शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

दीपक केसरकरांचा राजीनामा घ्या, कोल्हापूरकर मुख्यमंत्र्यांना एक लाख ई-मेल पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 16:25 IST

शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथील मेन राजाराम शाळेचे स्थलांतर करण्याचा घाट रचला

कोल्हापूर : शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथील मेन राजाराम शाळेचे स्थलांतर करण्याचे ठरवले आहे. शाहूविचारांना हा हरताळ फासणे असून त्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक लाख ई-मेल पाठवण्याचा निर्णय मंगळवारी माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी नलवडे म्हणाले, या शाळेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शाळा वाचवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरच्या आंदोलनाची तयारी ठेवावी. वसंतराव मुळीक म्हणाले, केवळ आत्ताच नव्हे तर शाळेच्या विकासासाठीही सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. दिलीप देसाई यांनी विविध आंदोलनांची माहिती देऊन याच पद्धतीने ‘मेन राजाराम’चे आंदोलन लढण्याचे आवाहन केले.संभाजी ब्रिगेडचे रूपेश पाटील यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. ॲड. पडवळ, अष्टविनायक चव्हाण यांचीही यावेळी भाषणे झाली. पहिल्या मेळाव्यात भूमिका स्पष्ट करण्यासाठी पालकमंत्री केसरकर यांना १५ दिवसांचा कालावधी दिला आहे. तो आता संपत आला आहे. तरीही त्यांनी खुलासा केला नाही तर कोल्हापूरकर ठरवतील त्या पद्धतीने आंदोलनाचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरण्याचे निश्चित करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDipak Kesarkarदीपक केसरकर