शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

‘गोकुळ’च्या सत्तेसाठीच ‘मल्टिस्टेट’चा घाट :सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:29 IST

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची गत निवडणूक जड गेल्याने एका व्यापाऱ्याच्या हातात संघ राहणार नाही, याची खात्री झाल्याने ‘मल्टिस्टेट’चा घाट घातल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. कार्यक्षेत्राबाहेर दूध संकलन केल्याने दोन वर्षांत ८५.२१ कोटींचा तोटा झाल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवला असताना कुणाच्या सोयीसाठी हा निर्णय घेता? असा सवाल करत संस्थांनी मल्टिस्टेटच्या विरोधाचे ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची गत निवडणूक जड गेल्याने एका व्यापाऱ्याच्या हातात संघ राहणार नाही, याची खात्री झाल्याने ‘मल्टिस्टेट’चा घाट घातल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. कार्यक्षेत्राबाहेर दूध संकलन केल्याने दोन वर्षांत ८५.२१ कोटींचा तोटा झाल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवला असताना कुणाच्या सोयीसाठी हा निर्णय घेता? असा सवाल करत संस्थांनी मल्टिस्टेटच्या विरोधाचे ठराव करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.‘गोकुळ’च्या २१ सप्टेंबरच्या सभेपुढे मल्टिस्टेटचा विषय असून विरोध करण्यासाठी ‘गोकुळ बचाव कृती समिती’च्या प्रमुख पदाधिकाºयांची बैठक रविवारी शासकीय विश्रामगृहात झाली. राजकीय द्वेषातून नव्हे तर उत्पादकांच्या हितासाठी विरोध असल्याचे सांगत आमदार पाटील म्हणाले, गेली ५६ वर्षे जिल्ह्यातील सामान्य माणसांच्या घामातून संघाचा डोलारा उभा राहिला, त्यांच्या स्वाभिमानाला व अधिकाराला धक्का लागत आहे. कार्यक्षेत्रातील बाहेरील दूध खरेदी केल्याने सन २०१५-१६ मध्ये २४.४४ कोटी, तर सन २०१७-१८ मध्ये ६४.७७ कोटींचा तोटा झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात असताना मल्टिस्टेटचा घाट का? मागील निवडणूक जड गेल्यानेच यावेळी सत्ता जाणार या भीतीने एका व्यापाºयाचे प्रयत्न सुरू आहेत. कोणाला संधी द्यायचा हा सभासदांचा निर्णय आहे; पण ज्यांचे योगदान काही नाही, अशा प्रवृत्तीला बाजूला ठेवा. कर्नाटकातून एजन्सीमार्फत दूध गोळा केले जाते, या एजन्सी कोणाच्या आहेत? तेथील उत्पादकांना किती पैसे देता? याचे उत्तर ‘गोकुळ’च्या कारभाºयांनी द्यावे. या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी उद्यापासून प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ते जाणार असून संस्थांकडून मल्टिस्टेटच्या विरोधाचे १८ सप्टेंबरपर्यंत ठराव गोळा करणार आहेत. दबावापोटी काही संस्था आमच्याकडे ठराव देऊ शकत नसल्या तरी त्यांनी सहायक निबंधकांकडे द्यावे, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले. माजी आमदार संपतराव पवार, बाळासाहेब कुपेकर, युवराज गवळी, विद्याधर गुरबे यांनी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब देवकर यांनी प्रास्ताविक केले. ‘कुंभी’चे संचालक किशोर पाटील, विजयसिंह मोरे, सदाशिव चरापले, बाबासाहेब चौगले, महेश नरसिंगराव पाटील, एस. आर. पाटील, बजरंग पाटील, मधुआप्पा पाटील, किरणसिंह पाटील, अमित कांबळे, आदी उपस्थित होते.गाईचे दूध तोट्यात कसे?मुंबईत रोज ४.४० लाख लिटर ‘गोकुळ’चे दुधाची ५६ रुपयांनी, तर गाईच्या २.२० लाख लिटर टोण्ड दुधाची ४६ रुपयांनी विक्री होते. खरेदी-विक्रीमध्ये सरासरी २० रुपये तफावत असताना संघ तोट्यात कसा? गाईचे दूध नाकारण्यामागे नेमका हेतू काय? असा सवाल पाटील यांनी केला.कायदा-सुव्यवस्थेसपोलीस अधीक्षकच जबाबदारसभास्थळी १८०० खुर्च्या ठेवल्या आहेत. संघाचे चार हजार सभासद असल्याने सभा खुल्या मैदानात घेण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असे पाटील यांनी सांगितले.पॅनेलमध्ये जातिवंतांना घ्यापाच वर्षे दूध घालूनही सभासद करून घेतले नसल्याचे प्रदीप पाटील-भुयेकर, सी. बी. चौगले यांनी सांगितले. गेल्यावेळेला अंबरीश घाटगे यांच्यासाठी जिवाचे रान केले, सभासदांसाठी त्यांच्याकडे गेल्यावर आपण कागलचे असल्याचे सांगितले. साहेब, पुढच्या वेळेला जातिवंतांनाच पॅनेलमध्ये घ्या, असे चौगले यांनी सांगितले.हसन मुश्रीफही सभेला येणारआजरा कारखान्याचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, हसन मुश्रीफ यांना विचारूनच बैठकीला आलो. मल्टिस्टेटला विरोध करण्याची त्यांचीही भूमिका आहे. ते स्वत: सभेला येणार आहेत. कोल्हापूरच्या स्वाभिमान व हक्काची लढाई आहे. स्वाभिमानासाठी जिल्ह्यातील सर्व नेते सभेला उपस्थित राहून विरोध करतील, असे आमदार पाटील यांनी सांगितले.संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा?ताळेबंदानुसार ११६.९८ कोटींची बाहेरील कर्जे व देणी, ७४.८२ कोटी डिबेंचर्स, ४२.३३ कोटी दूध उत्पादक भविष्य निधी व १४८.०२ कोटी चालू देणी आहेत. त्याचबरोबर संघाची कायम मालमत्ता २१७.९३ कोटींची आहे. ताळेबंदास जरी १७०.३३ कोटींची गुंतवणूक दिसत असली तरी त्यामध्ये वापरता येणारी मुदतबंद ठेव फक्त ९२.१० कोटी आहे. ही रक्कम उत्पादकांना दर फरकापोटी द्यावी लागणार आहे, म्हणजे संघ आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहे, हे स्पष्ट होते, असे पाटील यांनी सांगितले.संचालकांना नारळआता संस्थांचा गठ्ठा असल्याने ज्येष्ठ संचालकांना किंमत आहे. उद्या कर्नाटकातील संस्था वाढल्याने व्यापारी मंडळी संघाच्या सुपरवायझरला उभे करतील. कार्यक्षेत्र वाढले तर तेथील संचालक येणार असल्याने विद्यमान चार-पाच जणांना नारळ मिळणार हे निश्चित असल्याचे पाटील म्हणाले.