शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

फळे महागली, भाज्यांचे दर आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:08 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळबाजार तेजीत आहे. भाज्यांची आवक वाढल्याने दरही आवाक्यात आले आहेत. लिंबूचे दर मात्र अनपेक्षितरीत्या वाढले आहेत. मेथी दुर्मीळ झाली असली, तरी कोथिंबिरीचा मात्र बाजारात सुकाळ आल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे.

ठळक मुद्देफळे महागली, भाज्यांचे दर आवाक्यातसाप्ताहिक बाजारभाव : लिंबूचे दरही कडाडले

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळबाजार तेजीत आहे. भाज्यांची आवक वाढल्याने दरही आवाक्यात आले आहेत. लिंबूचे दर मात्र अनपेक्षितरीत्या वाढले आहेत. मेथी दुर्मीळ झाली असली, तरी कोथिंबिरीचा मात्र बाजारात सुकाळ आल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे.शहरातील लक्ष्मीपुरी बाजारपेठेत फेरफटका मारला असता, बाजारपेठ पूर्वपदावर आल्याचे दिसले. गेले तीन-चार आठवडे अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाजारपेठ ओस पडली होती. आज, सोमवारी गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर, रविवारी मात्र बाजार फुललेला होता.

साहजिकच फळांची मागणी जास्त होती. आवक वाढली असली तरी दरही चढेच होते. पूजेसाठी लागणारी पाच फळे ५० ते ६० रुपये अशी होती. कच्ची केळी ४०, तर पिकलेली केळी ६० रुपये डझन, सफरचंद १०० रुपये किलो; पेरू, मोसंबी, डाळींब, चिक्कू ८० ते ९० रुपये किलो असे दर होते. सीताफळ आकारमानानुसार ९० ते १४० रुपये किलो होते.भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसले. मेथीची भाजी मात्र दुर्मीळ असून पेंढीला २० ते २५ रुपये असा दर आहे. पालक, शेपू, कांदेपात १० रुपये पेंढी आहे. कोथिंबिरीची आवक वाढल्याने दरही घसरले आहेत. ५ ते १० रुपये असा पेंढीचा दर आहे. वांगी ६० ते ८० रुपये किलो आहेत. गवार ८० ते १०० रुपये, तर वाल, घेवडा ५० ते ७० रुपये किलो आहेत.

कोबी व फ्लॉवर १० ते २० रुपये गड्डा आहे. हिरवी आणि ढबू मिरचीचे दर फारच कमी झाले आहेत. २० ते ३० रुपये असा किलोचा दर आहे. टोमॅटोही १५ ते २० रुपये किलो आहेत. कारल्याचे दरही २० रुपये किलो असे झाले आहेत.

मागील आठवड्यात १०० रुपयांपर्यंत पोहोचलेला दोडका आता ३० ते ४० रुपयांपर्यंत खाली आला आहे. सांबारसाठी लागणारा भोपळाही बाजारात सर्वत्र दिसत असून, १० ते २० रुपयांना फोड असा त्याचा दर आहे.कांदा चढू लागलाकांद्याचा तुटवडा अजूनही कायम असून, तो वाढतच जाणार असल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात २० ते २५ रुपये असणारा कांदा आता ३० ते ४० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. साधारणपणे गणपती ते दसरा या काळात हे दर वाढतातच, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.लिंबू कडाडलालिंबूचे दर कमालीचे वाढले आहेत. गोट्यांच्या आकाराचे लिंबू १० रुपयांना दोन ते तीन असे मिळत आहेत. बाजारात लिंबूचीही आवक कमीच दिसत आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर