शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज कारखाना : आरोप-प्रत्यारोपाचा परिणाम ऊस गाळपावर नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 11:37 IST

आपल्या बोलण्या-वागण्याचा विपरित परिणाम शेतकरी, कामगार आणि पर्यायाने कारखान्यावर होवू नये, यासाठी विरोधकांसह सत्ताधा-यांनीदेखील तारतम्य बाळगण्याची गरज आहे.

गडहिंग्लज : बारा संचालकांनी राजीनामे दिल्यामुळे कारखान्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यातूनच एकमेकांवर बेछूट आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. राजकारणात हे अपेक्षित असले तरी कारखान्याच्या चालू गळीत हंगामावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे आपल्या बोलण्या-वागण्याचा विपरित परिणाम शेतकरी, कामगार आणि पर्यायाने कारखान्यावर होवू नये, यासाठी विरोधकांसह सत्ताधा-यांनीदेखील तारतम्य बाळगण्याची गरज आहे.

२०१३ मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने ४३ कोटींच्या बदल्यात १० वर्षांसाठी कारखाना सहयोग तत्त्वावर ब्रिस्क कंपनीला चालवायला देण्यात आला होता. परंतु, ९ महिन्यांपूर्वी कंपनीने कारखाना सोडला. त्यानंतर यावर्षी तब्बल १ महिना उशिराने कारखाना सुरू झाला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप करणे आणि कामगारांचा थकीत पगार भागविण्यासाठी कसरत करावी लागणे स्वाभाविक आहे.

दरम्यान, गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर कारखान्याच्या तोट्याला आणि संभाव्य कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू नये, म्हणूनच १२ संचालकांनी ‘एकमताने’ राजीनामे दिले आहेत. त्यांच्या मागणीमुळेच साखर विक्रीसह धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे उसाची बिले, तोडणी-वाहतुकदारांची बिले आणि उधारीवर आणलेल्या साहित्याची बिले भागविण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळेच सत्ताधारी आणि विरोधकांतील संघर्षाने नवे वळण घेतले आहे.

खरे कैवारी कोण ?

एकीकडे शेतक-यांची ऊसबिले-कामगारांचा पगार देण्यास हरकत नाही, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असा निर्वाळा ‘ते’ १२ संचालक देत आहेत. दुसरीकडे साखर विक्री थांबविण्याची लेखी मागणीही त्यांनी केली आहे. म्हणूनच आक्रमक झालेल्या सत्ताधा-यांनी त्यांच्या निषेधार्थ रास्ता रोको करून कोणत्याही परिस्थितीत ऊसाची बिले भागविण्याची हमी जाहीरपणे दिली आहे. त्यामुळे शेतक-यांचे खरे कैवारी कोण? असा संभ्रम जनतेत निर्माण झाला आहे.

साखर विक्री कशी रोखणार?

साखर व स्पिरीट ही कारखान्याची उत्पादने आहेत. योग्य कारणासाठी त्याची विल्हेवाट लावणे हे कारखान्याच्या व्यवस्थापनाचे नियमित काम आहे. त्यामुळे शासनाला साखर व स्पिरीट विक्री रोखता येणार नाही, असे सहकारी साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. परंतु, त्यातही ‘राजकारण’ झाले, तर संघर्ष अटळ आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने