शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

Ganesh Visarjan 2018 : कोल्हापूरात बाप्पांसह ‘कर्णकर्कश वाद्या’लाही निरोप, २३ तासांनी विसर्जन मिरवणुकीची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 12:16 PM

विचारांचा वारसा लाभलेल्या आणि सातत्याने नव्या बदलाच्या प्रक्रियेची कास धरणाऱ्या पुरोगामी ‘कोल्हापूर’ने रविवारी याच परंपरेतील मानदंडात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

ठळक मुद्देबाप्पांसह ‘कर्णकर्कश वाद्या’लाही निरोप, पारंपारिक वाद्यांचा गजर २३ तासांनी विसर्जन मिरवणुकीची सांगता

कोल्हापूर : विचारांचा वारसा लाभलेल्या आणि सातत्याने नव्या बदलाच्या प्रक्रियेची कास धरणाऱ्या पुरोगामी ‘कोल्हापूर’ने रविवारी याच परंपरेतील मानदंडात आणखी एक मानाचा तुरा खोवला. मोठ्या कर्णकर्कश आवाजाच्या यंत्रणेला यंदा शंभर टक्के फाटा देत गणेशोत्सवाचे पावित्र्य तर जपलेच शिवाय महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रदर्शन घडवत, पारंपारिक वाद्यांचा गजरात गणरायाला निरोप दिला.

भक्तीचा आणि उत्साहाचा रविवारी सकाळी नऊ वाजता सुरु झालेला हा जल्लोष सोमवारी सकाळी आठ वाजता म्हणजे अखंडपणे २३ तासांनी संपला. सकाळी मिरवणुकीच्या सुरवातीस महापौर शोभा बोंद्रे यांना झालेली धक्काबुक्की तसेच गणपती पुढे घेण्यावरुन मंगळवार पेठेतील प्रॅक्टीस क्लब व पोलिसांमध्ये झालेला गैरसमज आणि त्यातून कार्यकर्त्यांवर झालेला लाठीमार वगळता संपूर्ण मिरवणुकीत कोठेही खुट्ट झाले नाही. या लाठीमारात मंडळाचे १३ कार्यकर्ते जखमी झाले.कोल्हापूर शहर आणि परिसरात गेल्या दहा दिवसापासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची सांगता रविवारी विसर्जन मिरवणुकीने झाली. सकाळी नऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी महापौर आर. के. पोवार, अ‍ॅड. धनंजय पठाडे, वसंत मुळीक, विजय देवणे, दिलीप देसाई, लाला गायकवाड, उदय गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आणि श्रींची आरती करुन मिरवणुकीला सुरवात झाली.

परंपरेनुसार मंगळवार पेठेतील तुकाराम माळी तालीम मंडळाला यंदाही मिरवणुकीत अग्रभागी राहण्याचा मान मिळाला. मंडळाची मूर्ती पालखीत ठेवण्यात आली होती. ही पालखी काही अंतर मान्यवरांनी वाहून नेली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या श्रीमंत प्रतिष्ठाणच्या ढोल ताशा पथकाने वातावरणात जल्लोष निर्माण केला. हा जल्लोष पुढे सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत अखंडपणे टिकून राहिला.मिरवणुकीला प्रारंभ होण्याआधीच शहरातील अनेक मंडळांनी आपल्या मूर्ती परस्पर विसर्जनाकरीता पंचगंगा नदी घाट तसेच इराणी खण येथे नेल्या. सकाळी लवकर बाहेर पडून विसर्जन करण्याच्या हेतूने मंडळांचे कार्यकर्ते बाहेर पडल्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच सातत्य निर्माण झाले.

मिरवणुकीत कर्णकर्कश ध्वनी यंत्रणेला पूर्णपणे बगल देत सर्वच मंडळांनी प्रत्यक्ष कृतीतून डॉल्बीमुक्तीचा संदेश दिला. हालगी, ढोल - ताशे, झांज, बेंजो, धनगरी ढोल, बी ढबाक, बॅँड, सनई चौघडे अशा पारंपारिक वाद्यांचा गजर केला. अगदी मोजक्या मंडळांनी मिरवणुकीत कमी तिव्रतेचा स्टेरिओ लावल्याचे पहायला मिळाले. अनेक मंडळांनी तर त्याही पुढे जात केवळ टाळ्यांचा गजर करत मूर्ती विसर्जनासाठी नेली.|डॉल्बीला पर्याय म्हणून मोठ्या मंडळांनी लेसर शो, लाईटस् इफेक्ट आणले होते. त्याच्या सोबतील आॅक्रेस्ट्रा पथके होती. मिरवणुकीचे तेच मुख्य आकर्षण ठरले. मंगळवार पेठेतील प्रक्टीस क्लब - सुबराव गवळी तालीम, पाटाकडील तालीम, दिलबहार तालीम, बालगोपाल, शिवाजी पेठेतील वेताळ तालीम, खंडोबा तालीम, बीजीएम स्पोर्टस, झुंजार क्लब, हिंदवी स्पोर्टस्, दयावान, शहाजी तरुण मंडळ, उत्तरेश्वर पेठेतील वाघाची तालीम, जुना बुधवार तालीम, गुजरी मित्र मंडळ आदी मंडळांचा त्यामध्ये समावेश होता. तटाकडील तालीम मंडळाने मुंबई येथील कलापथक आणले होते. या पथकाने बहारदार लोकनृत्य सादर करुन कोल्हापूरकरांची मने जिंकली. शाहूपुरी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेला ‘हिंदवी स्वराज्याची शपथ’हा चित्ररथ लक्षवेधी ठरला.मोठे थर लावून रचलेल्या लाईट इफेक्टस् व लेसर शो आणणाऱ्या मंडळांचे गणपती पोलिसांनी लवकर मुख्य मिरवणुकीत येऊ दिले नाहीत. बिनखांबी गणेश मंदिर आणि तारावाई रोडवरील सरस्वती चित्रमंदिर येथे पोलिस व्हॅन आडव्या लावल्या होत्या. मिरवणुक न रेंगाळता ती लवकर पुढे सरकत रहावी हा हेतू पोलिसांचा होता. मात्र तरीही मिरजकर तिकटीकडून आलेल्या प्रॅक्टीस क्लब, पाटाकडील, दिलबहार तालीम तर खरी कॉर्नरकडून आलेल्या शहाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढे सरकण्यास बराच वेळ घेतल्यामुळे मिरवणुक रेंगाळली.

सायंकाळी सात नंतर मिरवणुक चांगलीच रेंगाळली. सायंकाळी सात ते रात्री साडे नऊ या वेळेत महाद्वार चौक ते पापाची तिकटी या मार्गावर एकही मंडळ नव्हते. त्यामुळे पोलिसांनी थोडा दबाब तंत्राचा अवलंब करत आधी शहाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुढे ढकलत नेले. त्यानंतर मिरवणुकीला गती प्राप्त झाली. ती सोमवारी पहाटेपर्यंत कायम राहिली.मुख्यमिरवणुकीचा सांगता सोमवारी सकाळी साडेसात वाजता मिरजकर तिकटी येथे झाली. त्याठिकाणी पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलिस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर, सुरज गुरव, आर. आर. पाटील यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीतील शेवटचा गणपती क्रांतीवीर भगतसिंह तरुण मंडळ विक्रमनगर यांनी पंचगंगा नदीत विसर्जीत केला.

 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनkolhapurकोल्हापूर