शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

जयसिंगपुरात आता बंदला पूर्णविराम सलोख्यासाठी सद्भावना रॅली : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:11 IST

जयसिंगपूर : कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात या पुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करीत शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली

जयसिंगपूर : कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात या पुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करीत शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली काढण्यात आली़ महामानवांच्या शिकवणी अंगिकारण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे़ सध्याच्या डिजिटल युगात कॅशलेस न राहता कास्टलेस राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा डॉ़ नीता माने यांनी केले़.

सकाळी नगरपालिकेपासून रॅलीची मूक मोर्चाने सुरुवात झाली़. रॅलीसमोर ‘आम्ही सारे भारतीय’ बॅनर लावण्यात आला होता़ राधिका घोरपडे या युवतीच्या हातात तिरंगा ध्वज देण्यात आला होता़ जुनी भाजी मंडई, तेरावी गल्ली, शिरोळ-वाडी रोड, क्रांती चौक येथून नगरपरिषदेसमोर रॅलीची सांगता झाली़ राज्यात कोठेही काहीही अनुचित प्रकार घडला तरी शांतताप्रिय ओळख असणाºया जयसिंगपूर शहरात सामाजिक शांतता बिघडू नये म्हणून नागरिकांनी वेळोवेळी दक्षता घेतली आहे़ या रॅलीतून राष्ट्राभिमान जागृत होऊन शहराच्या एकीचा संदेश देशात जाणार आहे.

‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, गेल्या चार वर्षांत शहर बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता़; परंतु कोरेगाव भीमाच्या घटनेने तो संकल्प खंडित झाला़ भविष्यात देशात अथवा राज्यात काहीही घडल्यास सर्वांनी एकत्र येऊन निषेध नोंदवून सामाजिक सलोखा बाळगूया आणि बंद न करण्याची परंपरा या पुढेही जोपासूया़ यावेळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले, शहरातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी काढण्यात आलेली सद्भावना रॅली ही अभिनंदनीय बाब आहे़ भविष्यात शहर बंद न ठेवता़, सर्वांनी एकत्र येऊन निषेधाची परंपरा जोपासावी़ त्यास पोलीस यंत्रणेचे सहकार्य मिळेल़

या रॅलीत उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगरसेवक बजरंग खामकर, पराग पाटील, महेश कलकुटगी, राहुल बंडगर, शैलेश चौगुले, सर्जेराव पवार, नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर, रेखा देशमुख, प्रेमला मुरगुंडे, संगीता पाटील-चिंचवाडकर, अनुराधा आडके, फारूक पठाण, आदींसह नागरिक सहभागी झाले होते़जयसिंगपुरात कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात यापुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली काढण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndiaभारत