शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
4
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
5
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
6
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
7
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
8
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
9
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
10
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
11
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
12
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
13
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
14
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
15
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
16
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
17
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
18
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
19
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
20
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

जमीन संपादनाचा चौपट मोबदला द्या, उच्च न्यायालयाचे आदेश : कोल्हापूर जिल्ह्यातील किणीतील जमीन मालकास न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 18:07 IST

जमीन संपादन केल्यानंतर मोबदल्याची रक्कम जमीन मालकाला वेळेत दिली नाही ह्या कारणावरून कोल्हापूर जिल्ह्यातील किणी येथील शामगोंडा पाटील व त्यांच्या बंधूंच्या जमीनीचे भूसंपादन रद्द करून राज्य शासनाला ह्या भूसंपादनापोटी नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे चौपट रकमेचा मोबदला एका वर्षात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिश मंजुळा चेल्लूर व न्यायाधिश महेश सोनक यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिले.

ठळक मुद्देमोबदल्याची रक्कम जमीन मालकाला वेळेत दिली नाही ह्या कारणावरून भूसंपादन रद्द नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे चौपट रकमेचा मोबदला एका वर्षात देण्याचे आदेश जर प्रत्यक्ष नुकसान भरपाई दिली नसेल तर भूसंपादन रद्द

कोल्हापूर : जमीन संपादन केल्यानंतर मोबदल्याची रक्कम जमीन मालकाला वेळेत दिली नाही ह्या कारणावरून कोल्हापूर जिल्ह्यातील किणी येथील शामगोंडा पाटील व त्यांच्या बंधूंच्या जमीनीचे भूसंपादन रद्द करून राज्य शासनाला ह्या भूसंपादनापोटी नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे चौपट रकमेचा मोबदला एका वर्षात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिश मंजुळा चेल्लूर व न्यायाधिश महेश सोनक यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिले. त्यामुळे बऱ्यांच भूमिसंपादन झालेल्या जमीन मालकांना ह्याचा लाभ मिळू शकतो.

मुळ जमीन मालक पायगोंडा पाटील यांची शेतजमीन शासनाने ५६ आर जमीन दुधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादित केली. त्यासंबंधी निवडा १९८९ मध्ये घोषित होऊन ४२ हजार रुपयाची तुटपुंजी नुकसान भरपाई देऊ केली. पण प्रत्यक्षात ती केंव्हाही जमीन मालकाच्या हाती अथवा खात्यामध्ये जमा केली नाही. त्यानंतर जमीन मालकांनी भूसंपादन अधिकाऱ्यांबरोबर पत्रव्यवहार करून मोबदल्याची रक्कम दिली गेली नसल्याचे वारंवार निदर्शनाला आणून दिले परंतु त्यास कोणतीही दाद शासनाने लागू दिली नाही.

दरम्यान ह्या जमिनीचा ताबा प्रकल्पग्रस्त व्यक्तीला देऊन त्याचे पुनर्वसन सुद्धा करण्यात आले. परंतु जमीन मालक हे शासन दरबारी उंबरठे झिजवत राहिले परंतु जमीनच्या जमीन गेली पण त्याच बरोबर नुकसानभरपाई तर हाती लागलीच नाही. दरम्यानच्या काळामध्ये जमीन मालक पायगोंडा यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या वारसांनी म्हणजे शामगोंडा पाटील व त्यांच्या बंधूनी त्याचा पाठपुरावा चालू ठेवला.

अंतिमत: उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला व हा १९८९ चा निवडा तसेच ऐकून भूमिसंपादनाच्या प्रक्रियेस रिट याचिका दाखल करून आव्हान दिले. त्याची सुनावणी न्यायाधिश चेल्लूर व सोनक यांच्या खंडपीठासमोर झाली. अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी युक्तिवाद केला की, नवीन भूमी संपादन कायद्याप्रमाणे जर जुन्या कायद्यातील भूसंपादनाच्या मोबदल्याची रक्कम प्रत्यक्षात मुळ जमीन मालकाला दिली गेली नसेल तर अशा स्थितीमध्ये भूमी संपादन रद्दबातल ठरविले पाहिजे.

ह्या केसमध्ये १९८९ पासून एक छदामही शासनाने जमीन मालकाला प्रत्यक्षात दिला नाही त्यामुळे भूमिसंपादन हे मुळातूनच रद्द बातल होते. त्यामुळे हे भूमी संपादन रद्द करावे अशी विनंती केली. तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ही भूमिसंपादन प्रक्रियाच रद्द बातल केली परंतु शासनाने जमीनीचा ताबा फार वषार्पूर्वी घेऊन धरणग्रस्त व्यक्तीचे पुनर्वसन त्या जमिनीत झाल्याने जमीन परत देण्यास नकार दिला.

जर प्रत्यक्ष नुकसान भरपाई दिली नसेलतर भूसंपादन रद्दकेंद्र सरकारने २०१३ नवीन भूसंपादनाचा कायदा पारित केला व जुना भूमिसंपादन कायदा रद्द केला. परंतु जर जुन्या कायद्याखालील संपादनाला काही प्रमाणात संरक्षण दिले. परंतु नवीन कायद्याखाली मूळ मालकास जर प्रत्यक्ष नुकसान भरपाई दिली नसेल अथवा जमिनीच्या ताबाच घेतला गेला नसेल तर त्यास संरक्षण दिले आहे अशा स्थितीत भूसंपादन रद्द केले जाऊ शकते.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयkolhapurकोल्हापूर