शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप, ८० हून अधिक मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:55 IST

दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपतीबाप्पांना भाविकांनी निरोप दिला. आपल्या आगमनाने सोमवारी (दि. २) घरदार उजळवून टाकलेल्या बाप्पांना लगेच दुसऱ्या दिवशी निरोप देताना आपसूकच गणेशभक्तांचे अंत:करण जड झाले. या वर्षीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाची नांदी करीत पंचगंगा घाटावर ८० हून अधिक मूर्तींचे काहिलीत विसर्जन करण्यात आले.

ठळक मुद्देदीड दिवसाच्या बाप्पांना निरोप ८० हून अधिक मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

कोल्हापूर : दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपतीबाप्पांना भाविकांनी निरोप दिला. आपल्या आगमनाने सोमवारी (दि. २) घरदार उजळवून टाकलेल्या बाप्पांना लगेच दुसऱ्या दिवशी निरोप देताना आपसूकच गणेशभक्तांचे अंत:करण जड झाले. या वर्षीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाची नांदी करीत पंचगंगा घाटावर ८० हून अधिक मूर्तींचे काहिलीत विसर्जन करण्यात आले.प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार गणेशमूर्तींचा मुक्काम ठरलेला असतो. काही कुटुंबांमध्ये दीड दिवसाचा गणपती असतो, काही कुटुंबे अनंत चतुर्दशीलाच मूर्ती विसर्जित करतात; तर ९० टक्क्यांहून अधिक लोक गौरी-गणपतीचे एकाच वेळी म्हणजे पाचव्या किंवा सहाव्या दिवशी विसर्जन करतात.

तो येणार येणार म्हणून घराघरांत ज्याच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती, त्या लाडक्या गणरायाचे घरोघरी जल्लोषात स्वागत झाले. खीर-मोदकाचा नैवेद्य झाला. सकाळ-संध्याकाळ आरती झाली. दुसरा दिवस उजाडला, तो लाडक्या गणरायाला निरोप देणारा.ज्या कुटुंबांमध्ये दीड दिवसाचा गणपती असतो त्यांनी अधिक काळ श्रींचे घरात वास्तव्य ठेवत सायंकाळी उशिरा गणेशमूर्तीचे विसर्जन केले. शेवटची आरती झाली आणि चिरमुऱ्यांची उधळण करीत गणेशमूर्ती घराबाहेर आणण्यात आली.

घराचा अखेरचा निरोप घेऊन नजीकच्या जलाशयाच्या ठिकाणी मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दुपारी तीन वाजल्यानंतर घाटावर मूर्ती येण्यास सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या वतीने काहिली व निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा पन्हागडावर प्रथमच दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पन्हाळा येथील तुषार इनामदार व आशुतोष सोरटे यांनी खोकड तलावाशेजारी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले. 

दीड दिवसाच्या गणपतीचे प्रमाण फार कमी असल्याने येथे एक काहील ठेवण्यात आली होती. शिवाय आरतीसाठी टेबलाची सोयही करण्यात आली होती. यंदा महापूर आल्याने पर्यावरणपूरक विसर्जन केलेल्या नागरिकांना दिले जाणारे ‘सुजाण नागरिक’ हे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. रात्री आठ वाजेपर्यंत ८० हून अधिक गणेशमूर्तींचे काहिलीत पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.

 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर