शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

व्याज परताव्यास पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्या, राजू शेट्टींची राज्य सरकारकडे मागणी

By राजाराम लोंढे | Updated: July 16, 2022 17:22 IST

जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना या निकषाचा फटका बसणार

कोल्हापूर : ऊस, केळी व द्राक्षासारख्या बहुवार्षिक पिकांची पीक कर्जे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीची असतात. हे शेतकरी सलग तीन आर्थिक वर्षाच्या कर्ज परत फेडीच्या निकषात बसत नाहीत. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.राज्य शासनाने नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यातील निकषामुळे बहुतांशी ऊस उत्पादक शेतकरी अपात्र ठरत आहेत. जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना या निकषाचा फटका बसणार असल्याने निकषात बदल करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ९ ऑगस्टपूर्वी निर्णय घेण्यास सांगितले होते.शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजू शेट्टी यांची मुंबईत बैठक झाली. यामध्ये त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलतीसाठी पात्र असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिल्यास एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले.महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना भूमी अधिग्रहण कायद्यात बदल केला, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यांतील एफ. आर.पी.चा निर्णय घेतला. हे निर्णय रद्द करा व राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांना थेट नाबार्डकडून ४ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यास केंद्र सरकारला राज्य सरकारकडून शिफारस करावी व शेतीपंपास दिवसा वीज देण्यात यावी, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील, अनिल मादनाईक, डॉ. सोमेश्वर गोलगिरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीEknath Shindeएकनाथ शिंदे