शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापुरातील जवान निलेश खोत यांच्यावर अंत्यसंस्कार, दिल्लीत सेवा बजावताना झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 16:52 IST

श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण गाव दिवसभर बंद ठेऊन गावकरी व उपस्थितांनी अखेरचा निरोप देऊन दुखवटा पाळला.

इचलकरंजी : तारदाळ (ता.हातकणंगले) येथील जवान निलेश अशोक खोत (वय ३४) यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील सन्मती विद्यालयापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. भारत माता की जय, जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.दिल्ली येथे सिग्नल रेजीमेंट रॅँक (एन.के.) येथे सेवा बजावत असताना बुधवारी (दि.९) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. शुक्रवारी त्यांचे पार्थिव तारदाळात आणले. तेथून अंत्ययात्रेस सुरूवात झाली. तेथून गावातील छत्रपती शिवाजी चौक, गावभाग, चांदणी चौक, शहापूर रोड, समर्थनगर फिरून खोत मळा येथे पोहचली. तेथे लोकप्रतिनिधी, लष्करी, पोलिस अधिकारी व सर्व देशप्रेमी यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात निलेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तसेच पोलिस दल व सैन्यदलाच्यावतीने त्यांना मानवंदना दिली. श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण गाव दिवसभर बंद ठेऊन गावकरी व उपस्थितांनी अखेरचा निरोप देऊन दुखवटा पाळला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर