शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कोल्हापूर जिल्ह्यात ४८८ गावात झाली गावठाण वाढ, मात्र यावर्षात एकही प्रस्ताव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 14:58 IST

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४८८ गावात गावठाण विस्तार झाला आहे. यामध्ये १९८९ ते १९९९ या दशवार्षिक योजनेत ४८८ तर त्यानंतर अलिकडे २०१६ मध्ये कुरुकली व नरंदे या गावात गावठाण विस्तार झाला आहे. गावठाण विस्तार योजनेचे काम सुरु असले तरी यावर्षात एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेला नाही.

ठळक मुद्दे१९८९ ते १९९९ पर्यंत ४८६ तर २०१६ मध्ये २ ठिकाणी झाले गावठाणगावठाण विस्तार योजनेचे काम सुरु जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकही प्रस्ताव नाहीगावठाणसाठी निकष व अटी

प्रवीण देसाई

कोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत ४८८ गावात गावठाण विस्तार झाला आहे. यामध्ये १९८९ ते १९९९ या दशवार्षिक योजनेत ४८८ तर त्यानंतर अलिकडे २०१६ मध्ये कुरुकली व नरंदे या गावात गावठाण विस्तार झाला आहे. गावठाण विस्तार योजनेचे काम सुरु असले तरी यावर्षात एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेला नाही.

एखाद्या गावात गावठाण योजना राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव आल्यास निकषांमध्ये ते बसतात का ते पाहून ते प्रस्ताव मंजूर केले जातात. या मंजूरीनंतर गावात उपलब्ध असलेली शासकिय जमिन किंवा गायरान यासाठी देण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यात १९८९ ते १९९९ या काळात ‘तृतीय दशवार्षिक गावठाण विस्तार योजना’ राबविण्यात आली.

१९८९ मध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या कारकिर्दीत या योजनेला सुरुवात झाली. या दहा वर्षात ४८६ गावात गावठाण विस्तार झाला. यामध्ये सर्वाधिक राधानगरी तालुक्यात ८१ गावांमध्ये तर त्या खालोखाल चंदगड व कागल तालुक्यात प्रत्येकी ५४, शाहुवाडीत ४८, शिरोळमध्ये ४६, गडहिंग्लजमध्ये ४३, भुदरगडमध्ये ३९, करवीरमध्ये ३०, पन्हाळ्यात २७, हातकणंगलेमध्ये २८, आजऱ्यामध्ये २९, गगनबावड्यात ९ गावांमध्ये गावठाण विस्तार झाला आहे.

जिल्ह्यात १९९९ नंतर अलिकडच्या काळात म्हणजे २०१६ मध्ये करवीर तालुक्यातील कुरुकली व हातकणंगले तालुक्याती नरंदे येथे गावठाण विस्तार योजना झाली आहे. गावठाण विस्तार योजना सुरु असली तरी या वर्षात जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भातील एकही प्रस्ताव आलेला नाही.

गावठाणसाठी निकष व अटी

 

  1. गावाची गावठाणवाढ यापूर्वी झाली आहे का?
  2. गावठाणात प्लॉट वाटपासाठी शिल्लक पाहीजेत
  3. गावठाणासाठी आवश्यकता असल्यास कारणासहित सविस्तर खुलासा करावा
  4. गावठाणासाठी आवश्यक असणारी गायरान किंवा सरकार हक्कातील जमिनीचा उतारा जोडला पाहीजे
  5. जमिन अतिक्रमण विरहित असावी
  6. गायरानातील लागवडलायक क्षेत्राच्या ५ टक्के क्षेत्र शिल्लक असावे
  7. गावठाण वसाहतीस योग्य असल्याबाबत तहसिलदारांचा पाहणी अहवाल
  8. गावठाण वसाहतीस योग्य असल्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांचा दाखला
  9. सुचविण्यात आलेली जागा नागरि सुविधा पुरविण्यासाठी योग्य असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला
  10. गावठाणवाढीसाठी ग्रामपंचायतचा ठराव
  11. गावठाणामधील भूखंडासाठी घर नसणाऱ्यांना प्राधान्य असेल
  12. पात्र व गरजू लाभार्थ्याला मिळालेल्या भूखंडावर एक वर्षाच्या आत बांधकाम सुरु करावे लागणार आहे.
  13. पात्र लाभार्थी गावचा रहिवासी असावा

 

गावठाणासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडून याबाबतचा ठराव करुन निकषांसह कागदपत्रांची पुर्तता असलेले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्यास त्याला मंजुरी देण्यात येईल. या वर्षात एकही प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आलेला नाही. गतवर्षी नरंदे व कुरुकली येथील गावठाण वाढीच्या प्रस्तावांना मंजूरी दिली आहे.-नंदकुमार काटकर,अप्पर जिल्हाधिकारी

 

टॅग्स :collectorतहसीलदारkolhapurकोल्हापूर