शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती १०९८ वर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची माहिती रुग्णालयांनी तसेच नातेवाईकांनी १०९८ वर द्यावी, कोणालाही स्वत:च्या अधिकारात ...

कोल्हापूर : कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची माहिती रुग्णालयांनी तसेच नातेवाईकांनी १०९८ वर द्यावी, कोणालाही स्वत:च्या अधिकारात या बालकांना दत्तक किंवा अन्य कोणाकडे सांभाळ करण्यासाठी देता येणार नाही. बालकल्याण समितीमार्फतच बालकांचा निर्णय घेतला जावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिल्या.

सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, एकाच कुटुंबातील पती, पत्नीचे निधन होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांच्या लहान मुलांच्या वाट्याला अनाथपण येत आहे. या अनाथ झालेल्या मुलांना परस्पर दत्तक देण्यासारखे मेसेजेस व्हायरल होत आहेत. शिवाय त्यांची तस्करी, अवैध कारणांसाठी वापर होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्याच अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुजाता शिंदे, बालसंरक्षण अधिकारी सागर दाते, आशिष पुंडपळ, संजय चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे उपस्थित होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव पंकज देशपांडे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी सहभाग घेतला.

यावेळी शहर व जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये व कोविड सेेंटरमध्ये अनाथ झालेल्या बालकांची माहिती १०९८ वर द्या, असे सांगणारे फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. माहिती देण्याची जबाबदारी रुग्णालयांची, वैद्यकीय अधिकारी व कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची असणार आहे.

---

बाहेरून येणाऱ्या मुलांसाठी कोविड सेंटर

येथील बालकल्याण संकुलमध्ये पोलिसांकडील आदेशाने बाहेरून आलेल्या मुलींमुळे अन्य बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या ४५ हून अधिक बालके बाधित झाली आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी बाहेरून येणाऱ्या मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. येथे त्यांची कोरोना चाचणी करून अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना संस्थेत दाखल केले जाईल.

---

पुनर्वसनासाठी योग्य पाऊल

अनाथ झालेल्या बालकांची बेकायदेशीर तस्करी, अनैतिक मानवी वाहतूक, बालकामगार, वेश्या व्यवसाय अशा कारणांसाठी वापर केला जाऊ शकतो. असे घडू नये, त्यांचे बालपण जपले जावे, त्यांना नातेवाईक सांभाळणार असतील, तर त्यांनी तसे सांगावे, त्यासाठी कोणतीही आडकाठी घातली जात नाही; पण ते शक्य नसेल, तर बालकांना शासकीय संस्थेत दाखल करण्यात यावे. असे झाल्यास नियमानुसार दत्तक देऊन पुनर्वसन करता येईल.

--

नोंदणीशिवाय अधिकार नाही

अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी अनेक व्यक्ती व संस्था पुढे आल्या आहेत, मात्र जोपर्यंत शासनदरबारी नोंदणी होत नाही, तोपर्यंत त्यांना अशी बालके सांभाळण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या नातेवाईकांनी सर्वात आधी १०९८ ला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---