शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात विमा पुन्हा सुरू; शासन भरते विम्याचा हप्ता, 'इतकी' मिळते मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 16:29 IST

प्रस्तावांची तत्काळ पडताळणी करण्याचे कृषी विभागाने दिले आदेश

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य सरकारने गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात विमा योजना नव्याने सुरू केली आहे. एप्रिल २०२२ पासून ही योजना खंडित झाल्याने राज्य पातळीवर हजारो प्रस्ताव मदतीच्या प्रतीक्षेत होते. या प्रस्तावांची तत्काळ पडताळणी करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंब अडचणीत येते. यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात योजना सहा वर्षांपूर्वी सुरू केली होती. विम्याचा हप्ता शासन भरते. या योजनेनुसार शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखांपर्यंत मदत दिली जाते. त्याचबरोबर एक अवयव निकामी झाल्यास एक लाख, तर दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाखांची मदत संबंधित शेतकऱ्यांना दिली जाते.विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, हिस्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.

काय आहेत निकष मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर सात/बारा उतारा बंधनकारकशेतकरी १० ते ७५ या वयोगटातील असावा.

कोठे संपर्क साधावा शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या नजीकचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजूरीसाठी पाठवितात.

जिल्ह्यात ११५ प्रस्ताव पडूनएप्रिल ते ऑगस्ट २०२२ अखेर योजना खंडित झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ११५ प्रस्ताव कृषी विभागाकडे आहेत. त्याची पडताळणी करून त्यांना लाभ देण्यात येणार आहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीGopinath Mundeगोपीनाथ मुंडे