शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

‘एफआरपी’विरोधात सरकारची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी - राजू शेट्टी 

By राजाराम लोंढे | Updated: April 15, 2025 19:27 IST

कायदा करताना अपिलातील अंतिम निर्णयास अधिन राहून असा उल्लेख

कोल्हापूर : एकरकमी एफआरफी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकारने त्या कायद्याला मान्यता दिली; पण साखर सम्राटांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या राज्य सरकारनेसर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केल्याचे शासन निर्णयावरून स्पष्ट होते, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकातून केला आहे. सर्वोच्च न्यायालयातही राज्य सरकारला चितपट करू, असा इशाराही त्यांनी दिला.राज्य सरकारच्या सहकार विभागाने एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करण्याचा शासन निर्णय केला असून, यामध्ये राज्य सरकारने स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयातील अपिलातील अंतिम निर्णयास अधिन राहून हा निर्णय करत असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सरकार साखर सम्राटांच्या इशाऱ्यावर शेतकरी हिताविरोधात निर्णय घेत आहे, हे मला माहीत असल्याने मी याआधीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. ज्यावेळेस उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली तेव्हा राज्य सरकारने राज्यातील नामांकित वकिलांची फौज उभी केली होती. राज्याचे महाभियोक्ता बिरेंद्र सराफ यांना सुनावणीदरम्यान शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाविरोधात भूमिका घेण्यास सांगितले.

वकिलांची फौजमागील हंगामात तुटलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे सात हजार कोटी रुपये थकीत आहेत. हे असताना शेतकऱ्यांच्या करातून गोळा केलेल्या पैशातून त्यांच्याच विरोधात सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज उभी करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

तर सरकारने बाजूला व्हावे..राज्य सरकार साखर कारखानदारांचे बटीक झाले नसेल तर यामधून त्यांनी बाजूला व्हावे साखर कारखानदार व आम्ही सर्वोच्च न्यायालयात समोरासमोर लढू अन्यथा राज्य सरकार व साखर सम्राटांना शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून सर्वोच्च न्यायलयातही चितपट करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRaju Shettyराजू शेट्टी