारी निवडले जातील.आज सकाळी सकाळी ७.३० वाजताच मतदार प्रचंड संख्येने रांगा लाउन मतदान करताना दिसले. निवडून येण्यासाठी एकेक मत महत्त्वाचे असल्याने मतदारांना बाहेर काढण्यासाठी खास यंत्रणा लावण्यात आली आहे. मतदानादिवशीच किंक्रांत आल्यामुळे राजकीय धुळवड उडाली आहे.कागल तालुक्यातील बिद्री येथील मतदान केंद्रांवर महिलांनीही मोठ्या हिरीरीने सकाळीच रांगा लाउन मतदान केले. हीच स्थिती मळगे, शिंदेवाडी येथील मतदान केंद्रावर होती. हातकणंगले तालुक्यातील मिणचे, वाठार, पन्हाळा तालुक्यातील पोंबरे, पोर्ले, कोडोली येथील यशवंत हायस्कूल, शिये ता.करवीर येथील केंद्रावर, भुदरगड तालुक्यातील आदमापूर, लक्षवेधी खानापूर आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथे रांगा लागल्या होत्या. करवीर तालुक्यातील वडकशिवाले येथील युवतींनी मतदानाचा प्रथमच हक्क बजावला. या केंद्रावर डीवायएसपी प्रशांत अमृतकर यांनी भेट दिली.संवेदनशील केंद्रांवर शांततेत मतदानसंवेदनशील असलेल्या हातकणंगले तालुक्यातील दरवेश पाडळी येथील केंद्रावर शांततेत मतदान झाले.ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही ठिकाणी गोंधळआमदार पी. एन. पाटील यांचे गाव असलेल्या करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान केंद्रावर मतदान सुरु होण्याच्या वेळेतच ईव्हीएम मशीन बंद पडले होते. सकाळी या मशीनची चाचणीच घेण्यात न आल्याने हा प्रकार घडला. ९ वाजेपर्र्यत मशीन सुरु झाले नव्हते. यामुळे अनेक मतदारांनी घरी परतणे पसंत केले. बाचणी, ता. करवीर येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन काही काळ बंद पडल्याने गोंधळ उडाला.या केंद्रावर गोंधळयमगे येथे मतदान केंद्रावरचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने अपंग आणि आजारी मतदारांनी परत जाणे पसंत केले.यावेळी पोलिसांशी वादावादी झाली तर कोपार्डे येथेही बोगस मतदानावरुन वादावादी झाली.यांनी केले मतदानपन्हाळा तालुक्यातील निवडे येथे सुंदाबाई नाना चव्हाण या १0९ वर्षांच्या वृध्देने मतदान केले तर यड्राव येथील ताराबाई बाबू निर्मळ या ९५ वर्षांच्या वृध्देने आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांना महेश निर्मळ व धीरज ठाणेकर यांनी सहकार्य केले.मतदानासाठी जनजागृतीअंधश्रध्दा निर्मुलन समितीचे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष दिनकर चौगुले यांनी मोटारसायकलवरुन निवडणुकीसाठी अंधश्रध्दा बाळगू नयेत यासाठी जनजागृती सुरु केली होती. आदमापूर येथे मतदान केंद्राबाहेर जनजागृतीसाठी रांगोळी काढण्यात आली होती.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकVotingमतदानkolhapurकोल्हापूर