शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

गोरगरिबांना शिक्षण देणे शासनाचे कर्तव्य : एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:22 IST

कोल्हापूर : गोरगरिबांना शिक्षण देणे हा शासनाचा अधिकार आणि कर्तव्यच आहे, या कर्तव्यापासून शासनाला किंचितही मागे हटू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला. सध्याचे शैक्षणिक धोरण हे घटनाबाह्य असल्याने या शासनाच्या धोरणाविरुद्ध २३ मार्चला कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.‘शिक्षणाचे खासगीकरण ...

ठळक मुद्देशैक्षणिक धोरणाविरुद्ध २३ मार्चच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनजनजागृतीसाठी सर्वच शाळांत तालुका, गावपातळीवर प्रत्येक शाळात पालकांच्या सभा

कोल्हापूर : गोरगरिबांना शिक्षण देणे हा शासनाचा अधिकार आणि कर्तव्यच आहे, या कर्तव्यापासून शासनाला किंचितही मागे हटू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला. सध्याचे शैक्षणिक धोरण हे घटनाबाह्य असल्याने या शासनाच्या धोरणाविरुद्ध २३ मार्चला कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.‘

शिक्षणाचे खासगीकरण रद्द करा’ या मागणीसाठी जिल्हाभर ‘शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन सुरू आहे. सोमवारी सायंकाळी कोल्हापुरात ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत कृती समितीची बैठक झाली. शासनाच्या शैक्षणिक धोरणाविरुद्ध रणशिंग फुंकण्याचे आवाहन प्रा. पाटील यांनी केले. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन डी. बी. पाटील, शिक्षक नेते दादासाहेब लाड, एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील तसेच शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे निमंत्रक अशोक पोवार, आदी प्रमुख उपस्थित होते.

प्रा. डॉ. पाटील म्हणाले, शाळांचे कंपनीकरण करू नये, सर्व शाळा शासन मान्यतेनेच अनुदानानेच चालू ठेवाव्यात. राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेल्या मोफत शिक्षणाच्या अधिकाराला शासन काळिमा फासत आहे, शासनाच्या या धोरणामुळे सर्वसामान्याला शिक्षण महाग होऊन त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. हे होऊ न देण्यासाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

यासाठी दि. २३ मार्चला सकाळी ११ वाजता गांधी मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार बैठकीत केला. मोर्चात विद्यार्थी, पालक, नागरिक, शिक्षकांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.

जनजागृतीसाठी सर्वच शाळांत तालुका, गावपातळीवर प्रत्येक शाळात पालकांच्या सभा, बैठका घेण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्टÑपती, मुख्य न्यायाधीश, शिक्षणमंत्र्यांना फोनवर अगर पत्राद्वारे ‘शिक्षणाचे खासगीकरण रद्द करा’ असा मेसेज पाठविणार आहे. यावेळी वसंतराव मुळीक, रमेश मोरे, भरत रसाळे, महादेव पाटील, प्रभाकर आरडे, संभाजी जगदाळे, नामदेवराव गावडे, राजेंद्र वरक, प्रा. टी. एस. पाटील, लाला गायकवाड, राजाराम सुतार, गिरीश फोंडे, आदी उपस्थित होते.महिलांचा महिलादिनी ‘लाँग मार्च’दि. २३ मार्चच्या मोर्चाच्या जनजागृतीसाठी व महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. ६) सकाळी ११.३० वाजता बिंदू चौकातून दसरा चौकापर्यंत महिलांचा ‘लाँग मार्च’ काढण्याचाही निर्णय झाला. दि. १३ मार्चला सकाळी ११ वाजता कोल्हापुरातील सर्वच शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी आपापल्या शाळेच्या दारात रस्त्यावर उभे राहून प्रार्थना, राष्टÑगीत, प्रतिज्ञा म्हणून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.‘शताब्दी’ऐवजी श्राद्धराजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा कायदा केला. त्याला सन २०१७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली असताना या शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्याऐवजी या कायद्याचे श्राद्ध घालण्याचे काम शासन करीत असल्याची टीका यावेळी केली.शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीने सोमवारी कोल्हापुरात ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्रा. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नामदेव गावडे, रमेश मोरे, दादा लाड, डी. बी. पाटील, एस. डी. लाड, अशोक पोवार, भरत रसाळे, व्यंकाप्पा भोसले, श्रीकांत भोसले आदी उपस्थित होते.