शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

व्याज परताव्यास पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्या, राजू शेट्टींची राज्य सरकारकडे मागणी

By राजाराम लोंढे | Updated: July 16, 2022 17:22 IST

जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना या निकषाचा फटका बसणार

कोल्हापूर : ऊस, केळी व द्राक्षासारख्या बहुवार्षिक पिकांची पीक कर्जे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीची असतात. हे शेतकरी सलग तीन आर्थिक वर्षाच्या कर्ज परत फेडीच्या निकषात बसत नाहीत. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.राज्य शासनाने नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यातील निकषामुळे बहुतांशी ऊस उत्पादक शेतकरी अपात्र ठरत आहेत. जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना या निकषाचा फटका बसणार असल्याने निकषात बदल करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ९ ऑगस्टपूर्वी निर्णय घेण्यास सांगितले होते.शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजू शेट्टी यांची मुंबईत बैठक झाली. यामध्ये त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलतीसाठी पात्र असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिल्यास एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले.महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना भूमी अधिग्रहण कायद्यात बदल केला, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यांतील एफ. आर.पी.चा निर्णय घेतला. हे निर्णय रद्द करा व राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांना थेट नाबार्डकडून ४ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यास केंद्र सरकारला राज्य सरकारकडून शिफारस करावी व शेतीपंपास दिवसा वीज देण्यात यावी, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील, अनिल मादनाईक, डॉ. सोमेश्वर गोलगिरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीEknath Shindeएकनाथ शिंदे