शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती १०९८ वर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची माहिती रुग्णालयांनी तसेच नातेवाईकांनी १०९८ वर द्यावी, कोणालाही स्वत:च्या अधिकारात ...

कोल्हापूर : कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची माहिती रुग्णालयांनी तसेच नातेवाईकांनी १०९८ वर द्यावी, कोणालाही स्वत:च्या अधिकारात या बालकांना दत्तक किंवा अन्य कोणाकडे सांभाळ करण्यासाठी देता येणार नाही. बालकल्याण समितीमार्फतच बालकांचा निर्णय घेतला जावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिल्या.

सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, एकाच कुटुंबातील पती, पत्नीचे निधन होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांच्या लहान मुलांच्या वाट्याला अनाथपण येत आहे. या अनाथ झालेल्या मुलांना परस्पर दत्तक देण्यासारखे मेसेजेस व्हायरल होत आहेत. शिवाय त्यांची तस्करी, अवैध कारणांसाठी वापर होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्याच अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुजाता शिंदे, बालसंरक्षण अधिकारी सागर दाते, आशिष पुंडपळ, संजय चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे उपस्थित होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव पंकज देशपांडे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी सहभाग घेतला.

यावेळी शहर व जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये व कोविड सेेंटरमध्ये अनाथ झालेल्या बालकांची माहिती १०९८ वर द्या, असे सांगणारे फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. माहिती देण्याची जबाबदारी रुग्णालयांची, वैद्यकीय अधिकारी व कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची असणार आहे.

---

बाहेरून येणाऱ्या मुलांसाठी कोविड सेंटर

येथील बालकल्याण संकुलमध्ये पोलिसांकडील आदेशाने बाहेरून आलेल्या मुलींमुळे अन्य बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या ४५ हून अधिक बालके बाधित झाली आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी बाहेरून येणाऱ्या मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. येथे त्यांची कोरोना चाचणी करून अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना संस्थेत दाखल केले जाईल.

---

पुनर्वसनासाठी योग्य पाऊल

अनाथ झालेल्या बालकांची बेकायदेशीर तस्करी, अनैतिक मानवी वाहतूक, बालकामगार, वेश्या व्यवसाय अशा कारणांसाठी वापर केला जाऊ शकतो. असे घडू नये, त्यांचे बालपण जपले जावे, त्यांना नातेवाईक सांभाळणार असतील, तर त्यांनी तसे सांगावे, त्यासाठी कोणतीही आडकाठी घातली जात नाही; पण ते शक्य नसेल, तर बालकांना शासकीय संस्थेत दाखल करण्यात यावे. असे झाल्यास नियमानुसार दत्तक देऊन पुनर्वसन करता येईल.

--

नोंदणीशिवाय अधिकार नाही

अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी अनेक व्यक्ती व संस्था पुढे आल्या आहेत, मात्र जोपर्यंत शासनदरबारी नोंदणी होत नाही, तोपर्यंत त्यांना अशी बालके सांभाळण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या नातेवाईकांनी सर्वात आधी १०९८ ला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---