शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘एफआरपी’विरोधात सरकारची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी - राजू शेट्टी 

By राजाराम लोंढे | Updated: April 15, 2025 19:27 IST

कायदा करताना अपिलातील अंतिम निर्णयास अधिन राहून असा उल्लेख

कोल्हापूर : एकरकमी एफआरफी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकारने त्या कायद्याला मान्यता दिली; पण साखर सम्राटांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या राज्य सरकारनेसर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केल्याचे शासन निर्णयावरून स्पष्ट होते, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकातून केला आहे. सर्वोच्च न्यायालयातही राज्य सरकारला चितपट करू, असा इशाराही त्यांनी दिला.राज्य सरकारच्या सहकार विभागाने एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करण्याचा शासन निर्णय केला असून, यामध्ये राज्य सरकारने स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयातील अपिलातील अंतिम निर्णयास अधिन राहून हा निर्णय करत असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सरकार साखर सम्राटांच्या इशाऱ्यावर शेतकरी हिताविरोधात निर्णय घेत आहे, हे मला माहीत असल्याने मी याआधीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. ज्यावेळेस उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली तेव्हा राज्य सरकारने राज्यातील नामांकित वकिलांची फौज उभी केली होती. राज्याचे महाभियोक्ता बिरेंद्र सराफ यांना सुनावणीदरम्यान शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाविरोधात भूमिका घेण्यास सांगितले.

वकिलांची फौजमागील हंगामात तुटलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे सात हजार कोटी रुपये थकीत आहेत. हे असताना शेतकऱ्यांच्या करातून गोळा केलेल्या पैशातून त्यांच्याच विरोधात सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज उभी करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

तर सरकारने बाजूला व्हावे..राज्य सरकार साखर कारखानदारांचे बटीक झाले नसेल तर यामधून त्यांनी बाजूला व्हावे साखर कारखानदार व आम्ही सर्वोच्च न्यायालयात समोरासमोर लढू अन्यथा राज्य सरकार व साखर सम्राटांना शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून सर्वोच्च न्यायलयातही चितपट करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRaju Shettyराजू शेट्टी