शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

सोन्याचे दर वाढले, खरेदी घसरली, गुंतवणुकीचे प्रमाण झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:21 IST

गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने सुवर्णालंकार खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. ग्राहकांकडून लग्नसराई अथवा कौटुंबिक समारंभानिमित्त आवश्यक असेल तेवढ्याच सोन्याच्या अलंकारांची खरेदी केली जात आहे. तर गुंतवणूक म्हणून करण्यात येणारी खरेदी थांबली आहे.

ठळक मुद्देसोन्याचे दर वाढले, खरेदी घसरलीगुंतवणुकीचे प्रमाण झाले कमी

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने सुवर्णालंकार खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. ग्राहकांकडून लग्नसराई अथवा कौटुंबिक समारंभानिमित्त आवश्यक असेल तेवढ्याच सोन्याच्या अलंकारांची खरेदी केली जात आहे. तर गुंतवणूक म्हणून करण्यात येणारी खरेदी थांबली आहे.सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यातच गुरुवारी सोन्याने ४२ हजारांचा टप्पा पार केला. वाढती मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींचा परिणाम म्हणून दोन महिन्यांपूर्वी १० ग्रॅमला ४० हजार रुपये इतका दर सोन्याने गाठला होता. या आठवड्यात रोज किमान ४००, ५०० रुपयांची वाढ होऊन शुक्रवारी तो ४२ हजार ५०० रुपये इतका झाला.गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते, मात्र आता सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने गुंतवणूक म्हणून केली जाणारी खरेदी जवळपास थांबली आहे. एका ठरावीक टप्प्यांपर्यंत दरवाढ झाली की सोन्याचे दर स्थिरावतात. मात्र, गेल्या दोन तीन महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढच होत आहे. त्यामुळे जोपर्यंत हा दर स्थिरावत नाही तोपर्यंत ग्राहकांकडून आवश्यक अलंकार वगळता सोने खरेदीत अशीच घसरण राहणार आहे.

सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ठरतो, आणि त्याचे परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होतात. सोन्याचा दर ४० हजारांवर गेल्यापासूनच गुंतवणूक म्हणून केली जाणारी खरेदी थांबली आहे. दर स्थिरावत नाहीत तोपर्यंत ही स्थिती अशीच राहील.- लक्ष्मण माने, व्यावसायिक

 

टॅग्स :Goldसोनंkolhapurकोल्हापूर