शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

व्याज परताव्यास पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्या, राजू शेट्टींची राज्य सरकारकडे मागणी

By राजाराम लोंढे | Updated: July 16, 2022 17:22 IST

जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना या निकषाचा फटका बसणार

कोल्हापूर : ऊस, केळी व द्राक्षासारख्या बहुवार्षिक पिकांची पीक कर्जे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीची असतात. हे शेतकरी सलग तीन आर्थिक वर्षाच्या कर्ज परत फेडीच्या निकषात बसत नाहीत. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.राज्य शासनाने नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यातील निकषामुळे बहुतांशी ऊस उत्पादक शेतकरी अपात्र ठरत आहेत. जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना या निकषाचा फटका बसणार असल्याने निकषात बदल करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ९ ऑगस्टपूर्वी निर्णय घेण्यास सांगितले होते.शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजू शेट्टी यांची मुंबईत बैठक झाली. यामध्ये त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलतीसाठी पात्र असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिल्यास एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले.महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना भूमी अधिग्रहण कायद्यात बदल केला, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यांतील एफ. आर.पी.चा निर्णय घेतला. हे निर्णय रद्द करा व राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांना थेट नाबार्डकडून ४ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यास केंद्र सरकारला राज्य सरकारकडून शिफारस करावी व शेतीपंपास दिवसा वीज देण्यात यावी, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील, अनिल मादनाईक, डॉ. सोमेश्वर गोलगिरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीEknath Shindeएकनाथ शिंदे