शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप, ८० हून अधिक मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:55 IST

दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपतीबाप्पांना भाविकांनी निरोप दिला. आपल्या आगमनाने सोमवारी (दि. २) घरदार उजळवून टाकलेल्या बाप्पांना लगेच दुसऱ्या दिवशी निरोप देताना आपसूकच गणेशभक्तांचे अंत:करण जड झाले. या वर्षीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाची नांदी करीत पंचगंगा घाटावर ८० हून अधिक मूर्तींचे काहिलीत विसर्जन करण्यात आले.

ठळक मुद्देदीड दिवसाच्या बाप्पांना निरोप ८० हून अधिक मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

कोल्हापूर : दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपतीबाप्पांना भाविकांनी निरोप दिला. आपल्या आगमनाने सोमवारी (दि. २) घरदार उजळवून टाकलेल्या बाप्पांना लगेच दुसऱ्या दिवशी निरोप देताना आपसूकच गणेशभक्तांचे अंत:करण जड झाले. या वर्षीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाची नांदी करीत पंचगंगा घाटावर ८० हून अधिक मूर्तींचे काहिलीत विसर्जन करण्यात आले.प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार गणेशमूर्तींचा मुक्काम ठरलेला असतो. काही कुटुंबांमध्ये दीड दिवसाचा गणपती असतो, काही कुटुंबे अनंत चतुर्दशीलाच मूर्ती विसर्जित करतात; तर ९० टक्क्यांहून अधिक लोक गौरी-गणपतीचे एकाच वेळी म्हणजे पाचव्या किंवा सहाव्या दिवशी विसर्जन करतात.

तो येणार येणार म्हणून घराघरांत ज्याच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती, त्या लाडक्या गणरायाचे घरोघरी जल्लोषात स्वागत झाले. खीर-मोदकाचा नैवेद्य झाला. सकाळ-संध्याकाळ आरती झाली. दुसरा दिवस उजाडला, तो लाडक्या गणरायाला निरोप देणारा.ज्या कुटुंबांमध्ये दीड दिवसाचा गणपती असतो त्यांनी अधिक काळ श्रींचे घरात वास्तव्य ठेवत सायंकाळी उशिरा गणेशमूर्तीचे विसर्जन केले. शेवटची आरती झाली आणि चिरमुऱ्यांची उधळण करीत गणेशमूर्ती घराबाहेर आणण्यात आली.

घराचा अखेरचा निरोप घेऊन नजीकच्या जलाशयाच्या ठिकाणी मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दुपारी तीन वाजल्यानंतर घाटावर मूर्ती येण्यास सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या वतीने काहिली व निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा पन्हागडावर प्रथमच दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पन्हाळा येथील तुषार इनामदार व आशुतोष सोरटे यांनी खोकड तलावाशेजारी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले. 

दीड दिवसाच्या गणपतीचे प्रमाण फार कमी असल्याने येथे एक काहील ठेवण्यात आली होती. शिवाय आरतीसाठी टेबलाची सोयही करण्यात आली होती. यंदा महापूर आल्याने पर्यावरणपूरक विसर्जन केलेल्या नागरिकांना दिले जाणारे ‘सुजाण नागरिक’ हे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. रात्री आठ वाजेपर्यंत ८० हून अधिक गणेशमूर्तींचे काहिलीत पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.

 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर