शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

काळम्मावाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या, आमदार पी. एन. पाटील यांची मागणी

By विश्वास पाटील | Updated: July 24, 2023 19:51 IST

कौलव : काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता. त्याचा कोल्हापूर ...

कौलव : काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता. त्याचा कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला फटका बसला. भिंतीला गळती लागल्यामुळे धरण धोक्यात असून दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्यावा, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील-सडोलीकर यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबीची गांभीर्याने नोंद घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.काळम्मावाडी धरणाची पाणीसाठवण क्षमता २८ टी.एम.सी. असून या धरणाच्या मुख्य भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. धरणातून प्रतिसेकंद ६५० लिटर्स पाणी गळती होते. ही गळती एक वर्षात काढणार असून ८४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे व निविदा  काढणार आहे. असे सांगून काही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीस टक्के पाणीसाठा कमी केला होता. मात्र पावसाला उशिर झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यात तीव्र  पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते. मात्र गेल्या वर्षभरात या कामावर एक रुपयाही खर्च झालेला नाही.जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पाणी टंचाई का निर्माण झाली असा प्रश्न उपस्थित केला असता या कामासाठी टेंडरच  मंजूर झाले नसून ८४  कोटींचे पुन्हा टेंडर काढणार असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यासाठी पुन्हा या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला जाणार आहे. त्यामुळे यंदा पुन्हा तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे धरण फुटल्यावरच काम होणार काय? असा संतप्त सवाल आ. पाटील यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री फडणवीस तातडीने कार्यवाहीचे दिले आश्वासनधोकादायक असलेल्या काळम्मावाडी धरणाची दुरुस्ती लवकर होणार काय? याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावे व तातडीने निधी मंजूर करून निविदा काढावी अशी मागणीही पाटील यांनी केली. या मागणीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणP. N. Patilपी. एन. पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३