शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

जयसिंगपुरात आता बंदला पूर्णविराम सलोख्यासाठी सद्भावना रॅली : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:11 IST

जयसिंगपूर : कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात या पुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करीत शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली

जयसिंगपूर : कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात या पुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करीत शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली काढण्यात आली़ महामानवांच्या शिकवणी अंगिकारण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे़ सध्याच्या डिजिटल युगात कॅशलेस न राहता कास्टलेस राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा डॉ़ नीता माने यांनी केले़.

सकाळी नगरपालिकेपासून रॅलीची मूक मोर्चाने सुरुवात झाली़. रॅलीसमोर ‘आम्ही सारे भारतीय’ बॅनर लावण्यात आला होता़ राधिका घोरपडे या युवतीच्या हातात तिरंगा ध्वज देण्यात आला होता़ जुनी भाजी मंडई, तेरावी गल्ली, शिरोळ-वाडी रोड, क्रांती चौक येथून नगरपरिषदेसमोर रॅलीची सांगता झाली़ राज्यात कोठेही काहीही अनुचित प्रकार घडला तरी शांतताप्रिय ओळख असणाºया जयसिंगपूर शहरात सामाजिक शांतता बिघडू नये म्हणून नागरिकांनी वेळोवेळी दक्षता घेतली आहे़ या रॅलीतून राष्ट्राभिमान जागृत होऊन शहराच्या एकीचा संदेश देशात जाणार आहे.

‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, गेल्या चार वर्षांत शहर बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता़; परंतु कोरेगाव भीमाच्या घटनेने तो संकल्प खंडित झाला़ भविष्यात देशात अथवा राज्यात काहीही घडल्यास सर्वांनी एकत्र येऊन निषेध नोंदवून सामाजिक सलोखा बाळगूया आणि बंद न करण्याची परंपरा या पुढेही जोपासूया़ यावेळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले, शहरातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी काढण्यात आलेली सद्भावना रॅली ही अभिनंदनीय बाब आहे़ भविष्यात शहर बंद न ठेवता़, सर्वांनी एकत्र येऊन निषेधाची परंपरा जोपासावी़ त्यास पोलीस यंत्रणेचे सहकार्य मिळेल़

या रॅलीत उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगरसेवक बजरंग खामकर, पराग पाटील, महेश कलकुटगी, राहुल बंडगर, शैलेश चौगुले, सर्जेराव पवार, नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर, रेखा देशमुख, प्रेमला मुरगुंडे, संगीता पाटील-चिंचवाडकर, अनुराधा आडके, फारूक पठाण, आदींसह नागरिक सहभागी झाले होते़जयसिंगपुरात कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात यापुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली काढण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndiaभारत