गोकुळ ठरावधारकांनी सुचविलेल्या विकासकामांनाही निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST2021-04-13T04:22:23+5:302021-04-13T04:22:23+5:30
कोल्हापूर गोकुळमधील ठरावधारकांनी मागणी केल्यास त्यांच्या गावातील विकासकामांसाठी निधी देणार असल्याची घोषणा ...

गोकुळ ठरावधारकांनी सुचविलेल्या विकासकामांनाही निधी
कोल्हापूर गोकुळमधील ठरावधारकांनी मागणी केल्यास त्यांच्या गावातील विकासकामांसाठी निधी देणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. मुश्रीफ यांची ही घोषणा म्हणजे विरोधी शाहू आघाडीला बळ असल्याचे मानले जाते.
जिल्हा परिषदेच्या सदस्यांना जसा निधी दिला तसे गोकुळ ठरावधारकांना काही पॅकेज आहे का, अशी विचारणा केली असता मुश्रीफ म्हणाले, गाेकुळचा ठरावधारक हा त्या गावातीलच कोणीतरी प्रमुख असतो. महत्त्वचीचा व्यक्ती असते. त्यांनी जर गावातील विकासकामांसाठी निधी मागितला तर तो देणे आमचे काम आहे. त्यामुळे अशांच्या विकासकामांनाही निधी देण्यात येणार आहे.
मुश्रीफ म्हणाले, गोकुळची निवडणूक ही ठरावधारकांची निवडणूक आहे. ही सर्वसाधारण निवडणूक नाही. त्यामुळे निवडणूक पुढे जाण्याची शक्यता नाही. माघार घेणाऱ्यांना तेवढी प्रांत कार्यालयात परवानगी देण्यात येईल. तालुकावार मतदान आहे, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणतीही अडचण येणार नाही.
जिल्हा परिषदेच्या सदस्यांना जसा निधी दिला तसे गोकुळ ठरावधारकांना काही पॅकेज आहे का, अशी विचारणा केली असता मुश्रीफ म्हणाले, हा ठरावधारक हा त्या गावातीलच असतो. त्यांनी जर गावातील विकासकामांसाठी निधी मागितला तर तो देणे आमचे काम आहे. त्यामुळे अशांच्या विकासकामांनाही निधी देण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय सदस्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांच्या निधीच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र मुश्रीफ यांनी अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांना सुपूर्द केले. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने, राजेश पाटील, राजेश लाटकर उपस्थित होते. सर्वपक्षीयांना आम्ही निधी दिल्याने विरोधकांनीही आमच्याकडे त्याच नजरेने पाहावे असाही टोला त्यांनी लगावला.
चौकट
कामगारांना कारखान्यावर लसीकरण
मुश्रीफ म्हणाले, कामगारांच्या कोरोना चाचण्यांबाबत सर्व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी भेटले. त्यांनी अडचणी सांगितल्या. त्यानुसार या कामगारांची कारखान्यात जाण्याआधी जागेवरच अँटिजन टेस्ट करणे आणि त्यांना तेथेच लसीकरण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही त्यांच्या अडचणी सांगितल्या. लॉकडाऊनबाबत शासन व्यावहारिक मार्ग काढेल असे त्यांनी सांगितले, तर अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करीत आहेत याबाबतही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
चौकट
लस नाही आणि उत्सव कसा करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन केल्याबद्दल मुश्रीफ म्हणाले, इथं लोकांना द्यायला नाही आणि उत्सव कसा करणार. इतके नागरिक मृत्यू पावल्यानंतर का असेना त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली याबद्दल मोदी सरकारला नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.
चौकट
चंद्रकांत पाटील यांनी संधी घालविली
चंद्रकांत पाटील यांना मंत्री असताना कोल्हापूर जिल्ह्यासाठी खूप काही करण्याची संधी होती. मात्र, त्यांनी रस्त्यांसाठी निधी आणला नाही आणि जिल्ह्याच्या वाटेचे ५० टक्के पाणी अडविण्यासाठी एक रुपयाचाही निधी आणला नाही, असे आरोप करीत मी असतो तर रस्ते काचेसारखे केले असते, असा दावा मुश्रीफ यांनी यावेळी केला.