शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

राज्यपालांनी घटनेचे संकेत पाळावेत : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:45 IST

कोल्हापूर : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यापालांना वापरलेला शब्द बोलण्याच्या ओघात तोंडातून गेला असावा. मात्र, राज्यपाल ...

कोल्हापूर : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यापालांना वापरलेला शब्द बोलण्याच्या ओघात तोंडातून गेला असावा. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यघटनेचे महत्त्व ठेवावे. ते राज्य घटनेचे संकेत पाळत नाहीत. त्यांनी घटनेनुसार काम करावे, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप व शिवसेनेच्या आंदोलनाबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या दराने सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तर पेट्रोलचे शतक ठोकण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. लोकांना राग अनावर झाला असून, भविष्यात त्याचा उद्रेक होईल.

ग्रामपंचायत सरपंच पदासाठी काढलेले आरक्षण हे कायद्यानुसार एकदमच काढावे लागते, त्यानुसार प्रक्रिया पार पडली असून, शिर्डी संस्थान हे स्वायत्त आहे, तरीही प्रसारमाध्यमांची अडवणूक करू नये यासाठी सूचना करू, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

चौकट-

विधानसभा अध्यक्षावर मार्ग निघेल

विधानसभा अध्यक्ष पदावर कोणत्याही प्रकारचे त्रांगडे नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते बसून यावर मार्ग काढतील. आघाडी सरकारमध्ये अनेकजण संकटमोचक असून, ते निश्चित मार्ग काढतील, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.