शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

उद्योजकांना समान दराने वीज द्या: संतोष मंडलेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 1:30 AM

कोल्हापूर : औद्योगिक क्षेत्राचे जाळे अधिक मजबूत करायचे असेल तर राज्यातील सर्व भागांतील उद्योजकांना

ठळक मुद्दे कोल्हापुरातील उद्योजकांशी समस्यांसंदर्भात चर्चाविजेचे दर मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्टÑ या ठिकाणी वेगवेगळे आहेतकेंद्र सरकारची योजना असलेले ‘मुद्रा लोन’ बॅँका देत नाहीत

कोल्हापूर : औद्योगिक क्षेत्राचे जाळे अधिक मजबूत करायचे असेल तर राज्यातील सर्व भागांतील उद्योजकांना एकाच समान दराने वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली. या मागणीसह ‘मुद्रा लोन’चा विषय हाती घेऊन राज्य तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही उद्योगात विजेचा कच्चा माल म्हणूनच वापर केला जातो. विशेषत: फौंड्री, स्टील उद्योगांना वीज ही कच्चा माल म्हणूनच लागते; परंतु या विजेचे दर मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्टÑ या ठिकाणी वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी दरआकारणी केली जाते, सबसिडी दिली जाते; त्यामुळे वीजदरात ही तफावत आहे; परंतु औद्योगिक विकास साधायचा असेल आणि उद्योगांचे क्षेत्र अधिक मजबूत करायचे असेल तर त्यासाठी राज्यात सर्वत्र विजेचे दर सारखेच असले पाहिजेत. म्हणूनच याचा राज्य सरकारने पुनर्विचार करावा, असे मंडलेचा म्हणाले.

एकीकडे सौरऊर्जेचे उत्पादन पाच ते सहा पटींनी वाढल्याचा दावा केला जातो; पण उत्पादन वाढते तेव्हा दर कमी होतात, याचा अनुभव या सौरऊर्जेच्या बाबतीत आलेला नाही. त्यामुळे जाहीर केलेल्या खºया आकड्यांचेही आता संशोधन करावे लागेल, असे मंडलेचा म्हणाले.

नोटबंदी, जीएसटी, लोड शेडिंग यांचा राज्यातील उद्योग क्षेत्रावर परिणाम तसेच त्रास झाला असला तरी परिस्थिती आता सुधारत आहे. आर्थिक शिस्त यायला लागली आहे. केंद्र सरकारच्या दीर्घ मुदतीच्या योजना चांगल्या आहेत; परंतु त्यांचे परिणाम यायला आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारची योजना असलेले ‘मुद्रा लोन’ बॅँका देत नाहीत, अशा तक्रारी आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे हा विषयही आम्ही हाती घेणार आहोत. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाºयांना भेटून याबाबत तक्रारी केल्या जातील. जिल्हाधिकाºयांमार्फत मुद्रा लोन देण्यासाठी बॅँकांवर दबाव आणला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.तत्पूर्वी, मंडलेचा यांनी कोल्हापुरातील उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जयेश ओसवाल, शिवाजीराव पोवार, चंद्रकांत जाधव, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, आनंद माने, हरिभाई पटेल, बाबासो कोंडेक र, राजू पाटील, आदी उपस्थित होते.कृषी उद्योगाबाबत फेब्रुवारी २०१८ मध्ये परिषदराज्याच्या विकासाचा वेग वाढविण्यासाठी महाराष्टÑ चेंबरने नवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले असून, त्याचाच एक भाग म्हणून कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया उद्योगासाठी नवीन संधी याविषयी विशेष परिषद फेबु्रवारी २०१८ मध्ये कोल्हापूर येथे घेण्यात येणार आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीशी निगडित विविध तरतुदी, समस्या यांच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बाजार समित्यांशी निगडित घटकांची राज्यस्तरीय परिषद डिसेंबरच्या पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यात आयोजित केली जाणार असल्याची माहितीही मंडलेचा यांनी दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार