शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

‘गोकुळ’ : फसवणूक केली तर संचालकांना गावात फिरणे मुश्कील : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 10:23 IST

‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द करत असल्याचे स्वत:च सभेत सांगितले असताना पुन्हा दगाफटका करण्याचा उद्देश त्यांचा दिसतो. आता फसवणूक केली तर दूध उत्पादक संचालकांना गावात फिरू देणार नाहीत आणि त्यांना फसवणूक करायचीच असेल तर ती करावीच, असे उघड आव्हान आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

ठळक मुद्देफसवणूक केली तर संचालकांना गावात फिरणे मुश्कील सतेज पाटील यांचा इशारा

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द करत असल्याचे स्वत:च सभेत सांगितले असताना पुन्हा दगाफटका करण्याचा उद्देश त्यांचा दिसतो. आता फसवणूक केली तर दूध उत्पादक संचालकांना गावात फिरू देणार नाहीत आणि त्यांना फसवणूक करायचीच असेल तर ती करावीच, असे उघड आव्हान आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.पाटील म्हणाले, ‘सत्तारूढ गटाने जे दूध संस्थेचे प्रतिनिधी नाहीत, अशा लोकांना आणून बसविले होते. त्याच लोकांनी गोंधळ सुरू केला. आमचे म्हणणे एवढेच आहे, रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द करण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी करावी. त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत, ते त्यांनी बघावे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील निकालाची धास्ती घेऊनच मल्टिस्टेटचा ठराव रद्द केला आहे....तर ताकदीने सभेला गेलो असतो.अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द केल्याचे जाहीर केले. त्यात आमदार पी. एन. पाटील यांनी स्वत: आमदार हसन मुश्रीफ यांना फोन करून, ‘हा ठराव रद्द करत आहे, तुम्ही सभेला जाऊ नका’, असा निरोप दिला; त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही, असा दगाफटका करणार असतील तर आम्ही सगळे ताकदीने गेलो असतो, असे सतेज पाटील यांनी सांगितले.जीत भी मेरी और...सत्तारूढ गट आता कोणताही निर्णय घेऊ दे, कितीही फसवणूक करू देत. आता ‘जीत भी मेरी और पट भी मेरा’ असल्याचे पाटील यांनी सांगितले.प्रसिद्धीसाठी विरोधकांकडून गोंधळ-रवींद्र आपटे मल्टिस्टेटबाबत सविस्तर खुलासा केला असताना केवळ प्रसिद्धीसाठी काही मंडळींनी गोंधळ घातला; पण बहुसंख्य सभासदांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी दिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.मागील सभेचे प्रोसीडिंग रद्द करण्याची कायद्यात तरतूद नाही. ठराव झाला, दोन राज्यांची मंजुरी मिळाली आणि केंद्रीय मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याबाबत दूध उत्पादकांच्या मनात गैरसमज आहेत, ते दूर केल्याशिवाय आम्ही मल्टिस्टेट करणार नाही. याबाबत सरकारच्या पातळीवर जो काही पाठपुरावा करावा लागेल, तो केला जाईल.

भविष्यात दूध उत्पादकांकडून मागणी झाली आणि गरज निर्माण झाली तर त्यावेळची परिस्थिती पाहून मल्टिस्टेटबाबत निर्णय घेऊ, कारण नसताना ताणतणाव नको, म्हणून आम्ही निर्णय घेतला. विषयपत्रिकेवरील विषयाचे वाचन सुरू असताना काही लोकांनी गोंधळ सुरू केला; पण बहुसंख्य सभासद आमच्या बाजूने होते; त्यामुळे सभेचे कामकाज शांततेत पार पडल्याचे आपटे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Gokul MilkगोकुळSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर